शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणी घाटावर अंधार

By admin | Updated: June 11, 2016 01:38 IST

ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदी ते पंढरपूर पायी वारी पालखी सोहळा १५ दिवसांवर येऊन ठेपला

आळंदी : ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदी ते पंढरपूर पायी वारी पालखी सोहळा १५ दिवसांवर येऊन ठेपला असून, त्या सोहळ्यासाठी परराज्यातील दुर्गम भागातून वारकरी आळंदीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. भाविकही आषाढ वारीपूर्वीच माऊलींचे व तद्नंतर पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. आळंदीत दाखल झालेले वारकरी इंद्रायणीत पवित्र स्नान करून मगच माऊलींचे दर्शन घेतात. प्रत्येक वारकऱ्याचा इंद्रायणी घाट जिव्हाळ्याचा व श्रद्धेचा विषय आहे; परंतु हाच घाट गैरसोयींचा सामना करीत असून, घाटावरील विद्युत दिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. घाटावर दोन ठिकाणी चार ते पाच दिव्यांचा संच असलेले हायमास्ट दिवे आहेत. हे दिवेच बंद पडले असून, अंधारात भाविकांना पायऱ्या उतरून नदीत स्नान करणेही अवघड जात आहे. अंधारात पायऱ्या दिसत नसल्याने वृद्ध वारकरी पाय घसरून पडल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. छोटे खांब उभारून त्यावरही विद्युत दिवे बसवून प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे; परंतु ते दिवेही बंद असल्याने प्रकाशव्यवस्थेचा खोळंबा झाला आहे.एकंदरीतच, इंद्रायणी घाटावरील वीजपुरवठा विस्कळीत झाला असून, दांडेकर स्मारकापाशी तर तारा स्मारकाच्या मेघडंबरीलाच चिकटल्या आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, या सर्वच बाबींकडे लक्ष देऊन वारीपूर्वीच वारकऱ्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)>दक्षिण घाटावरील विद्युत दिवे गायबस्थानिक नागरिकही विरंगुळ्याकरिता रात्रीच्या वेळी घाटावर येत असतात. लहान मुलेही घाटावरील मोकळ्या जागेत खेळत असतात. अंधार असल्याने त्यांनाही धोकादायक स्थितीत खेळावे लागत आहे. दारू पिऊन झिंगलेल्या दारूड्यांचाही उपद्रव वाढला असून, सर्वसामान्य वारकऱ्यांना या उपद्रवाचा सामना करावा लागत आहे. दक्षिण घाटावर तर विद्युत दिवेच गायब झालेले असून, त्यामुळे परिसरात पूर्णपणे अंधार पसरला आहे.