शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

विकासाचा दहशतवाद धोक्याचा : प्रा़ एच़ एम़ देसरडा

By admin | Updated: May 31, 2014 22:28 IST

मूलभूत उद्दिष्टांशी विसंगत आहे, असे प्रतिपादन नामवंत अर्थतज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा़ एच़ एम़ देसरडा यांनी केले़

एच़ एम़ देसरडा : आंधळ्या विकासाला विरोधपुणे : नवीन सरकार स्थापनेनंतर देशातील अभिजन- महाजन धनदांडग्या जाती वर्गाने विकास मूलतत्ववादाचा जो गजर सुरू केला आहे तो समतामूलक शाश्वत विकासासाठी मोठा धोका असून भारतीय संविधानाच्या मूलभूत उद्दिष्टांशी विसंगत आहे, असे प्रतिपादन नामवंत अर्थतज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा़ एच़ एम़ देसरडा यांनी केले़ प्रा़ देसरडा म्हणाले, आजमितीला मुख्य प्रश्न आहे़ कुणाचा विकास कशाचा विकास? जमीन, पाणी, वने, कुरणे, जैवविविधता याचा खातमा व मानवी हक्काचा बळी देऊन होत असलेला विकास हा धोकादायक असून त्यांची सद्दी केव्हाच संपली आहे़ २१ व्या शतकात हवामान बदलाचे वास्तव लक्षात न घेता कोणत्याही प्रकल्पाचा विचार आत्मघातकी असल्याची बाब आता कुणी अमान्य करू शकत नाही़ सरकारने कितीही सदिच्छापर गोष्टी जाहीर केल्या तरी सामाजिक - आर्थिक व्यवस्था आणि राजकीय अर्थशास्त्राची सरंजामी, भांडवली, तथाकथित समाजवादी, बांडगुळी संरचना ढाचा व घाट बदलत नाही तोवर सबका विकास ही बाब पोकळ आणि फसवी आहे़ या सरकारवर अंबानी, अदानी यांचे वर्चस्व असल्याचे सांगितले जाते़ ते नसल्याचे दाखवून देण्यासाठी सरकारला सर्वप्रथम तेलकिंमतीचा निर्णय करावा लागेल़ रोजगारवृद्धीसाठी मनरेगा जास्त प्रभावीपणे राबवावी लागेल़ पारदर्शी कारभाराची सुरवात निवडणूक खर्चाचा सर्व तपशील जाहीर करून करावा लागेल़ महागाई कमी करणे, इंधनआयातीवरील अवलंबित्व कमी करणे, धान्यनिर्यात बंद करणे या गोष्टी सरकारने कराव्यात. आमचा विकासाला आंधळा विरोध नाही तर आंधळ्या विकासाला विरोध आहे, असे प्रा़ देसरडा यांनी सांगितले़