शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दप्तराविना शाळा

By admin | Updated: September 14, 2016 06:06 IST

सीबीएसई शाळा दप्तराविना भरवण्याची घोषणा मंडळाने केली आहे. पहिली आणि दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गृहपाठातून मुक्तता मिळणार आहे. या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे.

मुंबई : सीबीएसई शाळा दप्तराविना भरवण्याची घोषणा मंडळाने केली आहे. पहिली आणि दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गृहपाठातून मुक्तता मिळणार आहे. या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे.दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मंडळाने आणखी काही उपाययोजनांची घोषणाही परिपत्रकात केली आहे. त्यात मंडळाने शाळांसोबतच पालक आणि शिक्षकांनाही त्यांच्या जबाबदाऱ्या आखून दिल्या आहेत. मंडळाने आखून दिलेले वेळापत्रक तंतोतंत पाळण्याची सूचनाही शाळांना करण्यात आली आहे, तर विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसारच पुस्तके आणि वह्या आणल्या आहेत की नाही, याची तपासणी शाळांना करायला सांगितली आहे. विद्यार्थी इतर साहित्य आणत असल्यास, त्याचीही तपासणी करण्याची सूचना मंडळाने शाळांना दिली आहे.या आधी सरकारने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या वय आणि वजनाच्या सरासरीनुसार आहे की नाही, याची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याला केराची टोपली दाखवण्यात आली होती. अखेर सीबीएसई मंडळाने घेतलेल्या पुढाकाराने इतर मंडळे आणि शाळा दप्तराच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका करतील, अशी आशा निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)