शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

फक्त मतांसाठी राष्ट्रपती निवडणुकीत दलित चेहरा

By admin | Updated: June 20, 2017 03:00 IST

राष्ट्रपतीपदासाठी देशाचे भले करणारा लायक उमेदवार हवा. केवळ दलित समाजाची मते मिंळविण्यासाठी रामनाथ कोविंद यांच्या रूपाने दलित चेहरा पुढे करण्यात आला असेल तर त्यात आम्हाला रस नाही

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी देशाचे भले करणारा लायक उमेदवार हवा. केवळ दलित समाजाची मते मिंळविण्यासाठी रामनाथ कोविंद यांच्या रूपाने दलित चेहरा पुढे करण्यात आला असेल तर त्यात आम्हाला रस नाही, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळे संकेत दिले. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत उद्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचेही ते म्हणाले.शिवसेनेच्या ५१व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक, अमित शहा यांची ‘मातोश्री’ भेट या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. पण अमित शहा यांच्याबाबत उद्धव यांनी आपल्या भाषणात चकार शब्द काढला नाही. मात्र, राष्ट्रपतीपदासाठी भाजपाने रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे करून दलित मतांचे राजकारण खेळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मात्र त्यांनी भाषणात केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत मंगळवारी शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत भाजपाच्या नावावर चर्चा करू. सीमा अशांत आहे, काश्मीर पेटलंय, गोरखा मुक्तीचे आंदोलन पुन्हा पेटले असून अशा स्थितीत ही निवडणूक होत आहे. देशाचे भले करणारा उमेदवार दिल्यास आमचा भाजपाला पाठिंबा आहे. पण, दलित मतांसाठी उमेदवार दिला असेल तर त्यात शिवसेनेला रस नाही, असे उद्धव म्हणाले. भाजपाकडून फक्त निवडणुकांचे राजकारण सुरू आहे. राज्याराज्यातील लोकसंख्या पाहून गोहत्या बंदीचे निर्णय घेतले जात आहेत. मग, देशभर समान नागरी कायदा कसा लागू करणार, असा सवाल उद्धव यांनी केला. तसेच हिंदूंच्या हितासाठी स्वच्छ मनाने आम्ही मोहन भागवतांचे नाव सुचविले होते. त्यांच्या नावाबाबत काही अडचण असेल तर शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असणाऱ्या स्वामीनाथन यांचे नाव पुढे केले होते, असेही ठाकरे म्हणाले. मध्यावधी निवडणुकांबाबत भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत उद्धव म्हणाले की, सदासर्वदा तुम्हीच निवडून याल या भ्रमातून बाहेर या. राज्यातील वातावरण बदलत आहे. शेतकरी पेटलाय. त्यामुळे आम्हाला मध्यावधीची धमकी देऊ नका. हिंमत असेल तर आता निवडणुका घ्या आम्ही तयार आहोत. २०१४ साली जे हुकले ते मिळवण्यासाठी शिवसैनिक ठिणगी नव्हे तर वणव्याप्रमाणे पेटून उठतील आणि भगवा फडकेल, अशा शब्दांत उद्धव यांनी भाजपाचा समाचार घेतला. मध्यावधी निवडणुकांपेक्षा शेतकरी आत्महत्यांची आम्हाला चिंता आहे. कर्जमुक्ती करत नाही तोपर्यंत सरकारला सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनात नुसता हात नाही तर शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे. वेड्यावाकड्या अटी टाकून शेतकऱ्यांना गांगरून टाकणार असाल तर तो कागद मी फाडून टाकेन. शेतकऱ्यांना मोकळ्या मनाने आणि सढळ हाताने कर्जमाफी द्या, अशी मागणी उद्धव यांनी केली.