शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

सध्याचा कालखंड धार्मिक विद्वेषाचा

By admin | Updated: January 4, 2016 03:15 IST

सध्याचा कालखंड धार्मिक, जातीय विद्वेषाने भरलेला असून, राज्यघटनेची चौकट बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरणे म्हणजे स्वत:वर गोळ्या झाडण्यासाठी आमंत्रण देण्यासारखे झाले

नाशिक : सध्याचा कालखंड धार्मिक, जातीय विद्वेषाने भरलेला असून, राज्यघटनेची चौकट बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरणे म्हणजे स्वत:वर गोळ्या झाडण्यासाठी आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. अशा काळात धर्मनिरपेक्षतेची चळवळ जिवंत राहण्यासाठी प्राणपणाने लढा चालू ठेवण्याची, महाराष्ट्र व कर्नाटकातील पुरोगामी चळवळींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी रविवारी मांडले. सिडकोतील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण परशुराम साईखेडकर नाट्यगृहात करण्यात आले, त्यावेळी डॉ. दाभोलकर बोलत होते. कार्यक्रमात पुरोगामी विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या शिष्या आणि कर्नाटकातील बंडखोर कवयित्री सुकन्या मारुती यांना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. दाभोलकर म्हणाले, अनेक महिने उलटूनही दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागलेला नाही. अशा कालखंडात मारुती यांचा गौरव परिवर्तनासाठीचा लढा थांबवणार नसल्याचा निर्धार व्यक्त करणारा आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील विचारवंतांना संपवले, तरी घाबरून न जाता दोन्ही राज्यांतील पुरोगामी कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या हातात हात देऊन पुढे वाटचाल करावी व देशातील सनातन्यांसमोर उदाहरण उभे करावे, असे ते म्हणाले.