शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मच्छीमार सहकारी संस्थांमधून कोट्यवधींचा भ्रष्टाचार

By admin | Updated: July 14, 2016 20:19 IST

राज्यातील गोड्या पाण्याच्या बंद पडलेल्या १४ मच्छीमार सहकारी संस्थांच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केला आहे.

- एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

मुंबई : राज्यातील गोड्या पाण्याच्या बंद पडलेल्या १४ मच्छीमार सहकारी संस्थांच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी विशेष तपास समितीमार्फत करावी, अशी मागणीही कृती समितीचे अध्यक्ष दामोदार तांडेल यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली आहे.मस्त्य आयुक्तालयात काही अधिकारी एकाच जागेवर गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत असल्याचा दावा तांडेल यांनी केला आहे. या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारात समावेश असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे बंद पडलेल्या मच्छीमार सहकारी संस्थांसोबत संबंधित अधिकाऱ्यांचीही एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.भ्रष्टाचार झालेल्या संस्थांमध्ये राजमाता विकास मच्छिमार सहकारी संस्थेवर तांडेल यांनी गंभीर आरोप केले आहेत. तांडेल यांनी सांगितले की, एन.सी.डी.सी. योजनेतून संस्थेला ३० मार्च २००९ रोजी बर्फ कारखाना आणि शीतगृह उभारण्यासाठी ३ कोटी ४२ लाख रुपये निधी मिळाला होता. मात्र निधी मिळाल्यानंतर संस्थेने बर्फ कारखाना आणि शीतगृह उभारलेच नाही. यासंस्थेच्या ३० मासेमारी यांत्रिक नौकांना प्रत्येकी ३९ लाख ४७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. २००६-०७ दरम्यान संस्थेला संपूर्ण निधी मिळाला. मात्र निधी मिळाल्याच्या ९ वर्षांनंतरही नौका बांधलेल्या नाहीत. याप्रकरणात एकूण ११ कोटी ८४ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही तांडेल यांनी केला आहे.आंदोलन करणार...मस्त्य विभागात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार असून लवकरच तो बाहेर काढणार असल्याचा दावाही तांडेल यांनी केला आहे. शनिवारी समितीची बैठक पार पडणार असून सरकारने तत्काळ दखल घेतली नाही, तर २७ जुलैला आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.