शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
3
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
6
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
7
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
8
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
9
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
10
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
11
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
13
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
14
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
15
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
16
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
17
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
18
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
19
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
20
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय

कुरकुंभची पाणी समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 01:28 IST

महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राकडून मिळणाऱ्या पाण्यावरच अवलंबून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना कुरकुंभ ग्रामपंचायत याबाबत मात्र गंभीर नसून कुरकुंभ आजदेखील महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राकडून मिळणाऱ्या पाण्यावरच अवलंबून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा वापर वाढला असून, त्याचा पुरवठा करणे मात्र नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसते. गावातील नागरिक पूर्णपणे फक्त याच एका पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असून, दुष्काळी परिस्थितीत ही समस्या मोठी होत आहे.कुरकुंभला असणारा रासायनिक प्रकल्प हा इथल्या पाण्याच्या समस्येचे प्रमुख कारण आहे. कुरकुंभ व परिसरातील गावांना याचा प्रामुख्याने दुष्परिणाम भोगावा लागत असून, गेली २५ वर्षे यावर कुठल्याच प्रकारचा सकारात्मक कार्यक्रम राबविण्यात आलेला नाही. कुरकुंभला होणारा पाणीसाठा हा सध्या येथील महाराष्ट्र औद्योगिक मंडळाकडून होत आहे. तोदेखील त्यांना उपलब्ध असणाऱ्या पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे जर त्यांनी पाणी दिले, तरच कुरकुंभला पाणी मिळणार, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे व या रासायनिक प्रकल्पाचा परिणाम भोगत असणाऱ्या पांढरेवाडी या गावालादेखील अशीच काहीश्ी स्थिती पाहायला मिळते.कुरकुंभ ओद्योगिक क्षेत्राला वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावातून पाण्याचा पुरवठा केला जातो व त्याद्वारे कुरकुंभ व पांढरेवाडीलादेखील पुरवठा होतो. मात्र, उद्योगाला पाणी कमी पडण्यास सुरुवात झाली, की गावाचा पाणीपुरवठादेखील कमी केला जातो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होते. मागील वर्षीच्या दुष्काळात कुरकुंभच्या जनतेला अक्षरश: रासायनिक पाण्याचा वापर करावा लागला, तर पिण्याचे पाणीदेखील जवळपास तीन महिने विकत घ्यावे लागले. या सर्व प्रकारात सर्वसामान्य जनता भरडली जात असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, ज्या तलावातून पाणीसाठा उपलब्ध होत आहे, त्यातच राखीव साठा असणे गरजेचे आहे; अन्यथा मागील दुष्काळात ज्या गावांना पाणी नाही, त्यांना यातूनच पुरवठा केला गेल्यामुळे कुरकुंभला पाणी मिळणे कठीण झाले होते. (वार्ताहर)>पाणी आहे; मात्र दूषितकुरकुंभ गावात पाण्याचा साठा बहुतांश ठिकाणी उपलब्ध आहे; मात्र त्याचा उपयोग दैनंदिन गरजा भागविण्यासाठीदेखील करता येत नाही. गावात असणाऱ्या विहिरी, बोअरवेल व अन्य साधने मोठ्या प्रमाणात दूषित असून त्यामध्ये फेसाळलेले व उग्र वास असणारे पाणी आहे, जे हातात सुद्धा घेता येत नाही. त्यामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होते. यामुळे मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवण्याची गरज आहे. याबाबत कुठलीच योजना सध्या तरी दिसून येत नाही. त्यामुळे कुरकुंभला पाण्याचा राखीव साठा मिळणे अत्यंत आवश्यक आहे.