शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

दादर-रत्नागिरी पॅसेंजरला मिळाला ‘लेटमार्क’

By admin | Updated: June 5, 2014 01:23 IST

कोकणच्या सेवेत असणा:या गाडय़ाही आता वेळेवर धावत नसल्यामुळे त्यांची वाताहतच होत असल्याचे आता समोर येत आहे.

मुंबई : रेल्वे अर्थसंकल्पात कोकणवासीयांना वाटाण्याच्या अक्षता  दाखवल्या जात असतानाच प्रत्यक्षात कोकणच्या सेवेत असणा:या गाडय़ाही आता वेळेवर धावत नसल्यामुळे त्यांची वाताहतच होत असल्याचे आता समोर येत आहे. दादर-रत्नागिरी या पॅसेंजर ट्रेनला सातत्याने लेटमार्क मिळत असून मे महिन्यात तब्बल 29 वेळा ही ट्रेन उशिराने धावल्याचे रेल्वेतील सूत्रंकडून सांगण्यात आले आहे. या लेटमार्कमुळे या पॅसेंजर ट्रेनला दिवा स्थानकातूनच सोडले जात आहे. त्याचाच मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. 
दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन ही आठवडाभर धावते. दादर स्थानकातून ही ट्रेन दुपारी 1.35 वाजता सुटते आणि रत्नागिरीत त्याच दिवशी रात्री 12.50 वाजता पोहोचते. तर ही ट्रेन रत्नागिरीतून पहाटे साडेपाच वाजता सुटते आणि त्याचदिवशी दुपारी दीड र्पयत दादरला येते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या ट्रेनला बराच लेटमार्क मिळत असून त्यामुळे दादर स्थानकाऐवजी दिवा स्थानकातूनच ट्रेन सोडली जात आहे. दादर स्थानकात ट्रेनची वाट पाहात उभे असलेल्या प्रवाशांना याची माहिती एक ते दीड तास अगोदर दिली जात असल्यामुळे त्यांची तारांबळ उडते आणि आपल्याजवळील सामान घेऊन दिवा स्थानक गाठावे लागते. याबाबत रेल्वेतील सूत्रंकडून सांगण्यात आले की, मे महिन्यात तर या ट्रेनला तब्बल 29 दिवस लेटमार्क लागले आहे. यातील तीन दिवस कोकण रेल्वेकडून तर 26 दिवस मध्य रेल्वेकडूनच लेटमार्क लागला आहे. तर फक्त दोन वेळा पॅसेंजर ट्रेन मध्य रेल्वेकडून वेळेवर धावली आहे. हे पाहता मध्य रेल्वेकडूनच ट्रेन उशिराने सोडण्यात येत असल्याचे आणि तिला लेटमार्क मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. मध्य रेल्वेकडून 26 दिवस ही ट्रेन दीड ते साडेतीन तास उशिराने धावत राहिली असल्याचे सांगण्यात आले. मध्य रेल्वेकडून उपनगरीय लोकल गाडय़ांनाच प्राधान्य दिले जाते. या गाडीची वेळ पाहता ती मुंबईत आल्यावर लोकल गाडय़ांना लेटमार्क मिळू शकतो, या भीतीने पॅसेंजर ट्रेनला दिवा स्थानकात शेवट करून त्याच स्थानकातून पुन्हा रत्नागिरीसाठी सोडले जात असल्याचे सांगण्यात आले. 
काही तांत्रिक समस्यांमुळे कोकण रेल्वेकडून अवघे तीन दिवस ही ट्रेन उशिराने धावली. त्यामध्ये एक ते दोन तास ट्रेन उशिराने धावल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेकडून मोठय़ा प्रमाणात लेटमार्क लागत असूनही त्यावर तोडगा न काढता कोकणवासीयांची हेळसांड करण्याचे काम केले जात आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांना विचारले असता, ही ट्रेन कोकणकडूनच उशिराने येत असल्याने तिचा दिवा स्थानकात शेवट करीत असल्याचे सांगितले. मात्र पॅसेंजर ट्रेन उशिराने धावत असल्याने त्याची सविस्तर माहिती मागितली असता ते देऊ शकले नाहीत. 
 
तारांबळ उडते
दादर स्थानकाऐवजी दिवा स्थानकातून ट्रेन सोडली जात आहे. दादर स्थानकात ट्रेनची वाट पाहात उभे असलेल्या प्रवाशांना याची माहिती एक ते दीड तास अगोदर दिली जात असल्यामुळे त्यांची तारांबळ उडते आणि आपल्याजवळील सामान घेऊन दिवा स्थानक गाठावे लागते.