शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

फक्त मतांसाठी राष्ट्रपती निवडणुकीत दलित चेहरा

By admin | Updated: June 20, 2017 03:00 IST

राष्ट्रपतीपदासाठी देशाचे भले करणारा लायक उमेदवार हवा. केवळ दलित समाजाची मते मिंळविण्यासाठी रामनाथ कोविंद यांच्या रूपाने दलित चेहरा पुढे करण्यात आला असेल तर त्यात आम्हाला रस नाही

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी देशाचे भले करणारा लायक उमेदवार हवा. केवळ दलित समाजाची मते मिंळविण्यासाठी रामनाथ कोविंद यांच्या रूपाने दलित चेहरा पुढे करण्यात आला असेल तर त्यात आम्हाला रस नाही, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळे संकेत दिले. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत उद्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचेही ते म्हणाले.शिवसेनेच्या ५१व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक, अमित शहा यांची ‘मातोश्री’ भेट या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. पण अमित शहा यांच्याबाबत उद्धव यांनी आपल्या भाषणात चकार शब्द काढला नाही. मात्र, राष्ट्रपतीपदासाठी भाजपाने रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे करून दलित मतांचे राजकारण खेळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मात्र त्यांनी भाषणात केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत मंगळवारी शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत भाजपाच्या नावावर चर्चा करू. सीमा अशांत आहे, काश्मीर पेटलंय, गोरखा मुक्तीचे आंदोलन पुन्हा पेटले असून अशा स्थितीत ही निवडणूक होत आहे. देशाचे भले करणारा उमेदवार दिल्यास आमचा भाजपाला पाठिंबा आहे. पण, दलित मतांसाठी उमेदवार दिला असेल तर त्यात शिवसेनेला रस नाही, असे उद्धव म्हणाले. भाजपाकडून फक्त निवडणुकांचे राजकारण सुरू आहे. राज्याराज्यातील लोकसंख्या पाहून गोहत्या बंदीचे निर्णय घेतले जात आहेत. मग, देशभर समान नागरी कायदा कसा लागू करणार, असा सवाल उद्धव यांनी केला. तसेच हिंदूंच्या हितासाठी स्वच्छ मनाने आम्ही मोहन भागवतांचे नाव सुचविले होते. त्यांच्या नावाबाबत काही अडचण असेल तर शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असणाऱ्या स्वामीनाथन यांचे नाव पुढे केले होते, असेही ठाकरे म्हणाले. मध्यावधी निवडणुकांबाबत भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत उद्धव म्हणाले की, सदासर्वदा तुम्हीच निवडून याल या भ्रमातून बाहेर या. राज्यातील वातावरण बदलत आहे. शेतकरी पेटलाय. त्यामुळे आम्हाला मध्यावधीची धमकी देऊ नका. हिंमत असेल तर आता निवडणुका घ्या आम्ही तयार आहोत. २०१४ साली जे हुकले ते मिळवण्यासाठी शिवसैनिक ठिणगी नव्हे तर वणव्याप्रमाणे पेटून उठतील आणि भगवा फडकेल, अशा शब्दांत उद्धव यांनी भाजपाचा समाचार घेतला. मध्यावधी निवडणुकांपेक्षा शेतकरी आत्महत्यांची आम्हाला चिंता आहे. कर्जमुक्ती करत नाही तोपर्यंत सरकारला सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनात नुसता हात नाही तर शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे. वेड्यावाकड्या अटी टाकून शेतकऱ्यांना गांगरून टाकणार असाल तर तो कागद मी फाडून टाकेन. शेतकऱ्यांना मोकळ्या मनाने आणि सढळ हाताने कर्जमाफी द्या, अशी मागणी उद्धव यांनी केली.