शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

दाभोलकर, पानसरेंची हत्या करणा-या गोडसेंच्या वारसदार प्रवृत्तीचा निषेध - श्रीपाल सबनीस

By admin | Updated: January 16, 2016 14:55 IST

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व कलबुर्गी यांची हत्या नथुराम गोडसेच्या वारसदारां प्रवृत्तींनी केली असून या ह्त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो

ऑनलाइन लोकमत
ग्यानबा तुकाराम नगरी (पिंपरी चिंचवड) दि. १६ - नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व कलबुर्गी यांची हत्या नथुराम गोडसेच्या वारसदारां प्रवृत्तींनी केली असून या ह्त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असे ८९व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. प्रदीर्घ भाषण पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आल्याचेही ते म्हणाले, व त्यांनी छोटेखानी उत्स्फूर्त भाषण यावेळी केले.
सबनीस यांच्या ताज्या वक्तव्यांवर टीकेची झोड उठली होती, काही प्रसारमाध्यमांनीही त्यांना लक्ष्य केले होते. याचा संदर्भ देताना प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा खांब मानली जातात, परंतु हीच प्रसारमाध्यमे तिरडीची ताटी होतात की काय असं वाटावं अशी स्थिती असल्याचंही मत खेदानं व्यक्त केलं.
 
सबनीस यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे:
 
- जात संपल्यावर तटस्थ इतिहास लिहिता येतो.
- राज्य व देश सहिष्णू असल्याचं सांगत श्रीपाल सबनीसांनी साहित्य हे अभिजनांप्रमाणेच बहुजनांचंही
- सगळे ब्राह्मण गोडसे असतात का, असं विचारत वैचारिक मर्यादा न घालण्याचं आवाहन श्रीपाल सबनीसांनी केलं आहे.
- सत्तेच्या सोयीनुसार सत्य साहित्यिकांच्या तोंडी येईल अशी अपेक्षा राजकीय नेत्यांनी बाळगू नये.
- शिवाजी महाराजांचं राज्य जातिधर्म निरपेक्ष होतं. आपण कधी शिवाजी महाराजांना ब्राह्मणाविरोधात उभं केलं, कधी मराठ्यांविरोधात उभं केलं, कधी मुसलमानांविरोधात उभं केलं, ही दुर्दैवी बाब आहे.
- अध्यक्षपदाच्या निवडीवरून मला विरोधकांनी प्रचंड घेरलं.
- संतांच्या वाटणीमुळे महाराष्ट्राचं वाटोळं झालं.
- देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने महाराष्ट्राला अत्यंत बुद्धीवादी, प्रामाणिक व हुषार मुख्यमंत्री लाभला आहे.
- डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कलबुर्गींची हत्या नथुराम गोडसेंच्या वारसदारांनी केल्याचे सांगत अशा प्रवृत्तींचा निषेध साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषण करताना केला.