शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

मुख्यमंत्र्यांकडून फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण - संजय राऊत

By admin | Updated: June 9, 2017 18:03 IST

सत्तेतून बाहेर पडलो तर फरक पडणार नाही. भाजपाच्या आधी मध्यवधी निवडणुकीला आम्ही तयार आहोत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - सत्तेतून बाहेर पडलो तर फरक पडणार नाही. भाजपाच्या आधी मध्यवधी निवडणुकीला आम्ही तयार आहोत. जर सरकारला मध्यावधी निवडणुका नको असतील, तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. सत्तेतून बाहेर पडायला फारसा वेळ लागणार नाही. कोणत्याही प्रश्नावर बोललं तर भाजपला राग येते असेल, तर तसं त्यांनी बोलावं असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अन्यथा सरकारचा गळा दाबायला वेळ लागणार नाही, हा आमचा इशाराच आहे असे समजा असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर टिका केली. आयबीएन लोकमतच्या चर्चा सत्रात ते सहभागी झाले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घणाघाती टीका केली. मुख्यमंत्र्यांकडून फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण केल जात आहे. मुख्यमंत्र्यांनी राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोतांमध्ये फूट पाडली असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. राजकीय कार्यकर्ता हा शेतकरी नसतो का ? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे बोलताना ते म्हणाले सरसंघचालकाचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे करुन आम्ही भाजपावर कोणताही दबाव आणत नाही. राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत नाही, जर अर्ज भरला तर पाहू असे म्हणतं त्यांनी सावध भूमिका घेतली.