शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

गुन्हेगाराला कोणताही राजकीय रंग नसतो

By admin | Updated: February 28, 2016 01:51 IST

गुन्हेगार राजकारणात शिरून राजकीय वलय मिळवित असले तरी राजकारणातील एखादी व्यक्ती जेव्हा गुन्हा करते तेव्हा ती अमूक एका राजकीय पक्षाची म्हणून गुन्हेगार असत नाही,

पुणे : गुन्हेगार राजकारणात शिरून राजकीय वलय मिळवित असले तरी राजकारणातील एखादी व्यक्ती जेव्हा गुन्हा करते तेव्हा ती अमूक एका राजकीय पक्षाची म्हणून गुन्हेगार असत नाही, असा काहीसा अचंबित करणारा पवित्रा राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी शनिवारी येथे घेतला. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पोलीस मित्र मेळाव्यात दीक्षित उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण होण्याच्या लातूर आणि ठाणे येथील अलिकडच्या घटनांबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी अत्यंत सावध पवित्रा घेत उत्तर दिले. गुन्हेगार राजकीय पक्षांचे वलय मिळवत असले तरी गुन्हेगार आणि राजकीय पक्षांचा तसा संबंध नसतो. महिला पोलिसाला मारहाण झाल्याच्या प्रकणात आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभुमीचे लोक राजकीय पक्षांमध्ये जातात. राजकीय पक्ष आणि गुन्हेगारांचा संबंध जोडणे चुकीचे आहे. ठाण्यातील घटनेतील आरोपीच्या संदर्भात संबंधित पक्षाने तो आमचा कार्यकर्ता नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे दीक्षित यांनी सांगितेले. (प्रतिनिधी)पोलीसमित्रांंनाही प्रशिक्षणराज्यामध्ये राबवण्यात येणारी पोलीस मित्र संकल्पना सद्विचारांवर आधारलेली आहे. ती यशस्वी होत असून अशाप्रकारे नागरी सहभागातून पोलिसांकडून राबवला जाणारा देशातील हा पहिला उपक्रम आहे. यापुढे पोलीसमित्रांनाही पोलिसांप्रमाणे प्रशिक्षण द्यावे, जेणेकरुन त्यांच्या कामात कुशलात येईल, अशी सूचना पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी आयोजित केलेल्या पोलीस मित्र मेळाव्यामध्ये महासंचालकांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीसमित्रांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, अधिक्षक डॉ. जय जाधव, अतिरीक्त अधिक्षक राजकुमार शिंदे, तानाजी चिखले यावेळी उपस्थित होते. दीक्षित म्हणाले, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये पोलीसमित्र संकल्पना विविध पद्धतीने राबवण्यात येते. आपल्या देशात मात्र केवळ महाराष्ट्रातच पोलिसांच्या कामात नागरी सहभाग घेतला जातो. उपक्रमाला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद पाहता आपले काम योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. पोलीसमित्रांची संख्या आणखी वाढवून त्यांना पोलिसांप्रमाणे प्रशिक्षण द्यावे. शासन स्तरावर अद्याप मान्यता मिळालेली नसली तरी राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यापर्यंत ही संकल्पना पोहोचल्याचे दीक्षित म्हणाले.