शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या कुशीत दशरथनगर !

By admin | Updated: August 5, 2014 01:09 IST

पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळल्याने दीडशेहून अधिक जणांचा बळी गेला. संपूर्ण गावचं गडप झाल्याची घटना धक्कादायक तर आहेच परंतु आपल्यालाही अनेक गोष्टी शिकविणारीही आहे.

भूस्खलनाचा धोका माळीण होणार का? नागरिकांचा जीव मुठीत आनंद डेकाटे/ जीवन रामावत -नागपूरपुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळल्याने दीडशेहून अधिक जणांचा बळी गेला. संपूर्ण गावचं गडप झाल्याची घटना धक्कादायक तर आहेच परंतु आपल्यालाही अनेक गोष्टी शिकविणारीही आहे. पहाडाच्या लागून वसलेले माळीण हे राज्यातील किंवा देशातील एकमेव गाव नव्हे तर अशी अनेक गावे आजही धोकादायक स्थितीत आहेत. नागपूर शहरातसुद्धा अशा काही वस्त्या आहेत ज्या पहाडाखाली, पहाडाला लागून वसल्या आहेत. लोकमत चमुने सोमवारी या वस्त्यांची पाहणी केली असता, धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गिट्टीखदान परिसरातील दशरथनगर व कुतुबशहानगर या अशाच धोकादायक वस्त्या असून यांचे कधी ‘माळीण’ होईल, काही सांगता येत नाही. छतावरचे प्लॅस्टरही तुटून पडले दशरथनगरात टेकडीवरून दगड पडणे नवीन नाही. एकदा टेकडीवरून एक मोठा दगड कोसळून लोखंडे यांच्या घरावर पडला. त्यामुळे सिमेटंच्या छताचे प्लॅस्टर तुटून त्यांच्या स्वयंपाक करण्याच्या ओट्यावर पडल्याने ते तुटले. आजही तुटलेले प्लॅस्टर तसेच आहे. तरुण मुलाचा गेला जीव दशरथनगर येथे राहणारे कांता तायडे यांचा १८ वर्षाचा तरुण मुलगा महेश हा एकेदिवशी पतंग उडविण्यासाठी घरामागच्या टेकडीवर चढला. पतंग उडविताना खाली पडून त्याचा मृत्यू झाला. त्याची आठवण सांगताना त्यांच्या घरच्यांच्या डोळ्यात आजही अश्रू दाटून येतात. शौचालयाचे छप्पर तुटले दगड नेहमीच पडत असतात परंतु येथील शाहू यांच्या घरावर एक मोठा दगड पडल्याने त्यांचे छप्पर तुटले. रात्री ११ वाजताच्या सुमारास धो धो पाऊस पडत असताना अचानक दगड पडला. तेव्हा मोठा आवाज झाला. आकाश कोसळले की काय असे वाटू लागले. त्या घटनेपासून शाहू कुटुंबीय पावसाळा आला की दहशतीतच असतात. वर दरड तर खाली दलदलदशरथनगरातील नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. वरून दरड कोसळण्याची भीती आहे तर खाली वस्तीत दलदल आहे. एकेकाळी येथे एक छोटे सरोवर होते. पहाडावरून वाहत येणारे पाणी येथे साचायचे. आज सरोवराच्या आजूबाजूला घरे झाली आहेत. वरच्या पाण्यासोबतच नागरिकांच्या वापराचे पाणीही सरोवरात सोडले गेले. परिणामी सरोवर दूषित झाले. आज या सरोवरात गवत वापले असून दलदल तयार झाली आहे. खेळता खेळता त्यात कुणी पडले तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.