शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

मुलीचे लग्न; वडिलांची आत्महत्या

By admin | Updated: May 1, 2017 02:27 IST

विऱ्हाम येथील मुलीचे लग्न अवघ्या चार दिवसांवर आलेले असताना बापाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची

पाईट : विऱ्हाम येथील मुलीचे लग्न अवघ्या चार दिवसांवर आलेले असताना बापाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या केली असावी, अशी गावामध्ये कुजबुज आहे. याबाबत खेड पोलीस चौकीमध्ये उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.विऱ्हाम येथील मारुती चिमाजी सावंत (वय ६२) यांनी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान शेतातील मोहाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत गणपत चिमाजी सावंत (रा. विऱ्हाम, ता. खेड) यांनी खेड पोलीस चौकीत खबर दिली.याबाबत ठाणे अंमलदार एस. एन. नाडेकर यांनी माहिती देताना सांगितले, की ते व त्यांच्या कुटुंबातीलइतर राजगुरुनगर येथे लग्नासाठी आलेले असताना गावातील माजी उपसरपंच सिद्धार्थ रोकडे यांनी फोन करून तुमचा भाऊ मारुती सावंत याने तुमच्या शेतात मोहाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर ते त्वरित गावाला जाऊन पाहिले असता भावाने शेतातील मोहाच्या झाडाला दोरी गळ्याला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पाहिले. याबाबत मृताच्या आसपास इतर काहीही आढळून आले नाही.मृत मारुती चिमाजी सावंत (वय ६२) यांना ८ मुली असून त्यामधील ५ नंबरच्या मुलीचे लग्न गुरुवारी (दि. ४ मे) गावामधील एका विवाह सोहळ्यामध्ये करण्याचे ठरले होते. लग्न अवघ्या चार दिवसांवर आलेले असताना वडिलांनी आत्महत्या केल्याने गावावर मोठी शोककळा पसरली आहे. त्यांनी कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या केली असावी, असा नात्यातील व गावामधील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.मारुती सावंत यांची घरची स्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांच्यावर भलवडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज आहे. त्यांच्याकडून मार्चअखेर परतफेड झाली नसल्याचे समजते. कर्जफेडीची विवंचना व डोक्यावर आलेले मुलीचे लग्न यांच्यामुळेच भावकीतील लग्नाला सर्व गेल्याने घरी कोणी नसताना आत्महत्या केली.या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस हवालदार बी. एल. गिरजे अधिक तपास करीत आहेत.