शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

पाण्याची पातळी कमी झाल्याने गावावर संकट

By admin | Updated: April 8, 2017 01:52 IST

निरनिमगावात पिण्याच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने गावावर बिकट संकट आल्याचे चित्र निर्माण झाले

नीरा-नृसिंहपूर : निरनिमगावात पिण्याच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने गावावर बिकट संकट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी न मिळाल्याने गावात जवळपास ७ शेळ्यांचा पाण्यावाचून तडफडून मृत्यू झाल्याचे वास्तव आहे.पाण्याअभावी रखमाबाई सोपान वाघमोडे यांच्या दोन शेळ्यांचा तडफडून मृत्यू झाला. तसेच, बाबासो हेगडे यांच्या तीन शेळ्यांचा व सेसाबाई मजगे यांच्या दोन शेळ्यांचा उन्हाची तीव्रता वाढल्याने पिण्यास पाणी न मिळाल्याने तडफडून मृत्यू झाला. या मृत्यू झालेल्या शेळ्यांची कुठल्याही प्रकारची खबरदारी व पंचनामा न केल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली नाही, अशी माहिती या शेळीमालकांनी दिली. ही माहिती समजताच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निरनिमगावला भेट दिली. शेळीमालकांना भेट देऊन त्यांना नुकसानभरपाईसाठी आर्थिक मदत केली. तसेच, तातडीने गावामध्ये पाण्याचा टँकर चालू करण्याचे आश्वासन दिले. या वेळेस त्यांनी नीरानदीचे पाहणी केली. निरा नदी कोरडी पडल्याने गावातील लोकांवर बिकट दिवस आले आहेत. तसेच जनावरांना चाऱ्याचे हाल चालले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी पाटील यांच्याकडे व नीरा नदीवर मिनी बंधारा बांधण्यासाठी मागणी केली आहे. या वेळी मनोज पाटील, प्रताप पाटील, तलाठी, एस. टी. यादव, ग्रामसेवक आंबिका पावसे, काशिनाथ पवार, बापू महानवर, रघुनाथ पाटील, लालासो महानवर, रामचंद्र जाधव, अजय पाटील, गोळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उन्हाची तीव्रता वाढल्याने सर्व बोर, विहिरी, तलाव, आड यांचे पाणी आटले आहे. दोन ते तीन किलोमीटरवरून महिला व लहान मुलांना पायपीट करून व जीव धोक्यात घालून विहिरीतून ७० ते ८० फुटांवरून पाणी काढावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व जनावरांना चाऱ्यासाठी छावण्या चालू करण्याची ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.तसेच, इंदापूर तालुक्यात पाणीटंचाईमुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीरतेने भेडसावत आहे. नीरा डावा, खडकवासला कालव्यातून पाणी सोडून नीरा नदीवरील बंधारे भरण्याची मागणी पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. (वार्ताहर)