शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
7
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
8
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
9
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
10
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
11
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
12
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
13
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
14
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
15
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
16
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
17
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
18
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
19
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
20
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचे संकट

By admin | Updated: June 20, 2014 00:56 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने लावलेल्या ५० टक्के शिक्षक भरतीच्या अटीचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्याचा दबाव असताना आर्थिक नुकसान

विना अनुदानित जागांवर प्रवेशास नकार : महाविद्यालयांचा सावध पवित्रानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने लावलेल्या ५० टक्के शिक्षक भरतीच्या अटीचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्याचा दबाव असताना आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बऱ्याच महाविद्यालयांनी विना अनुदानित तुकड्यांतील जागांवर प्रवेश देणे थांबविले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अगोदरच बारावीचा लागलेला विक्रमी निकाल आणि त्यातच महाविद्यालयांकडून घेण्यात येत असलेली ही भूमिका यामुळे अनेक विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. नामवंत महाविद्यालयांत तर प्रवेश मिळविताना विद्यार्थ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. २ जून रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला. यंदा संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८९.०७ टक्के इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात चक्क १५.९७ टक्क्यांची वाढ झाली. शिवाय प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतदेखील वाढ झाली. अभियांत्रिकी व वैैद्यकीय अभ्यासक्रमांना न जाणाऱ्या विद्यार्थ्यांची विज्ञान व वा़णिज्य शाखेसाठी कल दिसून येत आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांचा अद्यापही प्रवेश झालेला नाही. प्रवेशासाठी महाविद्यालयांत गेल्यावर त्यांना नकारघंटा मिळत आहे. त्यामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांसमोर ‘प्रवेश घ्यायचा कुठे’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यापीठाने मागील महिन्यात जारी केलेल्या अधिसूचनेमुळे महाविद्यालयांनी सावध पवित्रा घेतला आहे. २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५० टक्के पूर्णकालीन शिक्षकांची नियुक्ती करण्याची अट विद्यापीठाने लावली आहे. पारंपरिक, व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना ही अट आहे. विज्ञान शाखेत विषयनिहाय शिक्षकांच्या नेमणुका करणे आवश्यक राहणार आहे. सर्व महाविद्यालयांनी कालांतराने १०० टक्के पूर्णकालीन शिक्षकांची नेमणूक करावी, असे निर्देश विद्यापीठाने दिले होते. जी महाविद्यालये संबंधित अटींचे पालन करणार नाहीत त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा विद्यापीठाने दिला होता. २५० महाविद्यालयांच्या प्रवेशबंदीचा गुंता अद्याप सुटला नसल्याने त्या महाविद्यालयांत प्रवेश बंदच आहेत. त्यातच ही अधिसूचना आल्यामुळे महाविद्यालयांनी सावध पवित्रा घेतला आहे. अनुदानित तुकड्यांमधील प्रवेश सुरू असले तरी विनाअनुदानित तत्त्वावरील तुकड्यांमधील प्रवेश मात्र महाविद्यालयांनी थांबविला आहे. या तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला तर किमान ५० टक्के शिक्षकांची नियुक्ती करावी लागेल. या शिक्षकांना वेतन देण्यातच बहुतांश रक्कम खर्च होईल. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना इतर सुविधा पुरविता येणार नाही. शिवाय महाविद्यालयांना आर्थिक फटका सहन करावा लागेल तो वेगळाच. त्यामुळे आम्ही सध्या प्रवेश न देण्याची भूमिका घेतल्याचे एका विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.(प्रतिनिधी)