शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

दंडुका न उगारताही लाखोंचा मोर्चा शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 20:02 IST

एक मराठा लाख मराठा, असे फलक घेऊन तीन हात नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत धडकलेला मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेने पार पडला.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 16 - एक मराठा लाख मराठा, असे फलक घेऊन तीन हात नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत धडकलेला मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेने पार पडला. मोर्चात कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा घोषणाबाजी नसल्याने पोलिसांनाही कुठेही दंडूकेबाजी करावी लागली नाही. त्यामुळे कॉन्स्टेबल पासून ते पोलीस आयुक्तांर्पयत सर्व पोलिसांनी या मोर्चाचे कौतुक केले.तीन हात नाक्यावर कोपरी, माजीवडा, मुलूंड चेक नाका आणि नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, शहापूर आणि पालघर जिल्हयातील मराठा बांधव मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. तीन हात नाक्यापासून सकाळी 11 वा. सुरुवात झालेल्या या मोर्चामध्ये सुरुवातीला विद्यार्थीनी, महिला त्यापाठोपाठ पुरुष मंडळी सहभागी झाले होते. कोपर्डी घटनेतील आरोपींना सहा महिन्यात फाशी देण्यात यावी आणि मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे आदी मागण्यांचे फलक आणि भगवे ङोंडे फडकवित हा मुक मोर्चा निघाला होता. या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त पराग मणोरे, वागळे इस्टेट विभागाचे उपायुक्त सुनिल लोखंडे आणि ठाण्याचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्यासह 3क्क् अधिकारी आणि दोन हजार तसेच राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्यांची जादा कुमकही तैनात करण्यात आलेली होती. मोर्चामध्ये घोषणाबाजी नसल्याने आणि कोणीही चिथावणीखोर भाषणबाजी करीत नसल्याने या मोर्चाच्या बंदोबस्ताचा तशा अर्थाने ताण वाटला नाही, असे एका अधिका:याने सांगितले. तर मोर्चाच्या शिस्तीबद्दल सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनीही कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांचे कौतुक केले. पोलिसांच्या मदतीला सुमारे तीन हजार स्वयंसेवक उत्स्फुर्तपणो सहभागी झाले होते. मोर्चाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तीन हात नाका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारे काही मार्ग वाहनांसाठी सकाळी 1क् ते दुपारी 3 वा. र्पयत बंद ठेवण्यात आले होते. नितिन कंपनी ते तीन हा नाक्याकडे जाणारा उड्डाणपूलाचा मार्ग खुला ठेवण्यात आला होता. तीन हात नाका ते गोखले रोड, मॉडेला चेक नाका ते तीन हात नाका, तीन हात नाका ते कोपरी आणि हरिनिवास ते तीन हात नाका हे मार्गही बंद ठेवण्यात आले होते. वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस उपायुक्त संदीप पालवे, सहायक पोलीस आयुक्त बी. आर. गीते, पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्यासह 51 अधिकारी आणि 370 कर्मचारी कार्यरत होते..............अधिकारी पत्रकार यांच्यात किरकोळ वादतीन हात नाक्यावरील उड्डाणपूलावरुन मोर्चाचे छायाचित्रण करण्यासाठी काही छायाचित्रकार पूलाच्या कठडयावर चढण्याचा प्रय} करीत होते. त्याठिकाणी एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित भुजबळ यांनी त्यांना अटकाव केला. यातूनच पत्रकार आणि त्यांच्यात किरकोळ वादाचा प्रकार घडला. निरीक्षक मांगले यांनी हा वाद सोडविला. मोर्चानंतर घरी परतणारे मराठा बांधव अत्यंत शिस्तीने आल्या मार्गाने परतत होते. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणारे मार्ग मोर्चानंतर अवघ्या दीड ते दोन तासातच रिकामे झाले आणि वाहतूकही सुरुळीत सुरु झाली.