शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या कुशीत दशरथनगर !

By admin | Updated: August 5, 2014 01:09 IST

पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळल्याने दीडशेहून अधिक जणांचा बळी गेला. संपूर्ण गावचं गडप झाल्याची घटना धक्कादायक तर आहेच परंतु आपल्यालाही अनेक गोष्टी शिकविणारीही आहे.

भूस्खलनाचा धोका माळीण होणार का? नागरिकांचा जीव मुठीत आनंद डेकाटे/ जीवन रामावत -नागपूरपुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळल्याने दीडशेहून अधिक जणांचा बळी गेला. संपूर्ण गावचं गडप झाल्याची घटना धक्कादायक तर आहेच परंतु आपल्यालाही अनेक गोष्टी शिकविणारीही आहे. पहाडाच्या लागून वसलेले माळीण हे राज्यातील किंवा देशातील एकमेव गाव नव्हे तर अशी अनेक गावे आजही धोकादायक स्थितीत आहेत. नागपूर शहरातसुद्धा अशा काही वस्त्या आहेत ज्या पहाडाखाली, पहाडाला लागून वसल्या आहेत. लोकमत चमुने सोमवारी या वस्त्यांची पाहणी केली असता, धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गिट्टीखदान परिसरातील दशरथनगर व कुतुबशहानगर या अशाच धोकादायक वस्त्या असून यांचे कधी ‘माळीण’ होईल, काही सांगता येत नाही. छतावरचे प्लॅस्टरही तुटून पडले दशरथनगरात टेकडीवरून दगड पडणे नवीन नाही. एकदा टेकडीवरून एक मोठा दगड कोसळून लोखंडे यांच्या घरावर पडला. त्यामुळे सिमेटंच्या छताचे प्लॅस्टर तुटून त्यांच्या स्वयंपाक करण्याच्या ओट्यावर पडल्याने ते तुटले. आजही तुटलेले प्लॅस्टर तसेच आहे. तरुण मुलाचा गेला जीव दशरथनगर येथे राहणारे कांता तायडे यांचा १८ वर्षाचा तरुण मुलगा महेश हा एकेदिवशी पतंग उडविण्यासाठी घरामागच्या टेकडीवर चढला. पतंग उडविताना खाली पडून त्याचा मृत्यू झाला. त्याची आठवण सांगताना त्यांच्या घरच्यांच्या डोळ्यात आजही अश्रू दाटून येतात. शौचालयाचे छप्पर तुटले दगड नेहमीच पडत असतात परंतु येथील शाहू यांच्या घरावर एक मोठा दगड पडल्याने त्यांचे छप्पर तुटले. रात्री ११ वाजताच्या सुमारास धो धो पाऊस पडत असताना अचानक दगड पडला. तेव्हा मोठा आवाज झाला. आकाश कोसळले की काय असे वाटू लागले. त्या घटनेपासून शाहू कुटुंबीय पावसाळा आला की दहशतीतच असतात. वर दरड तर खाली दलदलदशरथनगरातील नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. वरून दरड कोसळण्याची भीती आहे तर खाली वस्तीत दलदल आहे. एकेकाळी येथे एक छोटे सरोवर होते. पहाडावरून वाहत येणारे पाणी येथे साचायचे. आज सरोवराच्या आजूबाजूला घरे झाली आहेत. वरच्या पाण्यासोबतच नागरिकांच्या वापराचे पाणीही सरोवरात सोडले गेले. परिणामी सरोवर दूषित झाले. आज या सरोवरात गवत वापले असून दलदल तयार झाली आहे. खेळता खेळता त्यात कुणी पडले तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.