शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

कृषी मंत्रालयाच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा

By admin | Updated: November 5, 2016 20:36 IST

शेतक-यांसाठी राबवल्या जाणा-या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहिती व प्रशिक्षणासाठी नेमलेल्या दोन संस्थांनी कृषी मंत्रालयाची ८ लाख ९५ हजार ५५० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे

ऑनलाइन लोकमत
दोन संस्थांचा समावेश : अनुदान घेऊन सादर केला नाही ताळेबंद 
पुणे, दि. 5 - शेतक-यांसाठी राबवल्या जाणा-या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहिती व प्रशिक्षणासाठी नेमलेल्या दोन संस्थांनी कृषी मंत्रालयाची ८ लाख ९५ हजार ५५० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये इन्स्टीट्युट ऑफ रेलिव्हंट रिसर्च (आयआरआर) या बाणेरमधील अनुदानित संस्थेसह नवी दिल्लीतील मेट्रीक कन्सलटन्सी लिमिटेड या संस्थांचा समावेश आहे. 
याप्रकरणी कृषी मंत्रालयातील वरिष्ठ टेक्निकल अधिकारी पुरुषोत्तम खियाराम राजानी (वय ५४, रा. श्रीनगर राणीबाग, दिल्ली, मुळ रा. उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील शेतक-यांना अंबा व द्राक्ष उत्पादनासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांच्याकडून चांगल्या प्रतीचे उत्पन्न मिळवण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी मंत्रालयाकडून गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही संस्थांशी ७ फेब्रुवारी १९९६ रोजी नवी दिल्लीमध्ये करार झाला होता. या कराराची मुदत ३१ मार्च १९९९ रोजी संपली आहे. 
या कंपनीचे मॅनेजिंग ट्रस्टी आणि रिसर्च संचालक डॉ. अमिता देशमुख आणि संचालक तसेच वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. आनंद करंदीकर आहेत. मंत्रालयाकडून वेळोवेळी या संस्थांना डीडीच्या माध्यमातून ८ लाख ९५5 हजार ५५० रुपये देण्यात आले होते. मंत्रालयाने घालून दिलेल्या अटीप्रमाणे आर्थिक उलाढालीचा तपशील तसेच वार्षिक ताळेबंद किंवा कोणत्याही प्रकारचा हिशोब विवरण पत्र (फायनल रिपोर्ट) तसेच आॅडीट युटिलायझेशन सर्टीफिकेट अद्यापपर्यंत सादर केले नाही. यासोबतच राज्यातील शेतक-यांसाठी अथवा फळ उत्पादकांसाठी दिलेल्या रकमेचा नक्की काय वापर केला याबाबतही त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही. राज्यातील आंबा आणि द्राक्ष उत्पादीत करणा-या शेतक-यांना फळांच्या उत्पन्नासाठी व नवीन प्रजातीच्या निर्मितीसाठी आयआरआर या कंपनीस दिलेल्या रकमेचा अपहार करण्यात आल्याचे लक्षात आल्यावर सन २००० ते २०११ या कालावधीत कृषी मंत्रालयाने दोन्ही संस्थांशी फोन व रजिस्टर पत्रांद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकला नाही. 
डॉ. देशमुख आणि डॉ. करंदीकर यांचे मेट्रीक कन्सलटन्सी हे कार्यालय बंद होते. तसेच पुण्यातील आयआरआरचेही कार्यालय बंद करण्यात आलेले होते. या दोघांशीही कोणताही संपर्क होत नसल्याने मंत्रालयाच्या अतिरीक्त सचिवांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राजानी यांनी फिर्याद दाखल केली. पुढील तपास उपनिरीक्षक ए. आर. शिंदे करीत आहेत.