शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा: शेवटच्या दिवशीही रांगा, ३० लाखांपेक्षा अधिक शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 05:00 IST

मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राज्यातील बँकांसमोर रांगा कायम होत्या. विदर्भ, मराठवाड्यात लाखो शेतक-यांचे अर्ज भरणे बाकी आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात ३0 लाखांपेक्षा अधिक शेतकरी योजनेपासून अजून वंचित असल्याचे ‘लोकमत’ला आढळले. नगर जिल्ह्यात सर्व्हरच बंद पडल्याने गोंधळ उडाला. नाशिकला योजनेस विशेष प्रतिसाद मिळालेला ...

मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राज्यातील बँकांसमोर रांगा कायम होत्या. विदर्भ, मराठवाड्यात लाखो शेतक-यांचे अर्ज भरणे बाकी आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात ३0 लाखांपेक्षा अधिक शेतकरी योजनेपासून अजून वंचित असल्याचे ‘लोकमत’ला आढळले. नगर जिल्ह्यात सर्व्हरच बंद पडल्याने गोंधळ उडाला. नाशिकला योजनेस विशेष प्रतिसाद मिळालेला नाही. बºयाच जिल्ह्यांत संध्याकाळपर्यंत पीक विमा काढलेल्या शेतकºयांची अधिकृत आकडेवारी मिळू शकली नाही.मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शेतक-यांना प्रचंड कसरत करावी लागली. रात्र-रात्र रांगा लावूनही अनेकांच्या पदरी निराशा आली.जालना जिल्ह्यात चार लाख शेतक-यांनी पीक विमा भरला. मागील वर्षी साडेचार लाख शेतकºयांनी पीकविमा उतरविला होता. बीडमध्ये ५ लाख ५ हजार, नांदेडमध्ये चार लाख, लातूरला ३ लाख ८६ हजार, हिंगोलीत सव्वालाख, उस्मानाबाद जिल्ह्यात ५० हजार शेतकºयांनी पीक विमा उतरविला.विदर्भातही ससेहोलपट-नागपूर जिल्ह्यात ४४ हजार शेतकºयांना खरीप पीक कर्ज वाटप झाले असून त्यांना विम्याचे कवच मिळाले. बिगर कर्जदारांचाही विमा काढला जात आहे, त्यामुळे संख्या वाढणार आहे.अमरावती जिल्ह्यात ३ लाख शेतकरी पीक विम्यासाठी पात्र आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी ८१ हजार शेतकºयांनीच विमा काढल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. २ लाख १९ हजार शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.यवतमाळ जिल्ह्यात विविध बँकांच्या शाखांमध्ये सोमवारी शेतकºयांनी गर्दी केली होती. जिल्हा बँकेमार्फत २० हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी विमा काढल्याची माहिती सरव्यवस्थापक अरविंद देशपांडे यांनी दिली. तर वर्ध्यातील १६ हजारतर गडचिरोलीत १७ हजार, भंडाºयात ५४ हजार शेतकºयांनी पीकविमा काढला.पावणेदोन लाख शेतक-यांचा पीक विमा-खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात जवळपास पावणेदोन लाख शेतकºयांनी पीक विमा उतविल्याची माहिती आहे. नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी ५९ हजार कर्जदार शेतकºयांनी पीकविमा उतरविला होता. यंदा मात्र केवळ १५ हजार सभासदांपुरताच विमा मर्यादित राहण्याची चिन्हे आहेत.पीक विम्यापासून वंचितलातूर ७,७४,०००नांदेड ३,६७,०००हिंगोली २,२५,०००परभणी २,००,०००बीड १,५०,०००अमरावती २,१९,०००वर्धा ७९,०००जालना ५0,०००नाशिक ४१,०००नगरला सर्व्हर डाऊन-अहमदनगरला सोमवारी सरकारचे संकेतस्थळ सकाळी दहानंतर बंद होते़ त्यामुळे शेवटच्या दिवशीही अर्ज दाखल करणारे शेतकरी योजनेपासून वंचित राहणार आहेत़ जिल्ह्यात अंदाजे २ लाख शेतकरी विविध बँकांचे कर्जदार आहेत़