शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मिसाबंदींना पेन्शन देण्यावरून टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 06:17 IST

आणीबाणीतील मिसाबंदींना मासिक १० हजार रुपये पेन्शन देण्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून या योजनेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना वगळण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई : आणीबाणीतील मिसाबंदींना मासिक १० हजार रुपये पेन्शन देण्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून या योजनेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना वगळण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. तर हा निर्णय शिवसेनेला मान्य आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.सरकारचा हा निर्णय म्हणजे स्वातंत्र्य चळवळ आणि त्या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान आहे. स्वातंत्र्य लढ्यात कोणतेही योगदान नसणारे आणि ब्रिटिशांची चापलूसी करणारे आता समाजात सहानुभूती मिळवण्याचा फुटकळ प्रयत्न करत आहेत. इतिहास बदलण्याचा हा घातकी डाव आहे, अशी टीका खा.चव्हाण यांनी केली आहे. तत्कालिन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणिबाणीला पाठिंबा दिला होता, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. तर बाळासाहेब ठाकरे यांनीही आणीबाणीचे केलेले समर्थन केले होते. त्यामुळे शिवसेनेला सरकारचा हा निर्णय मान्य आहे का, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.आणीबाणीत हाजी मस्तान, मिर्झा, सुकरनारायणन बखियासारखे स्मगलरही मिसाखाली तुरुंगात होते. मग अशांनाही पेन्शन देणार का, असेही मलिक म्हणाले.

टॅग्स :Governmentसरकारnewsबातम्या