शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

युतीत कुरघोडी

By admin | Updated: January 20, 2017 06:28 IST

एकीकडे युतीची बोलणी सुरू असतानाच दुसरीकडे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा खेळ सध्या शिवसेना, भाजपात सुरू आहे.

मुंबई : एकीकडे युतीची बोलणी सुरू असतानाच दुसरीकडे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा खेळ सध्या शिवसेना, भाजपात सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ आणि ७०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सवलत देण्याची घोषणा केली. त्यावर मालमत्ता करातील सवलतीबाबतची मागणी आपलीच असल्याचा दावा भाजपाने केला. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी तातडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा करून भाजपावर चांगलीच कुरघोडी केली. लवकरच शिवसेनेचा वचननामा जाहीर होणार असून त्यात मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या मुद्द्यांचा समावेश केल्याचे उद्धव यांनी सांगितले. मुंबईकरांसमोर सध्या घर व आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना मोफत आरोग्य सुविधा देऊ, असे ते म्हणाले. केंद्र व राज्य सरकारच्या सुविधांपासून वंचित राहिलेल्यांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मालमत्ता करातील सवलतींमुळे पालिका तिजोरीवर ताण पडणार नाही. अच्छे दिन हा केवळ चुनावी जुमला होता. आमची घोषणा जुमला नाही. आमचा वचननामा आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)।५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी५०० फुटांपर्यंतच्या घरांना उद्धव ठाकरे यांनी करमाफीची घोषणा केली. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर ४०० कोटींचा बोजा पडणार आहे. शिवाय, ७०० फुटांपर्यंतच्या घरांना सवलत दिल्यास त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मुंबईत एकूण ४ हजार ९०० कोटींचा मालमत्ता कर वसूल झाला. सध्या मुंबईत ५०० फुटांपर्यंतची १५ लाख घरे आहेत. 600 चौरस फुटांपर्यंतची घरे मालमत्ता करमुक्त करावी, अशी मागणी सर्वप्रथम मी विधिमंडळ अधिवेशनात केली होती. त्याला राज्य सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला होता, असा दावा मुंबई भाजपाध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी केला. शिवसेना, भाजपा युतीबाबत उद्धव यांना विचारले असता, युतीची बोलणी अजून माझ्यापर्यंत आलेली नाही. माझ्याकडे चर्चा आल्यावर मी माझा निर्णय जाहीर करेन. पण ही सकारात्मक चर्चा होकारात्मक होऊ द्या, असेही ते म्हणाले.।मुंबईकरांसाठी भाजपाच्याही घोषणामुंबई महापालिकेकडे साधारण १३ टक्के म्हणजे दरवर्षी सुमारे ५०० ते ६०० कोटी रस्ते करातून जमा होतात. तरीही रस्त्यांवर खड्डे आहेतच. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत रस्ते कर आकारणार नाही. मुंबईकरांना २४ तास पाणी मिळेपर्यंत पाणीपट्टीत सवलत दिली जाईल, असे शेलार यांनी सांगितले. महापालिकेतील करप्रणाली म्हणजे ‘कर दहशतवाद’च आहे, असा आरोप त्यांनी केला. या कर दहशतीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी भाजपाच्या जाहीरनाम्यात सवलती दिल्या आहेत. लवकरच तो प्रकाशित केला जाईल, असे शेलार यांनी सांगितले.