शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

महामार्गावरील थांबे ठरताहेत धोकादायक

By admin | Updated: April 27, 2016 01:58 IST

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वलवण गावाच्या हद्दीतील बसथांबे मृत्यूचे सापळे बनले आहेत.

लोणावळा : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वलवण गावाच्या हद्दीतील बसथांबे मृत्यूचे सापळे बनले आहेत. हे थांबे तातडीने बंद करा, अशी मागणी नागरिक करत आहेत. सोमवारी या ठिकाणी बसने धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जायबंदी झाला. यापूर्वीदेखील या ठिकाणांवर चार ते पाच प्राणांतिक अपघात झाले असून, किरकोळ अपघात कायम होत असतात. असे हे धोकादायक थांबे तातडीने बंद न केल्यास या ठिकाणांवर आंदोलन करण्यात येणार आहे. मुळातच राष्ट्रीय महामार्ग अरुंद मार्ग असलेल्या वलवण गावात दोन खासगी हॉटेलांना महाराष्ट्र परिवहन विभागाचे अधिकारी व संबंधित मंडळींनी आर्थिक लागेबांध्यावर काही बस थांबवण्याची परवानगी दिली आहे. वास्तवात मात्र लोणावळा शहरातील अधिकृत बसस्थानकात थांबत नाहीत. एवढ्या बस या थांब्यावर थांबतात. यातील काही अधिकृत तर काही अनधिकृत असतात. या बदल्यात हॉटेलचालकांकडून एसटीचे चालक व वाहक यांना फुकट जेवण, मिनिरल वॉटर व पैसे दिले जात असल्याची नागरिकांची ओरड आहे. तर लोणावळा महाविद्यालयासमोरील एका खासगी बसचे हॉटेल आहे. दिवस-रात्र या ठिकाणी बसेसची वर्दळ सुरू असते. अतिशय धोकादायक पद्धतीने बसचे चालक या ठिकाणांवर बस आत-बाहेर करतात. यामुळे येथे सातत्याने अपघात घडत आहेत. द्रुतगती महामार्गाचे मुख्य सर्कल, लोणावळा महाविद्यालय याच भागात आहे. तसेच ग्रामीण भागातून शहरात जाताना याच मार्गावरून नागरिकांना दुचाकीवरून ये-जाकरावी लागत असल्याने हा संपूर्ण परिसर वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.(वार्ताहर)