शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढले

By admin | Updated: November 6, 2015 02:19 IST

भाजपाची सत्ता आल्यावर महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण आठ वरुन ४२ टक्क्यांवर नेले आहे. परिणामी देशात आपला गुन्हे सिद्ध करण्यात पाचवा क्रमांक आला आहे,

ठाणे : भाजपाची सत्ता आल्यावर महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण आठ वरुन ४२ टक्क्यांवर नेले आहे. परिणामी देशात आपला गुन्हे सिद्ध करण्यात पाचवा क्रमांक आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. कोकण परिक्षेत्रातील १०२ व्यक्तींचा चोरी गेलेला मुद्देमाल त्यांना परत करण्याचा कार्यक्रम डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला. १५ जणांना दोन कोटी ७९ लाखांच्या मुद्देमालाचे प्रातिनिधीक अभिहस्तांतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘एखाद्याचा मुद्देमाल चोरी गेल्यानंतर तो वर्षानुवर्षे परत मिळत नाही. त्यासाठी कोर्टात खेटे मारावे लागतात. यातून दुहेरी त्रास होतो. अशा प्रकारे मुद्देमाल हस्तांतराचा उपक्र म राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांनी राबवावा. त्यातून नागरिकांमध्ये पोलिसांबाबत विश्वासाची भावना निर्माण होऊन पोलिसांना नागरिकांचे सहकार्य मिळेल.’एफआयआर अ‍ॅप्लिकेशनचेही उद्घाटनया कार्यक्र मादरम्यान महिला - जेष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या फर्स्ट इमिजिएट रिस्पॉन्स (एफआयआर) या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनचे फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या अ‍ॅपमुळे संकटात सापडलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिकांना जीपीएसच्या माध्यमातून पोलिसांची मदत मिळणार आहे. पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्याने त्यांची कार्यक्षमता वाढून कामकाज पारदर्शी होणार असल्याचेही ते म्हणाले.