शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

मावळातील धरणे तुडुंब

By admin | Updated: August 12, 2016 01:03 IST

आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम राहिला आहे. मावळ आणि परिसरात पावसाची संततधार राहिल्याने धरणे तुडुंब भरली आहेत.

पिंपरी : आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम राहिला आहे. मावळ आणि परिसरात पावसाची संततधार राहिल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. वडिवळे धरण ९७ टक्के तर आंद्रा, पवना ही धरणे १०० टक्के भरली आहेत. कासारसाईचे धरण ९१ टक्के भरले आहे. धरणे भरल्याने भविष्यातील पाणीसमस्या दूर झाल्याने पिंपरी-चिंचवडकरांनी तसेच मावळातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.सांडव्यावरून वाहू लागले पाणीटाकवे बुद्रुक : आंदर मावळातील आंद्रा धरण १०० टक्के भरले असून, धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. धरण तळेगाव औद्योगिक वसाहतीस पाणीपुरवठा करण्यासाठी १५वर्षांपूर्वी बांधण्यात आले. शेतकऱ्यांसाठीही धरण वरदान ठरत आहे. इंद्रायणी नदीची उपनदी आंद्रावर धरण उभारण्यात आले आहे. धरणाची उंची ३४.५० मीटर असून, लांबी ३३० मीटर आहे. पाणलोट क्षेत्र ९०.३५चौरस किमी आहे. आळंदी व देहूच्या यात्राकाळातही धरणातून पाणी सोडले जाते. वडिवळे धरणातून विसर्गकरंजगाव : नाणे मावळ परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त असल्यामुळे येथील परिसरात धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. वडिवळे धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. वडिवळे धरणात गुरुवारी (दि. ११) ९६.३३ टक्के पाणीसाठा होता. धरणातून ४१२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रात या वर्षी २१६२ मिमी पाऊस झाला आहे. धरणाची क्षमता ४०.८७ दलघमी आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी चांगला पाणीसाठा झाला आहे.कासारसाईत १२९ क्युसेकने विसर्गचांदखेड : धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे कासारसाई धरण १०० टक्के भरले आहे. परिसरात दमदार पाऊस पडत असल्यामुळे धरण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ८० टक्के भरले. त्याचप्रमाणे पुसाणे लघुपाटबंधारे प्रकल्पातून कासारसाई धरणात पाण्याचा विसर्ग धरणात येत असल्यामुळे धरणसाठा ११ आॅगस्ट अखेर ९१.६५ टक्के ठेवला असून, १२९ क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता १६.०४ दशलक्ष घनमीटर असून, सध्या पाणीसाठा १४.७२ दशलक्ष घनमीटर आहे.