शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

कोल्हापूरची कन्या बांगलादेशची पाहुणी

By admin | Updated: January 28, 2016 00:35 IST

‘युथएक्स्चेंज’ कार्यक्रमांतर्गत दौरा : आवळी (बु.) गावची मानही अभिमानाने उंचावली

मुरलीधर कुलकर्णी -- कोल्हापूर -लहान असतानाच तिनं लष्करात अधिकारी व्हायचं ठरवलं आणि म्हणूनच इयत्ता आठवीत आल्याबरोबर तिनं एनसीसीत प्रवेश मिळवला. दहावीचा टप्पा ओलांडून कॉलेजमध्ये आल्यानंतरही तिनं अगदी हट्टानं एनसीसी सोडलं नाही. परेड, हॉर्सरायडिंग, अडथळ्यांची शर्यत यांची गोडी वाढत गेली अन् एनसीसीच्या या शिक्षणानंच तिला युथएक्स्चेंज कार्यक्रमांतर्गत बांगलादेशातील कार्यक्रमात सहभागी होण्याचा बहुमान मिळवून दिला. ऋतुजा विलास कवडे असं या कोल्हापूरच्या कन्येचं नाव आहे. कोल्हापूरच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्समध्ये बी.कॉम.च्या तिसऱ्या वर्गात सध्या ती शिकत आहे.भारत आणि बांगलादेश यांच्यातील युथएक्स्चेंज कार्यक्रमांतर्गत बांगलादेशचा जवळपास दोन आठवड्यांचा यशस्वी दौरा करून नुकतीच ती परतलीय. या दौऱ्यासाठी संपूर्ण देशातून १0 मुले आणि १0 मुली निवडण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातील तिघांमध्ये ऋतुजाचा समावेश होता.राधानगरी तालुक्यातील आवळी (बु.) या छोट्याशा खेडेगावातून आलेल्या या मुलीला बांगलादेशच्या १६ डिसेंबरला झालेल्या विजय दिवसासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. जगभरातील विविध देशांतून आलेल्या युवकांसोबत ऋतुजाला आपल्या विचारांचे आदान-प्रदान करण्याची संधी तेथे मिळाली.या विशेष पाहुण्यांसाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि राष्ट्रपती अब्दुल हमीद यांनी ढाक्याच्या बांगो भवनात खास मेजवानीचे आयोजन केले होते. विजय दिवसाच्या मुख्य कार्यक्रमानंतर १९७१ च्या बांगलामुक्तीच्या युद्धात सहभागी झालेल्या भारतीय सैनिकांबरोबरच विविध देशांतून आलेल्या या युवकांचाही सत्कार करण्यात आला. यानंतर या युवकांचा जवळपास दोन आठवड्यांचा बांगलादेश दौरा सुरू झाला. या काळात त्या देशातील लोकांचे राहणीमान, सण, समारंभ, तिथल्या लोकांच्या विविध समस्या ऋतुजाने आपल्या विविध मित्रांसमवेत जाणून घेतल्या. बांगलादेशातील विविध ऐतिहासिक स्थळांनाही तिने भेट दिली. बांगलादेशच्या लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकारी या काळात त्यांच्यासोबत होते. बांगलादेशचा दोन आठवड्यांचा दौरा आटोपल्यानंतर लगेचच ती चेन्नईत आॅफिसर्स ट्रेनिंग कॅम्पलाही जाऊन आली.२५ वर्षांनंतर कोल्हापूरला संधीभारत आणि बांगलादेश यांच्यातील ‘युथएक्स्चेंज’ कार्यक्रमांतर्गत दौऱ्यासाठी एखाद्या मुलीची निवड होण्याचा बहुमान ऋतुजाच्या रूपाने कोल्हापूरला तब्बल २५ वर्षांंनंतर मिळाला. यापूर्वी १९८९-९0 मध्ये वैशाली महाजन हिला हा बहुमान मिळाला होता.२८ जानेवारी २0१४ रोजी नवी दिल्लीत झालेली प्राईमिनिस्टर्स रॅली व २0१५ रोजी २६ जानेवारीला राजपथावर झालेल्या शानदार संचलनामध्ये तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. २0१४ मध्ये लक्षद्वीप येथे झालेल्या स्पेशल नॅशनल इंटिग्रेशन कॅम्पमध्येही तिने राज्याचे प्रतिनिधित्व केले.