शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

पाण्याची पातळी कमी झाल्याने गावावर संकट

By admin | Updated: April 8, 2017 01:52 IST

निरनिमगावात पिण्याच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने गावावर बिकट संकट आल्याचे चित्र निर्माण झाले

नीरा-नृसिंहपूर : निरनिमगावात पिण्याच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने गावावर बिकट संकट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी न मिळाल्याने गावात जवळपास ७ शेळ्यांचा पाण्यावाचून तडफडून मृत्यू झाल्याचे वास्तव आहे.पाण्याअभावी रखमाबाई सोपान वाघमोडे यांच्या दोन शेळ्यांचा तडफडून मृत्यू झाला. तसेच, बाबासो हेगडे यांच्या तीन शेळ्यांचा व सेसाबाई मजगे यांच्या दोन शेळ्यांचा उन्हाची तीव्रता वाढल्याने पिण्यास पाणी न मिळाल्याने तडफडून मृत्यू झाला. या मृत्यू झालेल्या शेळ्यांची कुठल्याही प्रकारची खबरदारी व पंचनामा न केल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली नाही, अशी माहिती या शेळीमालकांनी दिली. ही माहिती समजताच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निरनिमगावला भेट दिली. शेळीमालकांना भेट देऊन त्यांना नुकसानभरपाईसाठी आर्थिक मदत केली. तसेच, तातडीने गावामध्ये पाण्याचा टँकर चालू करण्याचे आश्वासन दिले. या वेळेस त्यांनी नीरानदीचे पाहणी केली. निरा नदी कोरडी पडल्याने गावातील लोकांवर बिकट दिवस आले आहेत. तसेच जनावरांना चाऱ्याचे हाल चालले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी पाटील यांच्याकडे व नीरा नदीवर मिनी बंधारा बांधण्यासाठी मागणी केली आहे. या वेळी मनोज पाटील, प्रताप पाटील, तलाठी, एस. टी. यादव, ग्रामसेवक आंबिका पावसे, काशिनाथ पवार, बापू महानवर, रघुनाथ पाटील, लालासो महानवर, रामचंद्र जाधव, अजय पाटील, गोळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उन्हाची तीव्रता वाढल्याने सर्व बोर, विहिरी, तलाव, आड यांचे पाणी आटले आहे. दोन ते तीन किलोमीटरवरून महिला व लहान मुलांना पायपीट करून व जीव धोक्यात घालून विहिरीतून ७० ते ८० फुटांवरून पाणी काढावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व जनावरांना चाऱ्यासाठी छावण्या चालू करण्याची ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.तसेच, इंदापूर तालुक्यात पाणीटंचाईमुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीरतेने भेडसावत आहे. नीरा डावा, खडकवासला कालव्यातून पाणी सोडून नीरा नदीवरील बंधारे भरण्याची मागणी पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. (वार्ताहर)