शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

जामोद येथे संचारबंदी चार तासांसाठी शिथिल

By admin | Updated: April 19, 2016 02:36 IST

जामोद येथे उसळलेल्या दंगलीनंतर लावण्यात आलेली संचारबंदी तब्बल ३६ तासानंतर सोमवारी चार तासांसाठी शिथिल करण्यात आली.

जामोद (जि. बुलडाणा): जामोद येथे उसळलेल्या दंगलीनंतर लावण्यात आलेली संचारबंदी तब्बल ३६ तासानंतर सोमवारी चार तासांसाठी शिथिल करण्यात आली. सकाळी १0 ते १२ व त्यानंतर दुपारी ४ ते ६ अशी पुन्हा दोन तासांच्या टप्प्यातील शिथिलतेनंतर पुन्हा संचारबंदी लावण्यात आली आहे. संचारबंदीदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नसून, गावात तणावपूर्ण शांतता कायम आहे. संचारबंदी शिथिलतेच्या तासात ग्रामस्थांनी आपले दैनंदिन व्यवहार उरकले. जामोद येथे १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान जातीय तणाव निर्माण होऊन दगडफेक व जाळपोळीचे प्रकार घडले होते. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला होता; तसेच गावात संचारबंदी लागू करण्यात आली असून, सोमवारी चार तासांच्या शिथिलतेनंतर पुन्हा संचारबंदी कायम ठेवली आहे. सध्या गावातील तणाव ओसरत असून, शांततेचे वातावरण आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर हे परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी जामोद येथे तळ ठोकून आहेत, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार यांच्यासह २२५ पोलीस अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात आहेत. या दंगलप्रकरणी १११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून ८७ आरोपींना अटक केली आहे. यापैकी २७ जणांना पोलीस कोठडी तर ५२ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, या सर्वांची रवानगी बुलडाणा येथील कारागृहात करण्यात आली आहे, तर पोलिसांनी गावातील काही जणांच्या घरातून देशी कट्टा, तलवारी असे प्राणघातक साहित्यसुद्धा जप्त केले आहे.