शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

किराणा-भाजीपाल्यासाठी पोलीस दावणीला!

By admin | Updated: November 1, 2015 00:27 IST

जनतेची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे आदी पोलिसांची कर्तव्ये असली, तरी अनेक कर्मचाऱ्यांचा वापर मात्र अधिकाऱ्यांच्या बंगल्यावरील

यवतमाळ : जनतेची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे आदी पोलिसांची कर्तव्ये असली, तरी अनेक कर्मचाऱ्यांचा वापर मात्र अधिकाऱ्यांच्या बंगल्यावरील घरगुती कामांसाठी केला जातो. किराणा, दळण, भाजीपाला, मुलांची ने-आण करण्यासाठी त्यांना जुंपले जाते. राज्यातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट महासंचालकांच्या दरबारात याबाबत निवेदन-पत्राद्वारे तक्रार केली आहे.राज्यातून आलेल्या पत्रांची दखल घेऊन महासंचालकांतर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) आशुतोष डुम्बरे (मुंबई) यांनी ‘पोलीस अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारी’ असा संदर्भ देऊन विभागाच्या पोलीस प्रमुखांनी कर्मचाऱ्यांच्या शंका निरसनासाठी पोलीस दरबार भरविण्याच्या सूचना केल्या आहेत. समस्या ऐकून त्याचे घेऊन निरसन करण्याचे व योग्य मार्गदर्शन करण्याचे सुचविले आहे.जळगावचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सादरेंच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस दलात वरिष्ठांकडून अधिकारांचा गैरवापर होतो. कर्मचाऱ्यांना नोकरासारखे वागविले जाते. घरगुती, वैयक्तिक कामे करून घेतली जातात. किराणा, भाजीपाला आणणे, पत्नीला ब्युटीपार्लर तसेच सिनेमाला नेऊन सोडणे, मुलांना शाळेत, शिकवणीला नेणे-आणणे, दळण आणणे अशी कामे करुन घेतली जात असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले.काही अधिकारी खासगी गाडीने शासकीय कर्मचाऱ्यांकडून ही कामे करून घेतात. ही कामे करताना लाज वाटते. मात्र नाईलाज असतो. कारण अधिकारी नाराज झाल्यास कसुरी रिपोर्ट पाठविणे, दंड आकारणे, सेवा पुस्तिकेत (सीआर) चुकीचा शेरा खराब लिहिणे आदी कारवाईला सामोरे जावे लागते. उपरोक्त वागणुकीचा ऊहापोह पोलीस कर्मचाऱ्यांनी पत्राद्वारे महासंचालकांकडे केला आहे. (प्रतिनिधी)‘कन्व्हिक्शन रेट’वरून छळ?न्यायालयात दाखल खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण (कन्व्हिक्शन रेट) वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्यातून गुन्ह्यांची कागदपत्रे पोलीस उपअधीक्षक, अपर अधीक्षक, सरकारी वकील, सहायक संचालकांकडे पाठविली जातात. त्यांनी काढलेल्या त्रुटींची पूर्तता करावी लागते. यात पोलीस अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो व त्यातूनच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते.