शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

बिबट्याची दहशत

By admin | Updated: May 21, 2014 00:28 IST

बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

अकोला: बार्शिटाकळी तालुक्यातील मिर्झापूर - मांगूळ परिसरात गत आठ दिवसांपासून एक मादी बिबट व तिच्या दोन पिलांचे वास्तव्य असून, त्यामुळे परिसरातील गावांत दहशतीचे वातावरण आहे.परिसरातील शेतकर्‍यांना गत काही दिवसांपासून दररोज या बिबटांचे दर्शन होत असल्यामुळे ते शेतात जाण्यास धजावत नाहीत. सध्या शेतीची कामे जोरात सुरू आहेत; परंतु बिबट्याच्या वास्तव्यामुळे या कामांना खीळ बसली आहे. परिणामी ओलिताची कपाशी लावण्यास विलंब होत आहे. या परिसरात बागायती शेती असल्यामुळे वांगी, टमाटर, मिरची, पालक अशा पालेभाज्या मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. ही पिके दर आठवड्याला काढावी लागतात; परंतु गत आठवडाभरापासून बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे हा माल काढण्यास शेतकरी धजावत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी या बाबीची दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा व होणारे संभाव्य नुकसान टाळावे, अशी मागणी या परिसरातील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर मिर्झापूर सरपंचांसह ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.