शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

अवघा रंग एक झाला

By admin | Updated: February 20, 2016 01:27 IST

संमेलन कोणतंही असो, न दिसणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रचंड धावपळ, अथक मेहनत आणि नियोजन यामुळे ते आकाराला येतं. त्याचाच प्रत्यय आला

संमेलन कोणतंही असो, न दिसणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रचंड धावपळ, अथक मेहनत आणि नियोजन यामुळे ते आकाराला येतं. त्याचाच प्रत्यय आला, तो अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात. ठाण्यात होणारं हे पहिलंवहिलं संमेलन. श्री स्थानकातलं. आधी भरपूर चर्चा झाली, तयारीची वर्णनं आली. मानापमान नाट्यं रंगली. संमेलनपूर्व कार्यक्रमातील उशिरापासून त्यातील सहभागापर्यंतची वर्णनं आली. पण गेल्या दोन दिवसांत संमेलनपूर्व कार्यक्रमांना आणि संमेलनाचे मार्ग, परिसर सजवण्याला ठाणेकरांनी जो प्रतिसाद दिला, विविध संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला, तो पाहता ‘ठाणे तिथे काय उणे’ याचाच प्रत्यय आला. ‘रात्रीचा समय सरूनी होत उष:काल हा’ म्हणत शुक्रवारी सकाळी सजलेल्या मैफलीनं अवघा नूर पालटून टाकला आणि नाट्यदिंडीच्या उत्साहात आबालवृद्धांनी सहभाग नोंदवून ठाण्याचं चैतन्य अखिल भारतीय पातळीवर नेलं. नाट्यसृष्टीतले नाना रंग, त्याचे विविधरंगी पदर, लोककलेची गाज, संस्कृतीचा साज यामुळे संमेलननगरी नटूनथटून रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांच्या स्वागताला सज्ज झाली. नाही नाही म्हणता आकाशकंदिल चमचमले. दीपोत्सवातील मंद प्रकाशाने स्नेहाची ज्योत तेवत ठेवली... आणि गेला महिनाभर कुठे तयारी दिसत नाही म्हणणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का मिळाला. नाट्यदिंडीतील मुलांचा सहभाग, त्यांचा-त्यांच्या शाळांचा उत्साह, फ्लोटवर तोल सांभाळत त्यांनी सादर केलेले नाट्यप्रवेश... ठाण्यातील नाट्यपरंपरेचा जागर... आदिवासींनी तारपाच्या तालावर धरलेला फेर, पारंपरिक वेशभूषेत नटूनथटून आलेल्या ललना, ढोल-लेझीमचा घोष यामुळे दुपारपासून अवघ्या ठाण्याला संमेलनाचे वेध लागले... रंगभूषेच्या दुनियेत वावरणाऱ्यांना, त्याच्या भोवताली राहून हे क्षण मोबाइलमध्ये टिपणाऱ्यांना, सेल्फी-क्लीप काढणाऱ्या-फेसबुकवर- व्हॉटसअ‍ॅपवर- सोशल मीडियात ‘अपलोड’ होणाऱ्यांनाही पाहता पाहता तो रंग लागला... अन अवघा रंग एक झाला!संमेलन असो की कोणताही मराठमोळा सोहळा, त्यात नेहमी वेगवेगळे नाद ऐकू येतातच. त्याविना त्यात रंग भरत नाहीत. कधी ते नाद मंजुळ असतात, तर कधी खणखणाटाच्या पातळीवरचे; पण जेव्हा प्रत्यक्ष सोहळ््यात रंग भरू लागतात तेव्हा मात्र अवघे जात, धर्म, पंथ, पक्ष असे नाना रंग एकरूप होतात. नाना रंगी भिरभिऱ्यात जसे सारे रंग स्वत:चं अस्तित्व विसरून एकाच रंगात परावर्तीत होतात, तसंच त्यांचंही होत गेलं. त्यांचंच प्रत्यंतर ठाण्यातल्या या संमेलनातही आलं...अवघा रंग एक झालारंगी रंगला श्रीरंग!