शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

इंद्रायणी घाटावर अंधार

By admin | Updated: June 11, 2016 01:38 IST

ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदी ते पंढरपूर पायी वारी पालखी सोहळा १५ दिवसांवर येऊन ठेपला

आळंदी : ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदी ते पंढरपूर पायी वारी पालखी सोहळा १५ दिवसांवर येऊन ठेपला असून, त्या सोहळ्यासाठी परराज्यातील दुर्गम भागातून वारकरी आळंदीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. भाविकही आषाढ वारीपूर्वीच माऊलींचे व तद्नंतर पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. आळंदीत दाखल झालेले वारकरी इंद्रायणीत पवित्र स्नान करून मगच माऊलींचे दर्शन घेतात. प्रत्येक वारकऱ्याचा इंद्रायणी घाट जिव्हाळ्याचा व श्रद्धेचा विषय आहे; परंतु हाच घाट गैरसोयींचा सामना करीत असून, घाटावरील विद्युत दिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. घाटावर दोन ठिकाणी चार ते पाच दिव्यांचा संच असलेले हायमास्ट दिवे आहेत. हे दिवेच बंद पडले असून, अंधारात भाविकांना पायऱ्या उतरून नदीत स्नान करणेही अवघड जात आहे. अंधारात पायऱ्या दिसत नसल्याने वृद्ध वारकरी पाय घसरून पडल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. छोटे खांब उभारून त्यावरही विद्युत दिवे बसवून प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे; परंतु ते दिवेही बंद असल्याने प्रकाशव्यवस्थेचा खोळंबा झाला आहे.एकंदरीतच, इंद्रायणी घाटावरील वीजपुरवठा विस्कळीत झाला असून, दांडेकर स्मारकापाशी तर तारा स्मारकाच्या मेघडंबरीलाच चिकटल्या आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, या सर्वच बाबींकडे लक्ष देऊन वारीपूर्वीच वारकऱ्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)>दक्षिण घाटावरील विद्युत दिवे गायबस्थानिक नागरिकही विरंगुळ्याकरिता रात्रीच्या वेळी घाटावर येत असतात. लहान मुलेही घाटावरील मोकळ्या जागेत खेळत असतात. अंधार असल्याने त्यांनाही धोकादायक स्थितीत खेळावे लागत आहे. दारू पिऊन झिंगलेल्या दारूड्यांचाही उपद्रव वाढला असून, सर्वसामान्य वारकऱ्यांना या उपद्रवाचा सामना करावा लागत आहे. दक्षिण घाटावर तर विद्युत दिवेच गायब झालेले असून, त्यामुळे परिसरात पूर्णपणे अंधार पसरला आहे.