शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टीडीपी आमदारासह १३ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: May 1, 2017 04:13 IST

गोसेखुर्द सिंचन महाघोटाळ्यातील दोन प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)े गुन्हा दाखल करीत आंध्र प्रदेशातील टीडीपीचे

नागपूर : गोसेखुर्द सिंचन महाघोटाळ्यातील दोन प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)े गुन्हा दाखल करीत आंध्र प्रदेशातील टीडीपीचे आमदार डी. व्ही. रामाराम यांच्यासह १३ अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी षड्यंत्रअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे अनुक्रमे १५.४९ कोटी आणि ७.८१ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाशी संबधित आरोपी हादरले आहेत. एसीबी अनेक दिवसांपासून गोसेखुर्द महाघोटाळ्याची चौकशी करीत आहे. गोसेखुर्द प्रकल्पातील पेंढरी शाखेत उपसा सिंचन योजनेंतर्गत कालव्याचे बांधकाम आणि मातीकामासाठी (८.५२ ते ४३.८० कि.मी.) २००६ मध्ये विदर्भ सिंचन विकास महामंडळाने (व्हीआयडीसी) निविदा काढल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत तीन कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यात श्रीनिवासन कन्स्ट्रक्शन कंपनी आणि आर. बलरामी रेड्डी अ‍ॅन्ड कंपनीला कंत्राट मिळाले. या कामात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याने एसीबीने चौकशी सुरू केली. या चौकशीच्या आधारावर एसीबीने मे. श्रीनिवासा कन्स्ट्रक्शनचे मालक टीडीपीचे आमदार बी. व्ही. रामाराव रा. मंगलम् रोड तिरुपती, मे. आर. बालारामी रेड्डी अ‍ॅन्ड कंपनीचे मॅनेजिंग पार्टनर रामी रेड्डी, श्रीनिवासुला रेड्डी, बंजारा हिल्स, तेलंगणा, व्हीआयडीसीचे तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रभाकर विठ्ठलराव मोरघडे रा. इसान टॉवर, शिवाजीनगर, तत्कालीन वरिष्ठ विभागीय लेखापाल श्याम जगदीश आंबुलकर रा. राधाकृष्ण अपार्टमेंट हुडकेश्वर, तत्कालीन अधीक्षक अभियंता दिलीप दीपराव पोहेकर, रा. पडोळे ले-आऊट परसोडी, तत्कालीन मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी, रा. सहकरनगर औरंगाबाद आणि तत्कालीन कार्यकारी संचालक रोहिदास मारुती लांडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.एसीबीने रविवारी या प्रकरणात मुंबईसह १५ ठिकाणी छापे टाकले. (प्रतिनिधी)३६०० कोटीचा निधी गोसेखुर्द प्रकल्पावरील खर्चाची किंमत जवळपास ३६०० कोटी रुपये आहे. यासाठी जारी केलेल्या ४० निविदांची चौकशी एसीबीच्या नागपूर शाखेतर्फे सुरू आहे. आतापर्यंत ४ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिल्या प्रकरणात एस. ए. कन्स्ट्रक्शनसह सहा आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. दुसऱ्या प्रकरणात शहा कन्स्ट्रकशनसह १३ जणांवर गुन्हा दाखल झाला होता.