शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

पीक विमा: शेवटच्या दिवशीही रांगा, ३० लाखांपेक्षा अधिक शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 05:00 IST

मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राज्यातील बँकांसमोर रांगा कायम होत्या. विदर्भ, मराठवाड्यात लाखो शेतक-यांचे अर्ज भरणे बाकी आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात ३0 लाखांपेक्षा अधिक शेतकरी योजनेपासून अजून वंचित असल्याचे ‘लोकमत’ला आढळले. नगर जिल्ह्यात सर्व्हरच बंद पडल्याने गोंधळ उडाला. नाशिकला योजनेस विशेष प्रतिसाद मिळालेला ...

मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राज्यातील बँकांसमोर रांगा कायम होत्या. विदर्भ, मराठवाड्यात लाखो शेतक-यांचे अर्ज भरणे बाकी आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात ३0 लाखांपेक्षा अधिक शेतकरी योजनेपासून अजून वंचित असल्याचे ‘लोकमत’ला आढळले. नगर जिल्ह्यात सर्व्हरच बंद पडल्याने गोंधळ उडाला. नाशिकला योजनेस विशेष प्रतिसाद मिळालेला नाही. बºयाच जिल्ह्यांत संध्याकाळपर्यंत पीक विमा काढलेल्या शेतकºयांची अधिकृत आकडेवारी मिळू शकली नाही.मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शेतक-यांना प्रचंड कसरत करावी लागली. रात्र-रात्र रांगा लावूनही अनेकांच्या पदरी निराशा आली.जालना जिल्ह्यात चार लाख शेतक-यांनी पीक विमा भरला. मागील वर्षी साडेचार लाख शेतकºयांनी पीकविमा उतरविला होता. बीडमध्ये ५ लाख ५ हजार, नांदेडमध्ये चार लाख, लातूरला ३ लाख ८६ हजार, हिंगोलीत सव्वालाख, उस्मानाबाद जिल्ह्यात ५० हजार शेतकºयांनी पीक विमा उतरविला.विदर्भातही ससेहोलपट-नागपूर जिल्ह्यात ४४ हजार शेतकºयांना खरीप पीक कर्ज वाटप झाले असून त्यांना विम्याचे कवच मिळाले. बिगर कर्जदारांचाही विमा काढला जात आहे, त्यामुळे संख्या वाढणार आहे.अमरावती जिल्ह्यात ३ लाख शेतकरी पीक विम्यासाठी पात्र आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी ८१ हजार शेतकºयांनीच विमा काढल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. २ लाख १९ हजार शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.यवतमाळ जिल्ह्यात विविध बँकांच्या शाखांमध्ये सोमवारी शेतकºयांनी गर्दी केली होती. जिल्हा बँकेमार्फत २० हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी विमा काढल्याची माहिती सरव्यवस्थापक अरविंद देशपांडे यांनी दिली. तर वर्ध्यातील १६ हजारतर गडचिरोलीत १७ हजार, भंडाºयात ५४ हजार शेतकºयांनी पीकविमा काढला.पावणेदोन लाख शेतक-यांचा पीक विमा-खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात जवळपास पावणेदोन लाख शेतकºयांनी पीक विमा उतविल्याची माहिती आहे. नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी ५९ हजार कर्जदार शेतकºयांनी पीकविमा उतरविला होता. यंदा मात्र केवळ १५ हजार सभासदांपुरताच विमा मर्यादित राहण्याची चिन्हे आहेत.पीक विम्यापासून वंचितलातूर ७,७४,०००नांदेड ३,६७,०००हिंगोली २,२५,०००परभणी २,००,०००बीड १,५०,०००अमरावती २,१९,०००वर्धा ७९,०००जालना ५0,०००नाशिक ४१,०००नगरला सर्व्हर डाऊन-अहमदनगरला सोमवारी सरकारचे संकेतस्थळ सकाळी दहानंतर बंद होते़ त्यामुळे शेवटच्या दिवशीही अर्ज दाखल करणारे शेतकरी योजनेपासून वंचित राहणार आहेत़ जिल्ह्यात अंदाजे २ लाख शेतकरी विविध बँकांचे कर्जदार आहेत़