शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जामोद येथे संचारबंदी चार तासांसाठी शिथिल

By admin | Updated: April 19, 2016 02:36 IST

जामोद येथे उसळलेल्या दंगलीनंतर लावण्यात आलेली संचारबंदी तब्बल ३६ तासानंतर सोमवारी चार तासांसाठी शिथिल करण्यात आली.

जामोद (जि. बुलडाणा): जामोद येथे उसळलेल्या दंगलीनंतर लावण्यात आलेली संचारबंदी तब्बल ३६ तासानंतर सोमवारी चार तासांसाठी शिथिल करण्यात आली. सकाळी १0 ते १२ व त्यानंतर दुपारी ४ ते ६ अशी पुन्हा दोन तासांच्या टप्प्यातील शिथिलतेनंतर पुन्हा संचारबंदी लावण्यात आली आहे. संचारबंदीदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नसून, गावात तणावपूर्ण शांतता कायम आहे. संचारबंदी शिथिलतेच्या तासात ग्रामस्थांनी आपले दैनंदिन व्यवहार उरकले. जामोद येथे १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान जातीय तणाव निर्माण होऊन दगडफेक व जाळपोळीचे प्रकार घडले होते. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला होता; तसेच गावात संचारबंदी लागू करण्यात आली असून, सोमवारी चार तासांच्या शिथिलतेनंतर पुन्हा संचारबंदी कायम ठेवली आहे. सध्या गावातील तणाव ओसरत असून, शांततेचे वातावरण आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर हे परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी जामोद येथे तळ ठोकून आहेत, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार यांच्यासह २२५ पोलीस अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात आहेत. या दंगलप्रकरणी १११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून ८७ आरोपींना अटक केली आहे. यापैकी २७ जणांना पोलीस कोठडी तर ५२ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, या सर्वांची रवानगी बुलडाणा येथील कारागृहात करण्यात आली आहे, तर पोलिसांनी गावातील काही जणांच्या घरातून देशी कट्टा, तलवारी असे प्राणघातक साहित्यसुद्धा जप्त केले आहे.