शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

...तर प्रवाशांवरही गुन्हा

By admin | Updated: April 3, 2015 02:20 IST

दलालांकडून रेल्वेच्या ई-तिकिटांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केले जात असल्याचे उघडकीस येत आहे. हे दलाल बोगस ओळखपत्र तयार

मुंबई : दलालांकडून रेल्वेच्या ई-तिकिटांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केले जात असल्याचे उघडकीस येत आहे. हे दलाल बोगस ओळखपत्र तयार करून प्रवाशांसाठी अनधिकृतपणे तिकिटे काढत असल्याचे आरपीएफच्या निदर्शनास आले असून, या गैरप्रकारांना अद्यापतरी आळा घालता आलेला नाही. त्यामुळे हे गैरप्रकार थांबविण्यासाठी दलालांबरोबरच प्रवाशांवरही गुन्हा दाखल करण्याचा विचार आरपीएफकडून केला जात आहे. पश्चिम रेल्वे आरपीएफकडून तशी शिफारस करण्यावर काम सुरू असून, लवकरच रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. आॅनलाइन आरक्षणातील गैरप्रकार रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेत ई-तिकिटांमधील दलाली रोखण्यासंदर्भात काही शिफारशी आरपीएफकडून कार्यशाळेत मांडण्यात आल्या आणि कार्यवृत्तही तयार केले. यामध्ये प्रवाशांवरही गुन्हा दाखल करण्याची महत्त्वाची शिफारस करण्यात आली. आतापर्यंत दलाल पकडल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई केली जात होती; आणि दंड न भरल्यास जेलची हवा खावी लागते. मात्र याच दलालांकडून तिकीट घेणाऱ्या प्रवाशांवर कुठलाही गुन्हा दाखल होत नव्हता. त्यांच्यामुळे दलालांना अधिक प्रोत्साहन मिळत असल्याने थेट प्रवाशांवरच गुन्हा दाखल केल्यास अनधिकृतपणे ई-तिकीट घेण्यास प्रवासी घाबरतील आणि एक भीती प्रवाशांमध्ये निर्माण होईल. त्यामुळे प्रवाशांवरही गुन्हा दाखल करण्याची शिफारस या कार्यशाळेत केली गेल्याचे पश्चिम रेल्वे आरपीएफचे (मुंबई विभाग) वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद झा यांनी सांगितले.