शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
2
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
3
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
4
मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...
5
Shraddha Walker : "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या
6
Satara Crime: महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
7
Social Media Earning: इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरून कसे कमवता येतात पैसे? तुम्हीही बनू शकता लखपती! जाणून घ्या
8
एका जाहीरातीमुळे ट्रम्प यांची सटकली, थेट ट्रेड डीलवरील चर्चाच रद्द केली, काय होतं त्या जाहीरातीत?
9
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा
10
Womens World Cup 2025 Semi-Final Schedule : टीम इंडियासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान?
11
"अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास..."; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप
12
स्वतःला संपवू नका गं… तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे - चित्रा वाघ
13
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
14
Mumbai Crime: लालबागमध्ये थरार! बॉयफ्रेंडपासून वाचण्यासाठी रस्त्यावर धावत सुटली तरुणी; नर्सिंग होममध्ये घुसताच...
15
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
16
१०१ वर्ष जुनी कंपनी आयपीओ आणणार, १६६७ कोटी रुपये उभारणार; 'या' दिवसापासून करता येणार गुंतवणूक
17
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
18
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
19
बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?
20
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार

राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये पीक विमा सापडला संकटात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:24 IST

सहा वेळा निविदा; नुकसानभरपाईसाठी लक्ष्य केल्याने कंपन्यांचा असहकार

- अरुण बारसकरसोलापूर : पीक विम्याच्या भरपाईसाठी विमा कंपन्यांना लक्ष्य केल्याचा परिणाम म्हणून की काय, रब्बी हंगामासाठी राज्यातील १० जिल्ह्यांत एकाही विमा कंपनीने पीक विम्यासाठी स्वारस्य दाखवले नाही. कृषी आयुक्त स्तरावर सहा वेळा निविदा प्रसिद्ध केल्यानंतरही विमा कंपन्या पुढे आल्या नसल्याने शेतकऱ्यांना या वर्षी पीक विम्याची रक्कम भरता येणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.खरीप व रब्बी या हंगामासाठी पीक विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने १८ कंपन्या निश्चित केल्या आहेत. राज्यातील ३४ जिल्ह्यांसाठी कृषी आयुक्त स्तरावर पीक विम्यासाठी खरीप व रब्बी हंगामासाठी निविदा काढली जाते. यामध्ये केंद्राच्या यादीत असलेल्या कंपन्यांनाच निविदा भरता येते. कृषी आयुक्त स्तरावर सप्टेंबर महिन्यापासून टेंडर काढण्यास सुरुवात केली.सलग सहा वेळा टेंडर काढूनही सोलापूर, बीड, हिंगोली, लातूर, वाशिम, भंडारा, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग या १० जिल्ह्यांसाठी एकाही कंपनीने निविदा भरली नाही. रब्बी हंगाम सुरू होऊनही पीक विमा भरण्यासाठी कंपन्यांनी नकारघंटा दाखविल्याने वरील १० जिल्हतील शेतकऱ्यांना यावर्षी विम्याची रक्कम भरता येणार नाही.रब्बी हंगामबहुल जिल्ह्यातच शिवाय यावर्षी पाऊस उशिराने पडल्याने रब्बी हंगाम कालावधीत आता कुठे पिके घेण्यास सुरुवात झाली असताना विम्यासाठी कंपन्यांचा सहभाग नसल्याने राज्य शासनाने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला आहे. सहावेळा फेरनिविदा काढूनही कंपन्या सहभागासाठी नाखूश असल्याने आपल्या स्तरावर निर्णय घेण्याचे पत्र केंद्र सरकारला पाठविण्यात आले आहे. आता केंद्र सरकारच्या निर्णयावर राज्यातील १० जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा अवलंबून आहे. मागील दोन वर्षांपासून विमा कंपन्यांना राजकीय नेत्यांनी लक्ष्य केल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते.शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नकापीक विम्याचा कायदा असताना कंपन्या निविदा भरत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने स्वत:च पीक विम्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी. केंद्राने व राज्याने अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करावी. फायदा झाला तर सरकारला व तोटा झाला तर सरकारचाच. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. शेतकरी मोठा खर्च करुन पिके आणतो; मात्र आपत्तीमुळे एका रात्रीत पिके जमीनदोस्त होतात. केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा. - राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना़

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा