शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

पीक विमा काढण्याची मुदत वाढली!

By admin | Updated: September 3, 2015 23:58 IST

आता १५ सप्टेंबरपर्यंत काढता येईल पीक विमा, पण राज्याला फायदा काय?

अकोला : देशातील पाऊस व पिकांची स्थिती बघता केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीक विमा काढण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. पण, या पीक विम्याचा महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना फायदा काय, असा प्रश्न तज्ज्ञ शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे. पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ातील जवळपास ९ लाख शेतकर्‍यांनी ५0 कोटींच्यावर रक्कम भरू न पीक विमा काढला आहे. राज्यात ऑगस्ट अखेरपर्यंत १२७.८९ लाख म्हणजेच ९५ टक्के क्षेत्रावर विविध खरीप पिकांची पेरणी शेतकर्‍यांनी केली. पण, सतत पावसाचा खंड पडल्याने पिकांचे नुकसान झाले. शेतकर्‍यांना दुबार-तिबार पिकांची पेरणी करावी लागली. त्यामुळे शासनाने ७ ऑगस्टपर्यंत पीक विम्याची मुदत वाढ केली होती. तथापि ही मुदत वाढ जाहीर करताना १ ते ७ ऑगस्टपर्यंत ज्या शेतकर्‍यांनी पेरणी केली. केवळ त्याच शेतकर्‍यांना पीक विमा मुदत वाढीचा लाभ घेता येणार होता. परिणामी ज्या शेतकर्‍यांनी या तारखेच्या अगोदर पेरणी केली पण, पीक विमा काढला नव्हता, त्यांचा हिरमोड झाला. आता ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत ज्या शेतकर्‍यांनी पेरणी केली, त्यांना या पीक विम्याचा लाभ होईल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, पावसाची अनिश्‍चितता बघता केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीक विमा काढण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. पण, १ सप्टेंबरनंतर पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांना या पीक विम्याचा फायदा होणार असेल तर या राज्यात आता पेरणी करणारे शेतकरी उरले कुठे, असा प्रश्न तज्ज्ञ शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.