शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

गोंडस ग्रामविकास!

By admin | Updated: March 19, 2017 01:21 IST

गावोगावच्या ग्रामपंचायती डिजिटल करण्याचा संकल्प करीत स्मार्ट होण्यासाठी एक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. रस्ते विकास, कृषी क्षेत्रासाठीची तरतूद आणि जलसंपदा

गावोगावच्या ग्रामपंचायती डिजिटल करण्याचा संकल्प करीत स्मार्ट होण्यासाठी एक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. रस्ते विकास, कृषी क्षेत्रासाठीची तरतूद आणि जलसंपदा वाढविण्यासाठी भरीव तरतूद हीच ग्रामविकासातील जमेची बाजू आहे; पण थेट ग्रामीण विकासासाठी संकल्पित नवी योजना नाही आणि त्यासाठी भरीव तरतूदही नाही.पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी राज्य सरकारने ५७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी १६३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शिवाय सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी रस्त्यांवर खर्च करण्यासाठी सात हजार कोटींची तरतूद केली गेली आहे. यातून ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी मदत होणार आहे. याशिवाय कृषी, जलसंपदा आणि पाणीयोजनांसाठी होणारा खर्च ग्रामविकासाला मदत करेल; पण स्मार्ट ग्राम योजना जाहीर करताना ही गावे विकसित करण्यासाठीची एकत्रित योजना नाही. केवळ स्मार्ट स्पर्धा जाहीर केली आहे. शिवाय डिजिटल गावे करण्यात येणार आहेत, त्याचवेळी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी केवळ ३०० कोटी रुपयांची तरतूद आहे.‘मनरेगा’ योजनेतील मजुरीत केवळ नऊ रुपयांची वाढ करून आता प्रतिदिन २०१ रुपये मिळणार आहेत. पाच हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी १२०० कोटींची तरतूद केली आहे. मागेल त्याला शेततळे देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यातून गावांचा विकास होण्यासाठी मदत होईल; पण पाण्यासाठी तरतूद कमी करून केवळ स्मार्ट ग्रामविकासाचे गोंडस चित्र तयार केले आहे.ठळक तरतुदी... - 28,000 डिजिटल ग्रामपंचायती- 300  कोटी ग्रामीण पाणी योजनांसाठी - मराठवाड्याला १५ कोटी अतिरिक्त निधीची तरतूद- पंतप्रधान ग्रामसडक योजनेसाठी 570 कोटींची तरतूद- 100 कोटी ग्रामीण रोजगार विकासासाठी - शेतीला संरक्षण देण्यासाठी योजना, ‘मनरेगा’ची रोजगार मजुरी १९२ वरून २०१ रुपये- मुख्यमंत्री ग्रामसडकसाठी १६३० कोटींची तरतूद- अवर्षणग्रस्त भागात चार वर्षांत जलप्रकल्प- स्मार्ट सिटीप्रमाणे स्मार्ट ग्राम योजना