शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

दंडुका न उगारताही लाखोंचा मोर्चा शांततेत

By admin | Updated: October 17, 2016 04:14 IST

एक मराठा, लाख मराठा... असे फलक घेऊन तीनहातनाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडकलेला मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेने पार पडला

ठाणे : एक मराठा, लाख मराठा... असे फलक घेऊन तीनहातनाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडकलेला मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेने पार पडला. मोर्चात कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा घोषणाबाजी नसल्याने पोलिसांनाही कुठेही ‘दंडुकेबाजी’ करावी लागली नाही. त्यामुळे कॉन्स्टेबलपासून ते पोलीस आयुक्तांपर्यंत सर्व पोलिसांनी या मोर्चाचे कौतुक केले.तीनहातनाक्यावर कोपरी, माजिवडा, मुलुंड चेकनाका आणि नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, शहापूर आणि पालघर जिल्ह्यातील मराठाबांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तीनहातनाक्यापासून सुरु झालेल्या या मोर्चामध्ये सुरुवातीला विद्यार्थिनी, महिला त्यापाठोपाठ पुरुष मंडळी सहभागी झाले होते.या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त पराग मणेरे, वागळे इस्टेट विभागाचे उपायुक्त सुनील लोखंडे आणि ठाण्याचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्यासह ३०० अधिकारी आणि दोन हजार पोलीस तसेच राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्यांची जादा कुमकही तैनात करण्यात आलेली होती. (प्रतिनिधी)>पोलीस-छायाचित्रकार यांच्यात किरकोळ वादतीनहातनाक्यावरील उड्डाणपुलावरून मोर्चाचे छायाचित्रण करण्यासाठी काही छायाचित्रकारांनी पुलाच्या कठड्यावर चढण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी एखादी दुर्घटना होऊ नये, यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित भुजबळ यांनी त्यांना अटकाव केला. यातूनच छायाचित्रकार आणि पोलिसांत किरकोळ वादाचा प्रकार घडला. निरीक्षक मांगले यांनी हा वाद सोडवला. मोर्चानंतर घरी परतणारे मराठाबांधव अत्यंत शिस्तीने आल्या मार्गाने परतत होते. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू होती.