शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा: शेवटच्या दिवशीही रांगा, ३० लाखांपेक्षा अधिक शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 05:00 IST

मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राज्यातील बँकांसमोर रांगा कायम होत्या. विदर्भ, मराठवाड्यात लाखो शेतक-यांचे अर्ज भरणे बाकी आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात ३0 लाखांपेक्षा अधिक शेतकरी योजनेपासून अजून वंचित असल्याचे ‘लोकमत’ला आढळले. नगर जिल्ह्यात सर्व्हरच बंद पडल्याने गोंधळ उडाला. नाशिकला योजनेस विशेष प्रतिसाद मिळालेला ...

मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राज्यातील बँकांसमोर रांगा कायम होत्या. विदर्भ, मराठवाड्यात लाखो शेतक-यांचे अर्ज भरणे बाकी आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात ३0 लाखांपेक्षा अधिक शेतकरी योजनेपासून अजून वंचित असल्याचे ‘लोकमत’ला आढळले. नगर जिल्ह्यात सर्व्हरच बंद पडल्याने गोंधळ उडाला. नाशिकला योजनेस विशेष प्रतिसाद मिळालेला नाही. बºयाच जिल्ह्यांत संध्याकाळपर्यंत पीक विमा काढलेल्या शेतकºयांची अधिकृत आकडेवारी मिळू शकली नाही.मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शेतक-यांना प्रचंड कसरत करावी लागली. रात्र-रात्र रांगा लावूनही अनेकांच्या पदरी निराशा आली.जालना जिल्ह्यात चार लाख शेतक-यांनी पीक विमा भरला. मागील वर्षी साडेचार लाख शेतकºयांनी पीकविमा उतरविला होता. बीडमध्ये ५ लाख ५ हजार, नांदेडमध्ये चार लाख, लातूरला ३ लाख ८६ हजार, हिंगोलीत सव्वालाख, उस्मानाबाद जिल्ह्यात ५० हजार शेतकºयांनी पीक विमा उतरविला.विदर्भातही ससेहोलपट-नागपूर जिल्ह्यात ४४ हजार शेतकºयांना खरीप पीक कर्ज वाटप झाले असून त्यांना विम्याचे कवच मिळाले. बिगर कर्जदारांचाही विमा काढला जात आहे, त्यामुळे संख्या वाढणार आहे.अमरावती जिल्ह्यात ३ लाख शेतकरी पीक विम्यासाठी पात्र आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी ८१ हजार शेतकºयांनीच विमा काढल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. २ लाख १९ हजार शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.यवतमाळ जिल्ह्यात विविध बँकांच्या शाखांमध्ये सोमवारी शेतकºयांनी गर्दी केली होती. जिल्हा बँकेमार्फत २० हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी विमा काढल्याची माहिती सरव्यवस्थापक अरविंद देशपांडे यांनी दिली. तर वर्ध्यातील १६ हजारतर गडचिरोलीत १७ हजार, भंडाºयात ५४ हजार शेतकºयांनी पीकविमा काढला.पावणेदोन लाख शेतक-यांचा पीक विमा-खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात जवळपास पावणेदोन लाख शेतकºयांनी पीक विमा उतविल्याची माहिती आहे. नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी ५९ हजार कर्जदार शेतकºयांनी पीकविमा उतरविला होता. यंदा मात्र केवळ १५ हजार सभासदांपुरताच विमा मर्यादित राहण्याची चिन्हे आहेत.पीक विम्यापासून वंचितलातूर ७,७४,०००नांदेड ३,६७,०००हिंगोली २,२५,०००परभणी २,००,०००बीड १,५०,०००अमरावती २,१९,०००वर्धा ७९,०००जालना ५0,०००नाशिक ४१,०००नगरला सर्व्हर डाऊन-अहमदनगरला सोमवारी सरकारचे संकेतस्थळ सकाळी दहानंतर बंद होते़ त्यामुळे शेवटच्या दिवशीही अर्ज दाखल करणारे शेतकरी योजनेपासून वंचित राहणार आहेत़ जिल्ह्यात अंदाजे २ लाख शेतकरी विविध बँकांचे कर्जदार आहेत़