शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

दंडुका न उगारताही लाखोंचा मोर्चा शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 20:02 IST

एक मराठा लाख मराठा, असे फलक घेऊन तीन हात नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत धडकलेला मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेने पार पडला.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 16 - एक मराठा लाख मराठा, असे फलक घेऊन तीन हात नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत धडकलेला मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेने पार पडला. मोर्चात कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा घोषणाबाजी नसल्याने पोलिसांनाही कुठेही दंडूकेबाजी करावी लागली नाही. त्यामुळे कॉन्स्टेबल पासून ते पोलीस आयुक्तांर्पयत सर्व पोलिसांनी या मोर्चाचे कौतुक केले.तीन हात नाक्यावर कोपरी, माजीवडा, मुलूंड चेक नाका आणि नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, शहापूर आणि पालघर जिल्हयातील मराठा बांधव मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. तीन हात नाक्यापासून सकाळी 11 वा. सुरुवात झालेल्या या मोर्चामध्ये सुरुवातीला विद्यार्थीनी, महिला त्यापाठोपाठ पुरुष मंडळी सहभागी झाले होते. कोपर्डी घटनेतील आरोपींना सहा महिन्यात फाशी देण्यात यावी आणि मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे आदी मागण्यांचे फलक आणि भगवे ङोंडे फडकवित हा मुक मोर्चा निघाला होता. या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त पराग मणोरे, वागळे इस्टेट विभागाचे उपायुक्त सुनिल लोखंडे आणि ठाण्याचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्यासह 3क्क् अधिकारी आणि दोन हजार तसेच राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्यांची जादा कुमकही तैनात करण्यात आलेली होती. मोर्चामध्ये घोषणाबाजी नसल्याने आणि कोणीही चिथावणीखोर भाषणबाजी करीत नसल्याने या मोर्चाच्या बंदोबस्ताचा तशा अर्थाने ताण वाटला नाही, असे एका अधिका:याने सांगितले. तर मोर्चाच्या शिस्तीबद्दल सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनीही कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांचे कौतुक केले. पोलिसांच्या मदतीला सुमारे तीन हजार स्वयंसेवक उत्स्फुर्तपणो सहभागी झाले होते. मोर्चाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तीन हात नाका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारे काही मार्ग वाहनांसाठी सकाळी 1क् ते दुपारी 3 वा. र्पयत बंद ठेवण्यात आले होते. नितिन कंपनी ते तीन हा नाक्याकडे जाणारा उड्डाणपूलाचा मार्ग खुला ठेवण्यात आला होता. तीन हात नाका ते गोखले रोड, मॉडेला चेक नाका ते तीन हात नाका, तीन हात नाका ते कोपरी आणि हरिनिवास ते तीन हात नाका हे मार्गही बंद ठेवण्यात आले होते. वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस उपायुक्त संदीप पालवे, सहायक पोलीस आयुक्त बी. आर. गीते, पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्यासह 51 अधिकारी आणि 370 कर्मचारी कार्यरत होते..............अधिकारी पत्रकार यांच्यात किरकोळ वादतीन हात नाक्यावरील उड्डाणपूलावरुन मोर्चाचे छायाचित्रण करण्यासाठी काही छायाचित्रकार पूलाच्या कठडयावर चढण्याचा प्रय} करीत होते. त्याठिकाणी एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित भुजबळ यांनी त्यांना अटकाव केला. यातूनच पत्रकार आणि त्यांच्यात किरकोळ वादाचा प्रकार घडला. निरीक्षक मांगले यांनी हा वाद सोडविला. मोर्चानंतर घरी परतणारे मराठा बांधव अत्यंत शिस्तीने आल्या मार्गाने परतत होते. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणारे मार्ग मोर्चानंतर अवघ्या दीड ते दोन तासातच रिकामे झाले आणि वाहतूकही सुरुळीत सुरु झाली.