शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

पाच वर्षे होऊनही शेतकऱ्यांवर गुन्हे

By admin | Updated: August 9, 2016 01:47 IST

मावळ गोळीबाराला ५ वर्षे सोमवारी पूर्ण झाली. मात्र, बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करण्याची आणि आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे युतीच्या नेत्यांनी दिलेले

पवनानगर : मावळ गोळीबाराला ५ वर्षे सोमवारी पूर्ण झाली. मात्र, बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करण्याची आणि आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे युतीच्या नेत्यांनी दिलेले आश्वासन त्यांचे सरकार येऊनही अद्याप पूर्ण केल नाही.पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला बंद जलवाहिनीतून पाणी नेण्यासाठी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध करण्यासाठी ९ आॅगस्ट २०११ रोजी मुंबई-पुणे महामार्गावर रस्ता रोको करून आंदोलन केले होते. या आंदोलनात भाजपा, शिवसेना, आरपीआय, काँग्रेस हे राजकीय पक्षही सहभागी होते. हे आंदोलन थांबवण्यासाठी पोलीस व आंदोलनकर्ते यात खटका उडाला व हे आंदोलन चिघळले. यातून पोलिसांनी गोळीबार केला. त्यात कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे व श्याम तुपे हे तीन शेतकरी मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर त्या काळातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य सरकारने आंदोलनात शहीद झालेल्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीत घेण्याचे आश्वासन दिले होते. खूप उशिराने त्या तीन कुटुंबांतील प्रत्येकी एकेका व्यक्तीला महापालिकेत नोकरी देण्यात आली आहे. आंदोलन काळात शेतकऱ्यांवर ३०७सारखे गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत. युती शासन आल्यानंतर हे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन निवडणूक प्रचारात युतीच्या नेत्यांनी दिले होते. बंद जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करू, असेही सांगितले होते. मात्र, युती शासन सत्तेत येऊन २ वर्षे होत आली, तरी प्रकल्प रद्दची घोषणा झालेली नाही. शेतकऱ्यांवरील गुन्हेही मागे घेण्यात आलेले नाहीत.