शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

कुरकुंभची पाणी समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 01:28 IST

महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राकडून मिळणाऱ्या पाण्यावरच अवलंबून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना कुरकुंभ ग्रामपंचायत याबाबत मात्र गंभीर नसून कुरकुंभ आजदेखील महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राकडून मिळणाऱ्या पाण्यावरच अवलंबून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा वापर वाढला असून, त्याचा पुरवठा करणे मात्र नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसते. गावातील नागरिक पूर्णपणे फक्त याच एका पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असून, दुष्काळी परिस्थितीत ही समस्या मोठी होत आहे.कुरकुंभला असणारा रासायनिक प्रकल्प हा इथल्या पाण्याच्या समस्येचे प्रमुख कारण आहे. कुरकुंभ व परिसरातील गावांना याचा प्रामुख्याने दुष्परिणाम भोगावा लागत असून, गेली २५ वर्षे यावर कुठल्याच प्रकारचा सकारात्मक कार्यक्रम राबविण्यात आलेला नाही. कुरकुंभला होणारा पाणीसाठा हा सध्या येथील महाराष्ट्र औद्योगिक मंडळाकडून होत आहे. तोदेखील त्यांना उपलब्ध असणाऱ्या पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे जर त्यांनी पाणी दिले, तरच कुरकुंभला पाणी मिळणार, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे व या रासायनिक प्रकल्पाचा परिणाम भोगत असणाऱ्या पांढरेवाडी या गावालादेखील अशीच काहीश्ी स्थिती पाहायला मिळते.कुरकुंभ ओद्योगिक क्षेत्राला वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावातून पाण्याचा पुरवठा केला जातो व त्याद्वारे कुरकुंभ व पांढरेवाडीलादेखील पुरवठा होतो. मात्र, उद्योगाला पाणी कमी पडण्यास सुरुवात झाली, की गावाचा पाणीपुरवठादेखील कमी केला जातो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होते. मागील वर्षीच्या दुष्काळात कुरकुंभच्या जनतेला अक्षरश: रासायनिक पाण्याचा वापर करावा लागला, तर पिण्याचे पाणीदेखील जवळपास तीन महिने विकत घ्यावे लागले. या सर्व प्रकारात सर्वसामान्य जनता भरडली जात असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, ज्या तलावातून पाणीसाठा उपलब्ध होत आहे, त्यातच राखीव साठा असणे गरजेचे आहे; अन्यथा मागील दुष्काळात ज्या गावांना पाणी नाही, त्यांना यातूनच पुरवठा केला गेल्यामुळे कुरकुंभला पाणी मिळणे कठीण झाले होते. (वार्ताहर)>पाणी आहे; मात्र दूषितकुरकुंभ गावात पाण्याचा साठा बहुतांश ठिकाणी उपलब्ध आहे; मात्र त्याचा उपयोग दैनंदिन गरजा भागविण्यासाठीदेखील करता येत नाही. गावात असणाऱ्या विहिरी, बोअरवेल व अन्य साधने मोठ्या प्रमाणात दूषित असून त्यामध्ये फेसाळलेले व उग्र वास असणारे पाणी आहे, जे हातात सुद्धा घेता येत नाही. त्यामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होते. यामुळे मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवण्याची गरज आहे. याबाबत कुठलीच योजना सध्या तरी दिसून येत नाही. त्यामुळे कुरकुंभला पाण्याचा राखीव साठा मिळणे अत्यंत आवश्यक आहे.