शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

दमणगंगा-पिंजाळचा जुना करार रद्द, ठाणे-भिवंडी बायपास आठ पदरी बनविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:47 IST

विशेष प्रतिनिधी मुंबई : आघाडी सरकारच्या काळात दमणगंगा-पिंजाळ नदी जोड प्रकल्पाबाबत झालेला करार रद्द करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम तातडीने सुरू व्हावे, अशी गुजरातची इच्छा होती. मात्र, महाराष्ट्र सरकारचे काही आक्षेप होते. आता त्या बाबत महाराष्ट्राचे समाधान होईल, असा निर्णय घेऊन ५० टीएमसी पाणी गोदावरी खो-यात वळविले जाईल आणि त्याचा ...

विशेष प्रतिनिधी मुंबई : आघाडी सरकारच्या काळात दमणगंगा-पिंजाळ नदी जोड प्रकल्पाबाबत झालेला करार रद्द करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम तातडीने सुरू व्हावे, अशी गुजरातची इच्छा होती. मात्र, महाराष्ट्र सरकारचे काही आक्षेप होते. आता त्या बाबत महाराष्ट्राचे समाधान होईल, असा निर्णय घेऊन ५० टीएमसी पाणी गोदावरी खो-यात वळविले जाईल आणि त्याचा फायदा मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला तसेच मुंबईलादेखील होईल. या भागातील मोठी धरणे त्यामुळे दरवर्षी १०० टक्के भरतील, असे केंद्रीय जलसंपदा व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र परिषदेत सांगितले.पार-तापी योजनेचा फायदा नाशिक, धुळे, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना होणार आहे. विदर्भातील अत्यंत महत्त्वाकांक्षी असा गोसीखुर्द सिंचन प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प आहे. राज्य सरकारने त्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ ची डेडलाइन ठरविली आहे. तथापि, आज गडकरी यांनी आम्हाला हे काम ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.मुंबईतील रस्त्यांच्या दर्जा सुधारण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास आपला विभाग तयार आहे, असे भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. रस्ते बांधताना वा दुरुस्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञान महापालिकेने वापरायला हवे, असा सल्ला गडकरींनी दिला....तर राहुल गांधींना ५ हजार कोटी देऊ-राज्य सरकारची कर्जमाफी फसवी असून ३५ हजार कोटी नव्हे तर ५ हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे, असा आरोप कॉंग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केला आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मी राहुल गांधी यांना ५ हजार कोटी रुपये देतो. त्यांनी राज्यातील शेतकºयांचे कर्ज माफ करून दाखवावे. आमची कर्जमाफी ही देशातील आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी असेल, असा दावाही त्यांनी केला.ठाणे-भिवंडी बायपास आठ पदरी बनविणार-ठाणे-भिवंडी बायपास हा आठ पदरी बनविण्यात येईल आणि त्यासाठीच्या निविदा येत्या तीन महिन्यांत काढण्यात येतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली.मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेच्या कामाच्या पाच निविदा काढण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प ४४ हजार कोटी रुपयांचा आहे. या मार्गावरील वर्सोवा ब्रिजच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. त्याला पर्यावरणविषयक मंजुरी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आजच दिलेले आहेत. येत्या दीड महिन्यात ते काम सुरू होईल, असे गडकरी यांनी एका प्रश्नात सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी