शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार माथाडींवर संकट

By admin | Updated: June 30, 2016 04:20 IST

भाजीपाला नियमनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली

नामदेव मोरे,

नवी मुंबई- शासनाने फळे व भाजीपाला नियमनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने साखर, डाळी व सुका मेवा बाजार समितीमधून यापूर्वीच वगळला असून आता भाजीपाला व फळे वगळल्यास येथील तीन मार्केटमधील जवळपास दहा हजार कामगारांसह वाहतूकदार व इतर घटकांवर बेरोजगारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची थेट विक्री करता यावी यासाठी शासनाने भाजीपाला व फळे बाजार समितीमधून वगळण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबई बाजार समितीला बसणार आहे. अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली नसली तरी भविष्यात त्याचे परिणाम दिसू लागणार आहेत. शासनाने यापूर्वी साखर, डाळी, सुका मेवा, रवा, मैदा या वस्तू नियमनातून वगळल्या आहेत. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. व्यापारी बहुतांश मालाची परस्पर विक्री करत असल्याने माथाडी कामगारांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. सद्यस्थितीमध्ये कांदा - बटाटा, भाजीपाला व फळे या तीनच मार्केटमधील कृषी मालाचे नियमन सुरू आहे. आता या वस्तूही नियमनातून मुक्त करण्यात येणार असल्याने बाजार समितीच्या अस्तित्वाला काही अर्थच राहणार नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका माथाडी कामगारांना बसणार आहे. जवळपास दहा हजार माथाडी कामगार व तेवढेच रोजंदारी कामगार मालाची चढउतार करण्याचे काम करत आहेत. भाजीपाला थेट मुंबईत गेल्यास कामगारांचा रोजगार कमी होणार असून त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ येणार आहे. साखर, डाळी व सुका मेवा यापूर्वीच बाजार समितीमधून वगळला आहे. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आता भाजी व फळे वगळल्याने त्याचा थेट परिणाम माथाडी कामगारांच्या रोजगारावर होण्याची शक्यता आहे. एपीएमसीमधील व्यापारावर किमान ३० ते ४० टक्के परिणाम होण्याची शक्यता असून याविषयी सर्व घटकांना विश्वासात घेवून पुढील निर्णय घेतला जाईल. - आमदार शशिकांत शिंदे, माथाडी नेते