शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
2
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
3
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
4
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
5
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
6
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
7
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
8
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
9
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
10
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
11
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
12
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
13
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
14
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
15
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
16
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
17
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
18
सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
19
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
20
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन

युतीत कुरघोडी

By admin | Updated: January 20, 2017 06:28 IST

एकीकडे युतीची बोलणी सुरू असतानाच दुसरीकडे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा खेळ सध्या शिवसेना, भाजपात सुरू आहे.

मुंबई : एकीकडे युतीची बोलणी सुरू असतानाच दुसरीकडे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा खेळ सध्या शिवसेना, भाजपात सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ आणि ७०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सवलत देण्याची घोषणा केली. त्यावर मालमत्ता करातील सवलतीबाबतची मागणी आपलीच असल्याचा दावा भाजपाने केला. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी तातडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा करून भाजपावर चांगलीच कुरघोडी केली. लवकरच शिवसेनेचा वचननामा जाहीर होणार असून त्यात मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या मुद्द्यांचा समावेश केल्याचे उद्धव यांनी सांगितले. मुंबईकरांसमोर सध्या घर व आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना मोफत आरोग्य सुविधा देऊ, असे ते म्हणाले. केंद्र व राज्य सरकारच्या सुविधांपासून वंचित राहिलेल्यांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मालमत्ता करातील सवलतींमुळे पालिका तिजोरीवर ताण पडणार नाही. अच्छे दिन हा केवळ चुनावी जुमला होता. आमची घोषणा जुमला नाही. आमचा वचननामा आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)।५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी५०० फुटांपर्यंतच्या घरांना उद्धव ठाकरे यांनी करमाफीची घोषणा केली. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर ४०० कोटींचा बोजा पडणार आहे. शिवाय, ७०० फुटांपर्यंतच्या घरांना सवलत दिल्यास त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मुंबईत एकूण ४ हजार ९०० कोटींचा मालमत्ता कर वसूल झाला. सध्या मुंबईत ५०० फुटांपर्यंतची १५ लाख घरे आहेत. 600 चौरस फुटांपर्यंतची घरे मालमत्ता करमुक्त करावी, अशी मागणी सर्वप्रथम मी विधिमंडळ अधिवेशनात केली होती. त्याला राज्य सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला होता, असा दावा मुंबई भाजपाध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी केला. शिवसेना, भाजपा युतीबाबत उद्धव यांना विचारले असता, युतीची बोलणी अजून माझ्यापर्यंत आलेली नाही. माझ्याकडे चर्चा आल्यावर मी माझा निर्णय जाहीर करेन. पण ही सकारात्मक चर्चा होकारात्मक होऊ द्या, असेही ते म्हणाले.।मुंबईकरांसाठी भाजपाच्याही घोषणामुंबई महापालिकेकडे साधारण १३ टक्के म्हणजे दरवर्षी सुमारे ५०० ते ६०० कोटी रस्ते करातून जमा होतात. तरीही रस्त्यांवर खड्डे आहेतच. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत रस्ते कर आकारणार नाही. मुंबईकरांना २४ तास पाणी मिळेपर्यंत पाणीपट्टीत सवलत दिली जाईल, असे शेलार यांनी सांगितले. महापालिकेतील करप्रणाली म्हणजे ‘कर दहशतवाद’च आहे, असा आरोप त्यांनी केला. या कर दहशतीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी भाजपाच्या जाहीरनाम्यात सवलती दिल्या आहेत. लवकरच तो प्रकाशित केला जाईल, असे शेलार यांनी सांगितले.