शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

समुद्रात ‘करंट’; मासेमारी ठप्प

By admin | Updated: December 25, 2015 23:52 IST

हवामान बदलाचा परिणाम : नौका स्थिरावल्या

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेले काही दिवस वाऱ्याचा जोर वाढल्याने नौकांनी सुरक्षित बंदरांचा आश्रय घेतला आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाला असून, मासेमारी ठप्प झाली आहे. मालवणसह सिंधुदुर्गात पर्यटन हंगाम तेजीत असताना माशांची आवक घटल्याने मिळालेल्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत.सुरमई, पापलेट, चिंगुळ, आदी बड्या किमतीची व पर्यटकांची मोठी मागणी असलेल्या मासळीला गेल्या काही महिन्यातील सर्वाधिक दर मिळाला आहे. मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने काही हॉटेल व्यावसायिकांकडून गोवा येथूनही मासळी आयात करण्यात आली आहे. हवामानातील हा बदल दोन ते तीन दिवस असाच राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. गेले आठ दिवस समुद्रात उत्तरेच्या दिशेने जाणाऱ्या (उपरच्या) वाऱ्याने जोर धरला आहे. समुद्री पाण्याचा प्रवाह दक्षिण दिशेने जोरदार वाहत आहे. याला मासेमारी भाषेत पाण्याला ‘करंट’ मारणे असे म्हणतात. या हवामानातील बदलामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काही नौका मालवण, सर्जेकोट, देवगड व अन्य बंदरात स्थिरावल्या आहेत. वाऱ्याचा परिणाम मासेमारीवरही झाला आहे. (प्रतिनिधी)गोव्यातून मासळी आयात पर्यटकांची मोठी मागणी असलेली पापलेट, सुरमई, चिंगुळ, आदी मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. ३०० ते ४०० रुपये किलोच्या दराने मिळणारी सुरमई ८०० ते ९०० रुपये बाजारभावाने मिळत आहे. बाजारात गोवा मार्केट येथून मासळी आयात करण्याची वेळ आली आहे. पर्यटकांची मागणी लक्षात घेता काही व्यावसायिक गोवा येथील मासळी देत आहेत. समुद्रातील हा बदल आणखी काही दिवस असाच राहील. चार्जींगला लावून ठेवण्यात आलेली तिकीट यंत्रे जळून खाक झाली.आगीचे कारण गुलदस्त्यातशॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याबाबत एस्. टी.चे अधिकारी चौकशी करीत आहेत.ड्युटीवर असूनही गैरहजेरीवाहक, चालक नेहमीप्रमाणे सकाळपासून ड्युटीवर हजर होते. मात्र तिकीट यंत्रे बाद झाल्यामुळे व तिकीट ट्रे उपलब्ध नसल्यामुळे वाहक, चालकांना बसून रहावे लागले. संगणकावर तिकीट ट्रेचे अपडेट घेऊन तिकीट ट्रे वाहकांच्या ताब्यात देण्यात येत होते. परंतु फेऱ्या जाऊ न शकलेल्या चालक, वाहकांची हजेरी प्रशासनाकडून लावून घेण्यात असमर्थता दर्शविण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. कर्मचाऱ्यांची चुकी नसताना अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमधून उमटत होत्या. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे रत्नागिरी आगार सचिव बी. ए. विश्वासराव यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन हजेरी लावण्याची विनंती केली आहे.