शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मच्छीमार सहकारी संस्थांमधून कोट्यवधींचा भ्रष्टाचार

By admin | Updated: July 14, 2016 20:19 IST

राज्यातील गोड्या पाण्याच्या बंद पडलेल्या १४ मच्छीमार सहकारी संस्थांच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केला आहे.

- एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

मुंबई : राज्यातील गोड्या पाण्याच्या बंद पडलेल्या १४ मच्छीमार सहकारी संस्थांच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी विशेष तपास समितीमार्फत करावी, अशी मागणीही कृती समितीचे अध्यक्ष दामोदार तांडेल यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली आहे.मस्त्य आयुक्तालयात काही अधिकारी एकाच जागेवर गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत असल्याचा दावा तांडेल यांनी केला आहे. या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारात समावेश असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे बंद पडलेल्या मच्छीमार सहकारी संस्थांसोबत संबंधित अधिकाऱ्यांचीही एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.भ्रष्टाचार झालेल्या संस्थांमध्ये राजमाता विकास मच्छिमार सहकारी संस्थेवर तांडेल यांनी गंभीर आरोप केले आहेत. तांडेल यांनी सांगितले की, एन.सी.डी.सी. योजनेतून संस्थेला ३० मार्च २००९ रोजी बर्फ कारखाना आणि शीतगृह उभारण्यासाठी ३ कोटी ४२ लाख रुपये निधी मिळाला होता. मात्र निधी मिळाल्यानंतर संस्थेने बर्फ कारखाना आणि शीतगृह उभारलेच नाही. यासंस्थेच्या ३० मासेमारी यांत्रिक नौकांना प्रत्येकी ३९ लाख ४७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. २००६-०७ दरम्यान संस्थेला संपूर्ण निधी मिळाला. मात्र निधी मिळाल्याच्या ९ वर्षांनंतरही नौका बांधलेल्या नाहीत. याप्रकरणात एकूण ११ कोटी ८४ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही तांडेल यांनी केला आहे.आंदोलन करणार...मस्त्य विभागात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार असून लवकरच तो बाहेर काढणार असल्याचा दावाही तांडेल यांनी केला आहे. शनिवारी समितीची बैठक पार पडणार असून सरकारने तत्काळ दखल घेतली नाही, तर २७ जुलैला आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.