शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पतसंस्थांनी वाटले एक हजार कोटींचे कर्ज

By admin | Updated: June 28, 2017 01:37 IST

राज्यात २७ हजार नोंदणीकृत पतसंस्थांपैकी १५ हजार ६७० पतसंस्था कार्यान्वित आहेत. ग्रामीण भागात ७० टक्के आर्थिक व्यवहार हे पतसंस्थांच्या माध्यमातून होत असतात.

राजेश शेगोकार । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात २७ हजार नोंदणीकृत पतसंस्थांपैकी १५ हजार ६७० पतसंस्था कार्यान्वित आहेत. ग्रामीण भागात ७० टक्के आर्थिक व्यवहार हे पतसंस्थांच्या माध्यमातून होत असतात. या पतसंस्थांकडे ५७ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून, ४० हजार कोटींचे कर्ज वाटप आहे. या कर्जामध्ये कृषी कर्जाचाही समावेश आहे. नागपूर, बुलडाणा व वर्धा अशा काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा सहकारी बँकांची स्थिती सक्षम नसल्यामुळे या जिल्ह्यामध्ये कृषी कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या पतसंस्थानी एकूण ठेवीच्या २० टक्के कृषी कर्ज वाटपाचे निर्देश सहकार खात्याचेच होते, त्यामुळे कर्जमाफीमध्ये पतसंस्थांनी वाटलेल्या कृषी कर्जाचा समावेश करावा, ही मागणी लावून धरली जात आहे. यासंदर्भात बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक म्हणाले, सहकार खात्यानेच आम्हा कृषी कर्ज वाटण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या निर्देशांना अधीन राहूनच शेती कर्जाबाबत पतसंस्थांनी पुढाकार घेतला होता, त्यामुळे कर्जमाफीमध्ये अशा कर्जाचाही समोवश करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.नोटाबंदीमध्येही पतसंस्थांवर होते निर्बंधनोटाबंदीच्या काळातही पतसंस्थांना अधिकारासाठी झगडावे लागले व आता कर्जमाफीच्या लाभासाठी संघर्षाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. पतसंस्थांना वैयक्तिक ग्राहक म्हणून गृहीत धरल्याने राष्ट्रीयीकृत बँकांमधून नव्या नोटा मिळण्यात अडचण निर्माण झाली. या संस्थांचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. जुन्या नोटांचा व्यवहार होत नाही अन् नव्या नोटा मिळत नाहीत, अशा स्थितीत ग्राहक सांभाळण्याची मोठी कसरत पतसंस्थांना करावी लागली होती. पतसंस्थांनी मुंबईमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन करूनही आरबीआय व शासनाने दखल न घेतल्यामुळे सहकार क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली होती. आता कुठे सावरत असताना कर्जमाफीमध्ये या संस्थांनी वाटलेल्या कृषी कर्जाचा समावेश नसल्याने पुन्हा एकदा पतसंस्थांसमोर अडचण उभी ठाकली आहे.