शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

दहा हजार माथाडींवर संकट

By admin | Updated: June 30, 2016 04:20 IST

भाजीपाला नियमनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली

नामदेव मोरे,

नवी मुंबई- शासनाने फळे व भाजीपाला नियमनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने साखर, डाळी व सुका मेवा बाजार समितीमधून यापूर्वीच वगळला असून आता भाजीपाला व फळे वगळल्यास येथील तीन मार्केटमधील जवळपास दहा हजार कामगारांसह वाहतूकदार व इतर घटकांवर बेरोजगारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची थेट विक्री करता यावी यासाठी शासनाने भाजीपाला व फळे बाजार समितीमधून वगळण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबई बाजार समितीला बसणार आहे. अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली नसली तरी भविष्यात त्याचे परिणाम दिसू लागणार आहेत. शासनाने यापूर्वी साखर, डाळी, सुका मेवा, रवा, मैदा या वस्तू नियमनातून वगळल्या आहेत. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. व्यापारी बहुतांश मालाची परस्पर विक्री करत असल्याने माथाडी कामगारांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. सद्यस्थितीमध्ये कांदा - बटाटा, भाजीपाला व फळे या तीनच मार्केटमधील कृषी मालाचे नियमन सुरू आहे. आता या वस्तूही नियमनातून मुक्त करण्यात येणार असल्याने बाजार समितीच्या अस्तित्वाला काही अर्थच राहणार नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका माथाडी कामगारांना बसणार आहे. जवळपास दहा हजार माथाडी कामगार व तेवढेच रोजंदारी कामगार मालाची चढउतार करण्याचे काम करत आहेत. भाजीपाला थेट मुंबईत गेल्यास कामगारांचा रोजगार कमी होणार असून त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ येणार आहे. साखर, डाळी व सुका मेवा यापूर्वीच बाजार समितीमधून वगळला आहे. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आता भाजी व फळे वगळल्याने त्याचा थेट परिणाम माथाडी कामगारांच्या रोजगारावर होण्याची शक्यता आहे. एपीएमसीमधील व्यापारावर किमान ३० ते ४० टक्के परिणाम होण्याची शक्यता असून याविषयी सर्व घटकांना विश्वासात घेवून पुढील निर्णय घेतला जाईल. - आमदार शशिकांत शिंदे, माथाडी नेते