शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

दादा व बाबांमुळे महाराष्ट्र खड्ड्यात - गडकरी

By admin | Updated: September 28, 2014 14:15 IST

वीज नसताना राज्यात उद्योगधंदे कुठून येणार व रोजगार कसा निर्माण होणार असा सवाल उपस्थित करत दादा व बाबांमुळेच राज्य खड्ड्यात गेल्याची घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. २८ - महाराष्ट्रात वीज नसताना राज्यात उद्योगधंदे कुठून येणार व रोजगाराच्या नवीन संधी कशा निर्माण होणार असा सवाल उपस्थित करत दादा व बाबांमुळेच राज्य खड्ड्यात गेल्याची घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अजित पवार व पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली आहे. 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांंनी प्रचाराचा नारळ फोडला. नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरींनी सभा घेतली. या सभेत गडकरींनी  काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. पृथ्वीराज चव्हाण हे राज्यातील आत्तापर्यंतचे सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असल्याची बोचरी टीका नितीन गडकरींनी केली. काँग्रेसनेच जातीयवादाचे विष कालवले असे सांगत गडकरींनी सोनिया गांधींवरही निशाणा साधला. महाराष्ट्रात शेतक-यांनी आत्महत्या का केल्या असा सवाल गडकरींनी शरद पवार यांना विचारला आहे. आघाडीमुळेच राज्य दिवाळखोरीला निघाले असा आरोपही त्यांनी केला आहे. सर्वांना समान न्याय हेच भाजपचे सूत्र असून हिनासारख्या १०० आदिवासी मुलींनी डॉक्टर व्हावे यासाठी भाजप प्रयत्न करेल असे आश्वासनही त्यांनी दिले.  आज दिवसभरात गडकरी उत्तर महाराष्ट्रात आणखी चार सभा घेणार आहेत. यासंपूर्ण सभेत गडकरींनी एकदाही शिवसेनेवर टीका केली नाही.