शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

विकासाचा दहशतवाद धोक्याचा : प्रा़ एच़ एम़ देसरडा

By admin | Updated: May 31, 2014 22:28 IST

मूलभूत उद्दिष्टांशी विसंगत आहे, असे प्रतिपादन नामवंत अर्थतज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा़ एच़ एम़ देसरडा यांनी केले़

एच़ एम़ देसरडा : आंधळ्या विकासाला विरोधपुणे : नवीन सरकार स्थापनेनंतर देशातील अभिजन- महाजन धनदांडग्या जाती वर्गाने विकास मूलतत्ववादाचा जो गजर सुरू केला आहे तो समतामूलक शाश्वत विकासासाठी मोठा धोका असून भारतीय संविधानाच्या मूलभूत उद्दिष्टांशी विसंगत आहे, असे प्रतिपादन नामवंत अर्थतज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा़ एच़ एम़ देसरडा यांनी केले़ प्रा़ देसरडा म्हणाले, आजमितीला मुख्य प्रश्न आहे़ कुणाचा विकास कशाचा विकास? जमीन, पाणी, वने, कुरणे, जैवविविधता याचा खातमा व मानवी हक्काचा बळी देऊन होत असलेला विकास हा धोकादायक असून त्यांची सद्दी केव्हाच संपली आहे़ २१ व्या शतकात हवामान बदलाचे वास्तव लक्षात न घेता कोणत्याही प्रकल्पाचा विचार आत्मघातकी असल्याची बाब आता कुणी अमान्य करू शकत नाही़ सरकारने कितीही सदिच्छापर गोष्टी जाहीर केल्या तरी सामाजिक - आर्थिक व्यवस्था आणि राजकीय अर्थशास्त्राची सरंजामी, भांडवली, तथाकथित समाजवादी, बांडगुळी संरचना ढाचा व घाट बदलत नाही तोवर सबका विकास ही बाब पोकळ आणि फसवी आहे़ या सरकारवर अंबानी, अदानी यांचे वर्चस्व असल्याचे सांगितले जाते़ ते नसल्याचे दाखवून देण्यासाठी सरकारला सर्वप्रथम तेलकिंमतीचा निर्णय करावा लागेल़ रोजगारवृद्धीसाठी मनरेगा जास्त प्रभावीपणे राबवावी लागेल़ पारदर्शी कारभाराची सुरवात निवडणूक खर्चाचा सर्व तपशील जाहीर करून करावा लागेल़ महागाई कमी करणे, इंधनआयातीवरील अवलंबित्व कमी करणे, धान्यनिर्यात बंद करणे या गोष्टी सरकारने कराव्यात. आमचा विकासाला आंधळा विरोध नाही तर आंधळ्या विकासाला विरोध आहे, असे प्रा़ देसरडा यांनी सांगितले़