शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

युतीत कुरघोडी

By admin | Updated: January 20, 2017 06:28 IST

एकीकडे युतीची बोलणी सुरू असतानाच दुसरीकडे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा खेळ सध्या शिवसेना, भाजपात सुरू आहे.

मुंबई : एकीकडे युतीची बोलणी सुरू असतानाच दुसरीकडे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा खेळ सध्या शिवसेना, भाजपात सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ आणि ७०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सवलत देण्याची घोषणा केली. त्यावर मालमत्ता करातील सवलतीबाबतची मागणी आपलीच असल्याचा दावा भाजपाने केला. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी तातडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा करून भाजपावर चांगलीच कुरघोडी केली. लवकरच शिवसेनेचा वचननामा जाहीर होणार असून त्यात मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या मुद्द्यांचा समावेश केल्याचे उद्धव यांनी सांगितले. मुंबईकरांसमोर सध्या घर व आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना मोफत आरोग्य सुविधा देऊ, असे ते म्हणाले. केंद्र व राज्य सरकारच्या सुविधांपासून वंचित राहिलेल्यांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मालमत्ता करातील सवलतींमुळे पालिका तिजोरीवर ताण पडणार नाही. अच्छे दिन हा केवळ चुनावी जुमला होता. आमची घोषणा जुमला नाही. आमचा वचननामा आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)।५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी५०० फुटांपर्यंतच्या घरांना उद्धव ठाकरे यांनी करमाफीची घोषणा केली. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर ४०० कोटींचा बोजा पडणार आहे. शिवाय, ७०० फुटांपर्यंतच्या घरांना सवलत दिल्यास त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मुंबईत एकूण ४ हजार ९०० कोटींचा मालमत्ता कर वसूल झाला. सध्या मुंबईत ५०० फुटांपर्यंतची १५ लाख घरे आहेत. 600 चौरस फुटांपर्यंतची घरे मालमत्ता करमुक्त करावी, अशी मागणी सर्वप्रथम मी विधिमंडळ अधिवेशनात केली होती. त्याला राज्य सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला होता, असा दावा मुंबई भाजपाध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी केला. शिवसेना, भाजपा युतीबाबत उद्धव यांना विचारले असता, युतीची बोलणी अजून माझ्यापर्यंत आलेली नाही. माझ्याकडे चर्चा आल्यावर मी माझा निर्णय जाहीर करेन. पण ही सकारात्मक चर्चा होकारात्मक होऊ द्या, असेही ते म्हणाले.।मुंबईकरांसाठी भाजपाच्याही घोषणामुंबई महापालिकेकडे साधारण १३ टक्के म्हणजे दरवर्षी सुमारे ५०० ते ६०० कोटी रस्ते करातून जमा होतात. तरीही रस्त्यांवर खड्डे आहेतच. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत रस्ते कर आकारणार नाही. मुंबईकरांना २४ तास पाणी मिळेपर्यंत पाणीपट्टीत सवलत दिली जाईल, असे शेलार यांनी सांगितले. महापालिकेतील करप्रणाली म्हणजे ‘कर दहशतवाद’च आहे, असा आरोप त्यांनी केला. या कर दहशतीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी भाजपाच्या जाहीरनाम्यात सवलती दिल्या आहेत. लवकरच तो प्रकाशित केला जाईल, असे शेलार यांनी सांगितले.