शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
3
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
4
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
6
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
7
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
8
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
9
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
10
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
11
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
12
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
13
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
16
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
17
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
18
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
19
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
20
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

मावळातील धरणे तुडुंब

By admin | Updated: August 12, 2016 01:03 IST

आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम राहिला आहे. मावळ आणि परिसरात पावसाची संततधार राहिल्याने धरणे तुडुंब भरली आहेत.

पिंपरी : आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम राहिला आहे. मावळ आणि परिसरात पावसाची संततधार राहिल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. वडिवळे धरण ९७ टक्के तर आंद्रा, पवना ही धरणे १०० टक्के भरली आहेत. कासारसाईचे धरण ९१ टक्के भरले आहे. धरणे भरल्याने भविष्यातील पाणीसमस्या दूर झाल्याने पिंपरी-चिंचवडकरांनी तसेच मावळातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.सांडव्यावरून वाहू लागले पाणीटाकवे बुद्रुक : आंदर मावळातील आंद्रा धरण १०० टक्के भरले असून, धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. धरण तळेगाव औद्योगिक वसाहतीस पाणीपुरवठा करण्यासाठी १५वर्षांपूर्वी बांधण्यात आले. शेतकऱ्यांसाठीही धरण वरदान ठरत आहे. इंद्रायणी नदीची उपनदी आंद्रावर धरण उभारण्यात आले आहे. धरणाची उंची ३४.५० मीटर असून, लांबी ३३० मीटर आहे. पाणलोट क्षेत्र ९०.३५चौरस किमी आहे. आळंदी व देहूच्या यात्राकाळातही धरणातून पाणी सोडले जाते. वडिवळे धरणातून विसर्गकरंजगाव : नाणे मावळ परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त असल्यामुळे येथील परिसरात धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. वडिवळे धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. वडिवळे धरणात गुरुवारी (दि. ११) ९६.३३ टक्के पाणीसाठा होता. धरणातून ४१२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रात या वर्षी २१६२ मिमी पाऊस झाला आहे. धरणाची क्षमता ४०.८७ दलघमी आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी चांगला पाणीसाठा झाला आहे.कासारसाईत १२९ क्युसेकने विसर्गचांदखेड : धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे कासारसाई धरण १०० टक्के भरले आहे. परिसरात दमदार पाऊस पडत असल्यामुळे धरण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ८० टक्के भरले. त्याचप्रमाणे पुसाणे लघुपाटबंधारे प्रकल्पातून कासारसाई धरणात पाण्याचा विसर्ग धरणात येत असल्यामुळे धरणसाठा ११ आॅगस्ट अखेर ९१.६५ टक्के ठेवला असून, १२९ क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता १६.०४ दशलक्ष घनमीटर असून, सध्या पाणीसाठा १४.७२ दशलक्ष घनमीटर आहे.