शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

दलित हत्याकांडाचे गूढ कायम

By admin | Updated: October 23, 2014 14:52 IST

तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिघा जणांची क्रूरपणे हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यच हादरले आहे.

पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिघा जणांची क्रूरपणे हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यच हादरले आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या मुळाशी पोहचण्यात पोलीस अद्याप यशस्वी झालेले नाहीत. सोनई व खर्डा येथील दलित हत्येचे प्रकरण ताजे असतानाच जवखेडे खालसा येथील हत्याकांडाने सर्वांनाच धक्का बसला आहे. घटनेमागे एखादे नाजूक प्रकरण असावे, त्या दिशेने प्राथमिक तपास सुरू असला तरी अन्य कारणेही तपासली जात आहेत. मात्र, त्याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दिवसभरात अनेक नेते व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. गावात मोठा बंदोबस्त लावण्यात आल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.गावामध्ये जाधव वस्तीवर संजय जाधव यांचे वडील रहातात. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, खा. दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे यांच्यासह दलित चळवळीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे आले होते. नगर जिल्ह्यात सातत्याने दलितांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे नगर दलित अत्याचार ग्रस्त जिल्हा जाहीर करावा, अशी मागणी खा. आठवले यांनी केली. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा छडा लावून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे हांडोरे म्हणाले. भाजपाच्या वतीने कुटुंबाला एक लाख रूपयांची मदत खा. गांधी यांनी जाहीर केली. नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत दलित हत्याकांडाच्या घटना वारंवार घडत आहेत. जवखेडे खालसा येथील हत्याकांडाने जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्थेसह सामाजिक सलोख्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संजय जगन्नाथ जाधव (४२), जयश्री संजय जाधव (३८) व सुनील संजय जाधव (१९) यांची धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेहाचे तुकडे विहिरीत टाकल्याची भीषण घटना मंगळवारी उघडकीस आली होती. जाधव कुटुंब सुस्वभावी होते. त्यांचा कोणाशीही वाद नव्हता. (प्रतिनिधी)