शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

समन्वयाअभावीच नुकसान -पतंगराव

By admin | Updated: October 21, 2014 03:00 IST

राज्यात योग्य समन्वय नसल्यानेच कॉँग्रेसचे नुकसान झाले आहे. याबाबत आता उघडपणे व स्पष्ट बोलण्याची वेळ आली आहे.

सांगली : राज्यात योग्य समन्वय नसल्यानेच कॉँग्रेसचे नुकसान झाले आहे. याबाबत आता उघडपणे व स्पष्ट बोलण्याची वेळ आली आहे. जे घडले, त्याची स्पष्ट कल्पना दिल्लीला गेल्यानंतर पक्षश्रेष्ठींना देण्यात येईल, असे माजी मंत्री पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.मोदीलाट ओसरल्याचा आमचा समज चुकीचा ठरला. त्यातच कॉँग्रेसचा राज्यभरातील समन्वय योग्य नव्हता, असे ते म्हणाले. राज्यभरात पक्षाचे जे नुकसान झाले, त्याला मोदीलाटेसह अन्य स्थानिक कारणेही आहेत. याबाबतची चर्चा मुंबई व दिल्लीतही होईल, असे त्यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यात चार ठिकाणी राष्ट्रवादीने भाजपाला छुपा पाठिंबा दिला. या गोष्टी आता लोकांसमोर येत आहेत. यापुढे राज्यात असंगाशी संग करून चालणार नाही, असे ते म्हणाले. राज्यातही राष्ट्रवादीची अशीच भूमिका आहे. लग्नाला येऊ नको म्हणत असताना कोणत्या गाडीत बसू, असे राष्ट्रवादी विचारत आहे. भाजपाने पाठिंबा मागितला नसताना देखील राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा देऊ केला. या गोष्टी ते कशासाठी करीत आहेत, याची कल्पना राज्यातील जनतेला आली आहे. त्यामुळे यापुढील काळात काँग्रेसला स्पष्ट भूमिका घेऊन पुढे जाणे भाग आहे. राष्ट्रवादीने कॉँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असे मत मी मांडले होते. तसे झाले असते तर या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा राहिली असती, असेही कदम म्हणाले.