शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये सायलेन्सरचा आवाज वाढला

By admin | Updated: June 30, 2016 03:04 IST

वाहनांच्या सायलेन्सरच्या आवाजाची पातळी व त्यातून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मापदंड पाहिल्यास कंप सुटल्यागत परिस्थितीचा अनुभव येतो.

पेण : सध्या राज्यभरात वाहनांची प्रचंड संख्या वाढली आहे. या वाहनांच्या सायलेन्सरच्या आवाजाची पातळी व त्यातून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मापदंड पाहिल्यास कंप सुटल्यागत परिस्थितीचा अनुभव येतो. सायलेन्सरमधून येणाऱ्या आवाजाची क्रेझ सध्या यंग जनरेशनचा नवा फंडा बनला आहे. मात्र आवाजाची पातळी व ध्वनिप्रदूषणाची डेसिबल मर्यादा ओलांडणाऱ्या या बाइकस्वाराकडे आरटीओ व वाहतूक पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घालून सायलेन्सरचा आवाज खाली करण्याची कारवाई करावी असे पेणच्या अनेक ज्येष्ठ नागरिकांचे यासंदर्भातील म्हणणे लोकमतशी बोलताना व्यक्त के ले.सायलेन्सरमधील इंजिनचा आवाज कमी करण्यासाठी बसवण्यात येणाऱ्या इंजिनमध्ये नियमबाह्य बदल करून आवाज वाढविण्याकडे वाहनचालकांचा भर आहे. यामध्ये तरुणाईच्या डोक्यात हे आवाजाचे फॅड आहे. बाइकस्वारी करताना हा आवाज कुणाचा ओळख व्हावी यासाठी भलतेच वेड पांघरलेले हे बाइकस्वार आपल्या सायलेन्सरमधून निघणारा आवाजाचा त्रास इतरांना होईल याचे भान त्यांना राहत नाही. आपल्या बाइकस्वाराकडे इतरांचे लक्ष वेधून घेण्याच्या हट्टापायी त्या वाहनातून उद्भवणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची मर्यादा २०० ते २३० डेसिबलच्या वर जाणारी आहे असे प्रदूषणाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळीचे आहे. सध्या शैक्षणिक वर्षाचा हंगाम सुरू झाल्याने शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात अथवा शहराच्या मुख्य रस्त्यावर या आवाजी बाइकस्वाराचे दर्शन नित्यनेमाने घडत असते. तारुण्याचा आनंद उपभोगताना स्वत: आनंदाने जगा व दुसऱ्यांना ही तशाच प्रकारे जगू द्या हा सध्या पर्यावरण संवर्धनाचा गोड विषय असताना, रस्त्यावरून जाणाऱ्यांना या आवाजाचा त्रास होतो याचे भान यांना कदाचित नसावे. नियम व शासकीय यंत्रणांनी केलेले कायद्यांचे उल्लंघन करू नका. आवाजाची पातळी वाढविणारे सायलेन्सरवर खर्च करण्याची फॅशन सध्या करू होवू घातली. सायलेन्सवर खर्च करण्याची फॅशन सध्या रुढ होवू घातलीय. या महानगरातील फॅड सध्या शहरी व ग्रामीण संस्कृतीत अवतरत असतानाच हा आवाज कुणाचा! ही प्रतिष्ठा जपण्यापेक्षा सुरक्षित प्रवास, कायद्याचा बंधनातील प्रवास ही वाहतूक प्रणाली लक्षात ठेवून संबंधित शासकीय यंत्रणांनी हा आवाज खाली कसा येईल, याबाबत संबंधितांना समज द्यावी, न ऐकल्यास नियमांच्या निकषानुसार कारवाई करावी, असे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.