शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

दुष्काळाची छाया गडद!

By admin | Updated: July 14, 2014 02:58 IST

कोरडा गेलेला संपूर्ण जून महिना आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने दगा दिल्याने राज्यावरील दुष्काळाचीछाया आणखी गडद झाली आहे

पुणे : कोरडा गेलेला संपूर्ण जून महिना आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने दगा दिल्याने राज्यावरील दुष्काळाचीछाया आणखी गडद झाली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ६६ टक्के कमी पाऊस झाला आहे. धरणे आणि जलाशयांमधील पाणीसाठा टक्केवारीच्या बाबतीत एक अंकी झाला आहे. ही आकडेवारी चिंता वाढविणारी असल्याचे सरकारच्या वतीनेही सूचित केले जात आहे. आधीच्या तुलनेत गेल्या आठवड्यापासून राज्यात दमदार सरींची हजेरी लागली असली तरी महिन्याचा अनुशेष भरून निघणे अवघडच दिसत आहे.राज्यात जून महिन्यात सरासरीच्या ४१ टक्के कमी पाऊस झाला होता. ती तीव्रता या महिन्यात आणखी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडला असून, तो सरासरीच्या ७० टक्के कमी आहे. त्यापाठोपाठ विदर्भात सरासरीपेक्षा ६७ टक्के कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात ६३ टक्के कमी पाऊस झाला आहे. कोकणात मात्र गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत असल्याने तेथील दुष्काळाची तीव्रता थोडी कमी झाली आहे. मात्र अजूनही तेथे सरासरीच्या ५९ टक्के कमी पाऊस आहे.जून महिन्यात कमी पाऊस झाल्याने राज्यातील जलाशयांनी तळ गाठला आहे. विविध धरणांमधील पाणी संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भूमी कोरडी झाल्याने पडणारे पावसाचे पाणी जमिनीमध्येच मुरत आहे. त्यामुळे अजूनही धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत नसल्याचे चित्र राज्यभर आहे. आतापर्यंत नंदूरबार जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. तेथे सरासरीच्या ९५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा ८४% पाऊस कमी झाला आहे.राज्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळाचे सावट आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यास वीजनिर्मितीवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. सातारा जिल्ह्याची परिस्थिती गंभीर असून, त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आठ कोटी देण्यात येतील, असे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)