शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

जामोद येथे संचारबंदी चार तासांसाठी शिथिल

By admin | Updated: April 19, 2016 02:36 IST

जामोद येथे उसळलेल्या दंगलीनंतर लावण्यात आलेली संचारबंदी तब्बल ३६ तासानंतर सोमवारी चार तासांसाठी शिथिल करण्यात आली.

जामोद (जि. बुलडाणा): जामोद येथे उसळलेल्या दंगलीनंतर लावण्यात आलेली संचारबंदी तब्बल ३६ तासानंतर सोमवारी चार तासांसाठी शिथिल करण्यात आली. सकाळी १0 ते १२ व त्यानंतर दुपारी ४ ते ६ अशी पुन्हा दोन तासांच्या टप्प्यातील शिथिलतेनंतर पुन्हा संचारबंदी लावण्यात आली आहे. संचारबंदीदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नसून, गावात तणावपूर्ण शांतता कायम आहे. संचारबंदी शिथिलतेच्या तासात ग्रामस्थांनी आपले दैनंदिन व्यवहार उरकले. जामोद येथे १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान जातीय तणाव निर्माण होऊन दगडफेक व जाळपोळीचे प्रकार घडले होते. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला होता; तसेच गावात संचारबंदी लागू करण्यात आली असून, सोमवारी चार तासांच्या शिथिलतेनंतर पुन्हा संचारबंदी कायम ठेवली आहे. सध्या गावातील तणाव ओसरत असून, शांततेचे वातावरण आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर हे परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी जामोद येथे तळ ठोकून आहेत, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार यांच्यासह २२५ पोलीस अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात आहेत. या दंगलप्रकरणी १११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून ८७ आरोपींना अटक केली आहे. यापैकी २७ जणांना पोलीस कोठडी तर ५२ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, या सर्वांची रवानगी बुलडाणा येथील कारागृहात करण्यात आली आहे, तर पोलिसांनी गावातील काही जणांच्या घरातून देशी कट्टा, तलवारी असे प्राणघातक साहित्यसुद्धा जप्त केले आहे.