शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

दलित हत्याकांडाचे गूढ कायम

By admin | Updated: October 23, 2014 14:52 IST

तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिघा जणांची क्रूरपणे हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यच हादरले आहे.

पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिघा जणांची क्रूरपणे हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यच हादरले आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या मुळाशी पोहचण्यात पोलीस अद्याप यशस्वी झालेले नाहीत. सोनई व खर्डा येथील दलित हत्येचे प्रकरण ताजे असतानाच जवखेडे खालसा येथील हत्याकांडाने सर्वांनाच धक्का बसला आहे. घटनेमागे एखादे नाजूक प्रकरण असावे, त्या दिशेने प्राथमिक तपास सुरू असला तरी अन्य कारणेही तपासली जात आहेत. मात्र, त्याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दिवसभरात अनेक नेते व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. गावात मोठा बंदोबस्त लावण्यात आल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.गावामध्ये जाधव वस्तीवर संजय जाधव यांचे वडील रहातात. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, खा. दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे यांच्यासह दलित चळवळीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे आले होते. नगर जिल्ह्यात सातत्याने दलितांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे नगर दलित अत्याचार ग्रस्त जिल्हा जाहीर करावा, अशी मागणी खा. आठवले यांनी केली. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा छडा लावून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे हांडोरे म्हणाले. भाजपाच्या वतीने कुटुंबाला एक लाख रूपयांची मदत खा. गांधी यांनी जाहीर केली. नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत दलित हत्याकांडाच्या घटना वारंवार घडत आहेत. जवखेडे खालसा येथील हत्याकांडाने जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्थेसह सामाजिक सलोख्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संजय जगन्नाथ जाधव (४२), जयश्री संजय जाधव (३८) व सुनील संजय जाधव (१९) यांची धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेहाचे तुकडे विहिरीत टाकल्याची भीषण घटना मंगळवारी उघडकीस आली होती. जाधव कुटुंब सुस्वभावी होते. त्यांचा कोणाशीही वाद नव्हता. (प्रतिनिधी)