शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

दाभोलकर, कलबुर्गी खून तपासात समन्वय हवा

By admin | Updated: February 13, 2016 02:24 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि प्रा. कलबुर्गी या तिघांच्याही खून प्रकरणात एकाच प्रकारचे पिस्तूल वापरले गेल्याचा नवा पुरावा कर्नाटक सीआयडी कडून पुढे आला

नवी दिल्ली : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि प्रा. कलबुर्गी या तिघांच्याही खून प्रकरणात एकाच प्रकारचे पिस्तूल वापरले गेल्याचा नवा पुरावा कर्नाटक सीआयडी कडून पुढे आला आहे, या पार्श्वभूमीवर दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी हत्याकांडांची चौकशी करणाऱ्या यंत्रणा अनुक्रमे सीबीआय, सीआयटी आणि कर्नाटक सीआयडी अशा तीनही यंत्रणांच्या तपासकार्यात सूसूत्रता आणि वेग हवा. ही तातडीची गरज आहे अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी वूमन्स प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या तिघांचेही खून व्यक्तिगत वैरातून अथवा कौटुंबिक कलहातून झाले नाहीत तर तिन्ही व्यक्ती वैचारिक मतभिन्नतेच्या बळी आहेत. तिन्ही खुनांची पार्श्वभूमी समान आहे, आजवर मिळालेल्या पुराव्यातून हेच सत्य सामोरे आले आहे, मग या तिघांनाही सातत्याने विरोध करणाऱ्या संघटना आणि गटांच्या चौकशीसाठी तपास यंत्रणांना इतका वेळ का लागतो आहे? असा सवाल उपस्थित करीत डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, पानसरे खून खटल्यात सनातन संस्थेच्या समीर गायकवाड विरूध्द आरोपपत्र दाखल झाले आहे. गायकवाडचे संबंध नेमके कोणा कोणाशी होते, याचा कसोशीने शोध तपास यंत्रणांनी घेतल्यास, ज्यांच्या विरोधात मडगाव बॉम्बहल्ला प्रकरणी आंतरराष्ट्रीय रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे, ते सनातन संस्थेचे रूद्र पाटील, सारंग अकोलकर, जयप्रकाश हेगडे व प्रवीण लिंबकर अशा चार जणांची नावे समोर येतील. चौथ्या बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तीचा बळी जाण्याआधी तपास यंत्रणांनी या संशयितांना त्वरित जेरबंद केले पाहिजे, असे दाभोलकर म्हणाले.कॉम्रेड पानसरेंच्या स्नुषा प्रा. मेघा पानसरे म्हणाल्या, दाभोलकरांच्या हत्येला ३0 महिने उलटले. पानसरेंच्या हत्येला २0 फेब्रुवारी रोजी १ वर्ष पूर्ण होईल, तर प्रा. कलबुर्गींच्या हत्येला ५ महिने पूर्ण होतील. तिघांच्याही मारेकऱ्यांना आजवर अटक झालेली नाही. उलट या खुनांबाबत ज्या संस्थांवर संशय व्यक्त होतो आहे, त्यांना महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाकडून अप्रत्यक्ष पाठिंबा मिळतांना दिसतो आहे. आम्ही अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने दिल्लीत जंतर मंतरवर धरणे धरले तर आम्हाला विरोध करण्यासाठी तिथे संशयित संस्थांचे लोक आमच्यावर उघडपणे प्रत्यारोप करण्यासाठी दाखल होतात. लोकशाही व्यवस्थेत चिंता वाटावी अशीच ही बाब आहे. सरकार नावाची व्यवस्था देशात अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न अशावेळी पडतो.शीना बोरा केससाठी सीबीआयने ४ पथके, तर व्यापमं चौकशीसाठी ४0 पथके नियुक्त केली. दाभोलकरांच्या तपासासाठी मात्र सीबीआयचे अवघे ४ अधिकारी आहेत. त्यांच्या तपास कार्यातही सुसूत्रता दिसत नाही. दाभोलकर आणि पानसरेंचे खून मॉर्निंग वॉकच्या वेळी झाले असल्याने महाराष्ट्र अंनिसच्या वतीने दर महिन्याच्या २0 तारखेला ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ आयोजित केला जातो. आमचे म्हणणे ऐकून तरी घ्या, यासाठी पंतप्रधान मोदी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची दर महिन्याला आम्ही भेटीसाठी वेळ मागतो. मात्र आजतागायत आम्हाला एकदाही ना भेटीची वेळ मिळाली ना आमच्या एकाही पत्राचे उत्तर मिळाले, असे अंनिसचे अध्यक्ष पाटील म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)परस्पर विरोधी संघटनांचे जंतर मंतरवर धरणेदिल्लीत दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी खुनांच्या तपासातील दिरंगाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पत्रपरिषदेआधी प्रतीकात्मक धरणे प्रदर्शन आयोजित केले होते. दिल्लीतल्या समविचारी संघटना व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते या धरण्यात सहभागी होते तर दुसरीकडे अंधश्रध्दा निर्मूलन समितीवर प्रत्यारोप करण्यासाठी तसेच धरण्यांना विरोध दर्शवण्यासाठी हिंदू जनजागरण समिती व सनातन संस्थेच्या मोजक्या १0/१५ कार्यकर्त्यांनी बॅनर लावून जंतर मंतरवर प्रति धरणे धरले. सरकारचा निषेध करणाऱ्या अंनिस सारख्या संघटना नक्षलवादी विचारांच्या आहेत. हिंदु धर्माच्या विरोधात प्रचार प्रसार करण्यासाठी परदेशातून त्यांना निधी पुरवला जातो, असा आरोप हे कार्यकर्ते करीत होते.