शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
6
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
7
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
8
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
9
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
10
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
11
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
12
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
13
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
14
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
15
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
16
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
17
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
18
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
19
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
20
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

दादर-रत्नागिरी पॅसेंजरला मिळाला ‘लेटमार्क’

By admin | Updated: June 5, 2014 01:23 IST

कोकणच्या सेवेत असणा:या गाडय़ाही आता वेळेवर धावत नसल्यामुळे त्यांची वाताहतच होत असल्याचे आता समोर येत आहे.

मुंबई : रेल्वे अर्थसंकल्पात कोकणवासीयांना वाटाण्याच्या अक्षता  दाखवल्या जात असतानाच प्रत्यक्षात कोकणच्या सेवेत असणा:या गाडय़ाही आता वेळेवर धावत नसल्यामुळे त्यांची वाताहतच होत असल्याचे आता समोर येत आहे. दादर-रत्नागिरी या पॅसेंजर ट्रेनला सातत्याने लेटमार्क मिळत असून मे महिन्यात तब्बल 29 वेळा ही ट्रेन उशिराने धावल्याचे रेल्वेतील सूत्रंकडून सांगण्यात आले आहे. या लेटमार्कमुळे या पॅसेंजर ट्रेनला दिवा स्थानकातूनच सोडले जात आहे. त्याचाच मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. 
दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन ही आठवडाभर धावते. दादर स्थानकातून ही ट्रेन दुपारी 1.35 वाजता सुटते आणि रत्नागिरीत त्याच दिवशी रात्री 12.50 वाजता पोहोचते. तर ही ट्रेन रत्नागिरीतून पहाटे साडेपाच वाजता सुटते आणि त्याचदिवशी दुपारी दीड र्पयत दादरला येते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या ट्रेनला बराच लेटमार्क मिळत असून त्यामुळे दादर स्थानकाऐवजी दिवा स्थानकातूनच ट्रेन सोडली जात आहे. दादर स्थानकात ट्रेनची वाट पाहात उभे असलेल्या प्रवाशांना याची माहिती एक ते दीड तास अगोदर दिली जात असल्यामुळे त्यांची तारांबळ उडते आणि आपल्याजवळील सामान घेऊन दिवा स्थानक गाठावे लागते. याबाबत रेल्वेतील सूत्रंकडून सांगण्यात आले की, मे महिन्यात तर या ट्रेनला तब्बल 29 दिवस लेटमार्क लागले आहे. यातील तीन दिवस कोकण रेल्वेकडून तर 26 दिवस मध्य रेल्वेकडूनच लेटमार्क लागला आहे. तर फक्त दोन वेळा पॅसेंजर ट्रेन मध्य रेल्वेकडून वेळेवर धावली आहे. हे पाहता मध्य रेल्वेकडूनच ट्रेन उशिराने सोडण्यात येत असल्याचे आणि तिला लेटमार्क मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. मध्य रेल्वेकडून 26 दिवस ही ट्रेन दीड ते साडेतीन तास उशिराने धावत राहिली असल्याचे सांगण्यात आले. मध्य रेल्वेकडून उपनगरीय लोकल गाडय़ांनाच प्राधान्य दिले जाते. या गाडीची वेळ पाहता ती मुंबईत आल्यावर लोकल गाडय़ांना लेटमार्क मिळू शकतो, या भीतीने पॅसेंजर ट्रेनला दिवा स्थानकात शेवट करून त्याच स्थानकातून पुन्हा रत्नागिरीसाठी सोडले जात असल्याचे सांगण्यात आले. 
काही तांत्रिक समस्यांमुळे कोकण रेल्वेकडून अवघे तीन दिवस ही ट्रेन उशिराने धावली. त्यामध्ये एक ते दोन तास ट्रेन उशिराने धावल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेकडून मोठय़ा प्रमाणात लेटमार्क लागत असूनही त्यावर तोडगा न काढता कोकणवासीयांची हेळसांड करण्याचे काम केले जात आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांना विचारले असता, ही ट्रेन कोकणकडूनच उशिराने येत असल्याने तिचा दिवा स्थानकात शेवट करीत असल्याचे सांगितले. मात्र पॅसेंजर ट्रेन उशिराने धावत असल्याने त्याची सविस्तर माहिती मागितली असता ते देऊ शकले नाहीत. 
 
तारांबळ उडते
दादर स्थानकाऐवजी दिवा स्थानकातून ट्रेन सोडली जात आहे. दादर स्थानकात ट्रेनची वाट पाहात उभे असलेल्या प्रवाशांना याची माहिती एक ते दीड तास अगोदर दिली जात असल्यामुळे त्यांची तारांबळ उडते आणि आपल्याजवळील सामान घेऊन दिवा स्थानक गाठावे लागते.