शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

दप्तराचे वजन कमी होण्याची हमी नाही

By admin | Updated: July 2, 2015 01:10 IST

दप्तराचे ओझे कमी करणार असल्याचा दावा राज्य शासनाने केला असला तरी दप्तराचे नेमके किती वजन कमी होणार याचा खुलासा शासनाने केलेला नाही, असा आरोप करणारे प्रत्युत्तर

मुंबई : दप्तराचे ओझे कमी करणार असल्याचा दावा राज्य शासनाने केला असला तरी दप्तराचे नेमके किती वजन कमी होणार याचा खुलासा शासनाने केलेला नाही, असा आरोप करणारे प्रत्युत्तर याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी उच्च न्यायालयात सादर केले आहे. याची दखल घेत न्यायालयाने याचा स्पष्टीकरण देण्याचे आदेश शासनाला दिले व ही सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली.चेंबूर येथील पाटील यांनी अ‍ॅड. नितेश नेवसे यांच्यामार्फत ही याचिका करण्यात आली आहे. याचे प्रत्युत्तर सादर करताना शासनाने प्राथमिक शिक्षण संचालक यांच्या अध्यक्षततेखाली यासाठी समिती नेमली असून इयत्ता पहिले ते पाचवीपर्यंतचे काही विषय कमी केले जाणार असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. ही समिती गेल्या वर्षी स्थापन करण्यात आली आहे़ इयत्ता पहिली व दुसरी तसेच तिसरी व पाचवी अशी विभागणी करून यातील काही विषय कमी केले जाणार आहेत़ विषय कमी झाल्याने दप्तराचे ओझे कमी होईल़ चित्रकला व संगणक विषयाची वही शाळेत ठेवावी तसेच विद्यार्थ्यांना वह्या ठेवण्यासाठी लॉकर द्यावे, अशी सूचनाही शाळांना करण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे, मात्र हे प्रतिज्ञापत्र दिशाभूल करणारे आहे. ही याचिका दहावीपर्यंतच्या दप्तरासाठी आहे. आणि सरकारने केवळ पाचवीपर्यंतच्या दप्तराचा खुलासा केला आहे. तसेच ही याचिका जानेवारीमध्ये दाखल झाली आहे. आता शाळा सुरू झाल्या आहेत. अद्याप दप्तराचे वजन नेमके कसे कमी होईल, याचे स्पष्टीकरण शासनाने दिले नसल्याचा आरोप पाटील यांनी प्रत्युत्तरात केला आहे. न्या. व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने पाटील यांच्या प्रत्युत्तराची दखल घेत याचा खुलासा करण्याचे निर्देश शासनाला दिले व ही सुनावणी तहकूब केली.