शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दहा हजार माथाडींवर संकट

By admin | Updated: June 30, 2016 04:20 IST

भाजीपाला नियमनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली

नामदेव मोरे,

नवी मुंबई- शासनाने फळे व भाजीपाला नियमनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने साखर, डाळी व सुका मेवा बाजार समितीमधून यापूर्वीच वगळला असून आता भाजीपाला व फळे वगळल्यास येथील तीन मार्केटमधील जवळपास दहा हजार कामगारांसह वाहतूकदार व इतर घटकांवर बेरोजगारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची थेट विक्री करता यावी यासाठी शासनाने भाजीपाला व फळे बाजार समितीमधून वगळण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबई बाजार समितीला बसणार आहे. अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली नसली तरी भविष्यात त्याचे परिणाम दिसू लागणार आहेत. शासनाने यापूर्वी साखर, डाळी, सुका मेवा, रवा, मैदा या वस्तू नियमनातून वगळल्या आहेत. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. व्यापारी बहुतांश मालाची परस्पर विक्री करत असल्याने माथाडी कामगारांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. सद्यस्थितीमध्ये कांदा - बटाटा, भाजीपाला व फळे या तीनच मार्केटमधील कृषी मालाचे नियमन सुरू आहे. आता या वस्तूही नियमनातून मुक्त करण्यात येणार असल्याने बाजार समितीच्या अस्तित्वाला काही अर्थच राहणार नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका माथाडी कामगारांना बसणार आहे. जवळपास दहा हजार माथाडी कामगार व तेवढेच रोजंदारी कामगार मालाची चढउतार करण्याचे काम करत आहेत. भाजीपाला थेट मुंबईत गेल्यास कामगारांचा रोजगार कमी होणार असून त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ येणार आहे. साखर, डाळी व सुका मेवा यापूर्वीच बाजार समितीमधून वगळला आहे. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आता भाजी व फळे वगळल्याने त्याचा थेट परिणाम माथाडी कामगारांच्या रोजगारावर होण्याची शक्यता आहे. एपीएमसीमधील व्यापारावर किमान ३० ते ४० टक्के परिणाम होण्याची शक्यता असून याविषयी सर्व घटकांना विश्वासात घेवून पुढील निर्णय घेतला जाईल. - आमदार शशिकांत शिंदे, माथाडी नेते