शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षे होऊनही शेतकऱ्यांवर गुन्हे

By admin | Updated: August 9, 2016 01:47 IST

मावळ गोळीबाराला ५ वर्षे सोमवारी पूर्ण झाली. मात्र, बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करण्याची आणि आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे युतीच्या नेत्यांनी दिलेले

पवनानगर : मावळ गोळीबाराला ५ वर्षे सोमवारी पूर्ण झाली. मात्र, बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करण्याची आणि आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे युतीच्या नेत्यांनी दिलेले आश्वासन त्यांचे सरकार येऊनही अद्याप पूर्ण केल नाही.पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला बंद जलवाहिनीतून पाणी नेण्यासाठी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध करण्यासाठी ९ आॅगस्ट २०११ रोजी मुंबई-पुणे महामार्गावर रस्ता रोको करून आंदोलन केले होते. या आंदोलनात भाजपा, शिवसेना, आरपीआय, काँग्रेस हे राजकीय पक्षही सहभागी होते. हे आंदोलन थांबवण्यासाठी पोलीस व आंदोलनकर्ते यात खटका उडाला व हे आंदोलन चिघळले. यातून पोलिसांनी गोळीबार केला. त्यात कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे व श्याम तुपे हे तीन शेतकरी मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर त्या काळातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य सरकारने आंदोलनात शहीद झालेल्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीत घेण्याचे आश्वासन दिले होते. खूप उशिराने त्या तीन कुटुंबांतील प्रत्येकी एकेका व्यक्तीला महापालिकेत नोकरी देण्यात आली आहे. आंदोलन काळात शेतकऱ्यांवर ३०७सारखे गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत. युती शासन आल्यानंतर हे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन निवडणूक प्रचारात युतीच्या नेत्यांनी दिले होते. बंद जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करू, असेही सांगितले होते. मात्र, युती शासन सत्तेत येऊन २ वर्षे होत आली, तरी प्रकल्प रद्दची घोषणा झालेली नाही. शेतकऱ्यांवरील गुन्हेही मागे घेण्यात आलेले नाहीत.