शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

मुलीचे लग्न; वडिलांची आत्महत्या

By admin | Updated: May 1, 2017 02:27 IST

विऱ्हाम येथील मुलीचे लग्न अवघ्या चार दिवसांवर आलेले असताना बापाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची

पाईट : विऱ्हाम येथील मुलीचे लग्न अवघ्या चार दिवसांवर आलेले असताना बापाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या केली असावी, अशी गावामध्ये कुजबुज आहे. याबाबत खेड पोलीस चौकीमध्ये उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.विऱ्हाम येथील मारुती चिमाजी सावंत (वय ६२) यांनी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान शेतातील मोहाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत गणपत चिमाजी सावंत (रा. विऱ्हाम, ता. खेड) यांनी खेड पोलीस चौकीत खबर दिली.याबाबत ठाणे अंमलदार एस. एन. नाडेकर यांनी माहिती देताना सांगितले, की ते व त्यांच्या कुटुंबातीलइतर राजगुरुनगर येथे लग्नासाठी आलेले असताना गावातील माजी उपसरपंच सिद्धार्थ रोकडे यांनी फोन करून तुमचा भाऊ मारुती सावंत याने तुमच्या शेतात मोहाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर ते त्वरित गावाला जाऊन पाहिले असता भावाने शेतातील मोहाच्या झाडाला दोरी गळ्याला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पाहिले. याबाबत मृताच्या आसपास इतर काहीही आढळून आले नाही.मृत मारुती चिमाजी सावंत (वय ६२) यांना ८ मुली असून त्यामधील ५ नंबरच्या मुलीचे लग्न गुरुवारी (दि. ४ मे) गावामधील एका विवाह सोहळ्यामध्ये करण्याचे ठरले होते. लग्न अवघ्या चार दिवसांवर आलेले असताना वडिलांनी आत्महत्या केल्याने गावावर मोठी शोककळा पसरली आहे. त्यांनी कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या केली असावी, असा नात्यातील व गावामधील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.मारुती सावंत यांची घरची स्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांच्यावर भलवडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज आहे. त्यांच्याकडून मार्चअखेर परतफेड झाली नसल्याचे समजते. कर्जफेडीची विवंचना व डोक्यावर आलेले मुलीचे लग्न यांच्यामुळेच भावकीतील लग्नाला सर्व गेल्याने घरी कोणी नसताना आत्महत्या केली.या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस हवालदार बी. एल. गिरजे अधिक तपास करीत आहेत.