शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

डहाणू रस्त्यावरील पूल धोकादायक

By admin | Updated: March 7, 2017 03:03 IST

डहाणू तालुक्यातील चारोटी-डहाणू रस्त्यावरील पुलांची बिकट अवस्था झाली आहे.

शशिकांत ठाकूर,कासा- डहाणू तालुक्यातील चारोटी-डहाणू रस्त्यावरील पुलांची बिकट अवस्था झाली आहे. काही जुनाट पूल धोकादायक झाले आहेत. या पुलांवर अनेक वेळा लहान मोठे अपघात पुलांचे संरक्षक कठडे तुटल्याने होतात. आशागड, गंजाड, बधना या तिन्ही नदीवरील पुलांची दुरावस्था झाली आहे. महाडच्या सावित्री नदी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ही दुरावस्था गंभीर मानली जात आहे. हा संपूर्ण मार्ग २४ किमीचा असून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला आणि तालुक्याच्या ठिकाणाला जोडणारा मुख्य रस्ता आहे. रस्तयावर आशागड, गंजाड, बधना, असे मीन मोठ्या नदीवरील पूल आहेत. काही दिवसापूर्वी या रस्त्यावरील सुसरी नदीवर असलेल्या बधना पुलाला कठडे नसल्याने एक कार नदीत पडली होती. हा पूल वळणाचा असून गेल्या पाच वर्षांपासून नादुरुस्त आहे.>पिलर झाले कमजोरया रस्त्यावरील तीनही पूल धोकादायक असून येथे कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावण्यात आले नाहीत. बधनापूलाच्या खालचा स्लॅब जीर्ण झाला असून आतमधील लोखंडी सळया पूर्णपणे दिसू लागल्या आहेत. तसेच त्याचे पिलरही कमजोर झाले आहेत. पुलाचे तत्काळ स्ट्रक्चरल आॅडिट करून सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करण्याची गरज आहे.महाड तालुक्यातील सावित्री नदीची घटना अलिकडचीच असल्याने त्याची पुनरावृत्ती डहाणूत न व्हावी अशी मागणी होत आहे. आशागड, गंजाड, बधना या नद्यावरील पुलांची दुरावस्था पहाता स्ट्रक्चरल आॅडिट होणे गरजेचे आहे.