शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मोर्चांनी गाजला दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2016 04:08 IST

धर्मराज्य पक्ष आणि फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या संघटनेचे रस्त्यावर उतरलेले कार्यकर्ते यामुळे शुक्रवारचा दिवस ठाणेकरांसाठी मोर्चाचा ठरला.

ठाणे : अंतर्गत सुरक्षेच्या काद्यातील सुधारणांचा विरोध करण्यासाठी श्रमजीवी संघटनेने काढलेला मोर्चा, ठाणे शहरातील खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला धर्मराज्य पक्ष आणि फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या संघटनेचे रस्त्यावर उतरलेले कार्यकर्ते यामुळे शुक्रवारचा दिवस ठाणेकरांसाठी मोर्चाचा ठरला. आधीच रस्त्यांतील खड्ड्यामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीत मोर्चांमुळे भर पडली.अंतर्गत सुरक्षेच्या कायद्याखाली मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न राज्यातील भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप करून श्रमजीवी संघटनेचेनेते विवेक पंडित यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या कायद्याची होळी केली. नंतर, या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यात पंडित यांनी सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडले.त्यामुळे स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. कोर्टनाका, सेंट्रल मैदानापर्यंत दीर्घकाळ कोंडी होती. मोर्चाच्या बातम्या/पान २ आणि ३।उपजिल्हाधिकाऱ्यांबाबत कार्यकर्त्यांची नाराजीश्रमजीवी कार्यकर्त्यांच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे विवेक पंडित यांच्यासह शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यास आले. मात्र, ते नसल्यामुळे येथील उपजिल्हाधिकारी विलास गजरे यांच्या दालनात पोलिसांनी या शिष्टमंडळास नेले. अंतर्गत सुरक्षा विधेयकाला विरोध करणारे मोर्चेकऱ्यांचे हे निवेदन अवर सचिवांसाठी जिल्हाधिकाऱ्यांद्वारे द्यायचे होते. चार पानांचे निवेदन पाहिल्यानंतर एक शब्दही न बोलता केवळ होकारार्थी मान हलवून त्यांनी जाण्यास सूचित केले.उपजिल्हाधिकारी काही बोलत नसल्याचे पाहून पंडित यांनी दिलेल्या निवेदनाची पोच मागितली. ती खाली मिळेल, असे सांगून उपजिल्हाधिकाऱ्यांनी जाण्यास सांगितले. त्यामुळे कार्यकर्ते संतापले. मात्र, पोलीस निरीक्षक सुरेश लंभाते व अशोक कुंभार यांनी शिष्टमंडळासे बाहेर काढले. तरीदेखील, सरकारी कामातील या कर्तव्यदक्षतेबद्दल श्रमजीवी संघटना उपजिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली जाणार आहे.