शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचे संकट

By admin | Updated: June 20, 2014 00:56 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने लावलेल्या ५० टक्के शिक्षक भरतीच्या अटीचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्याचा दबाव असताना आर्थिक नुकसान

विना अनुदानित जागांवर प्रवेशास नकार : महाविद्यालयांचा सावध पवित्रानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने लावलेल्या ५० टक्के शिक्षक भरतीच्या अटीचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्याचा दबाव असताना आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बऱ्याच महाविद्यालयांनी विना अनुदानित तुकड्यांतील जागांवर प्रवेश देणे थांबविले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अगोदरच बारावीचा लागलेला विक्रमी निकाल आणि त्यातच महाविद्यालयांकडून घेण्यात येत असलेली ही भूमिका यामुळे अनेक विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. नामवंत महाविद्यालयांत तर प्रवेश मिळविताना विद्यार्थ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. २ जून रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला. यंदा संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८९.०७ टक्के इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात चक्क १५.९७ टक्क्यांची वाढ झाली. शिवाय प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतदेखील वाढ झाली. अभियांत्रिकी व वैैद्यकीय अभ्यासक्रमांना न जाणाऱ्या विद्यार्थ्यांची विज्ञान व वा़णिज्य शाखेसाठी कल दिसून येत आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांचा अद्यापही प्रवेश झालेला नाही. प्रवेशासाठी महाविद्यालयांत गेल्यावर त्यांना नकारघंटा मिळत आहे. त्यामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांसमोर ‘प्रवेश घ्यायचा कुठे’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यापीठाने मागील महिन्यात जारी केलेल्या अधिसूचनेमुळे महाविद्यालयांनी सावध पवित्रा घेतला आहे. २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५० टक्के पूर्णकालीन शिक्षकांची नियुक्ती करण्याची अट विद्यापीठाने लावली आहे. पारंपरिक, व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना ही अट आहे. विज्ञान शाखेत विषयनिहाय शिक्षकांच्या नेमणुका करणे आवश्यक राहणार आहे. सर्व महाविद्यालयांनी कालांतराने १०० टक्के पूर्णकालीन शिक्षकांची नेमणूक करावी, असे निर्देश विद्यापीठाने दिले होते. जी महाविद्यालये संबंधित अटींचे पालन करणार नाहीत त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा विद्यापीठाने दिला होता. २५० महाविद्यालयांच्या प्रवेशबंदीचा गुंता अद्याप सुटला नसल्याने त्या महाविद्यालयांत प्रवेश बंदच आहेत. त्यातच ही अधिसूचना आल्यामुळे महाविद्यालयांनी सावध पवित्रा घेतला आहे. अनुदानित तुकड्यांमधील प्रवेश सुरू असले तरी विनाअनुदानित तत्त्वावरील तुकड्यांमधील प्रवेश मात्र महाविद्यालयांनी थांबविला आहे. या तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला तर किमान ५० टक्के शिक्षकांची नियुक्ती करावी लागेल. या शिक्षकांना वेतन देण्यातच बहुतांश रक्कम खर्च होईल. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना इतर सुविधा पुरविता येणार नाही. शिवाय महाविद्यालयांना आर्थिक फटका सहन करावा लागेल तो वेगळाच. त्यामुळे आम्ही सध्या प्रवेश न देण्याची भूमिका घेतल्याचे एका विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.(प्रतिनिधी)