शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पतसंस्थांनी वाटले एक हजार कोटींचे कर्ज

By admin | Updated: June 28, 2017 01:37 IST

राज्यात २७ हजार नोंदणीकृत पतसंस्थांपैकी १५ हजार ६७० पतसंस्था कार्यान्वित आहेत. ग्रामीण भागात ७० टक्के आर्थिक व्यवहार हे पतसंस्थांच्या माध्यमातून होत असतात.

राजेश शेगोकार । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात २७ हजार नोंदणीकृत पतसंस्थांपैकी १५ हजार ६७० पतसंस्था कार्यान्वित आहेत. ग्रामीण भागात ७० टक्के आर्थिक व्यवहार हे पतसंस्थांच्या माध्यमातून होत असतात. या पतसंस्थांकडे ५७ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून, ४० हजार कोटींचे कर्ज वाटप आहे. या कर्जामध्ये कृषी कर्जाचाही समावेश आहे. नागपूर, बुलडाणा व वर्धा अशा काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा सहकारी बँकांची स्थिती सक्षम नसल्यामुळे या जिल्ह्यामध्ये कृषी कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या पतसंस्थानी एकूण ठेवीच्या २० टक्के कृषी कर्ज वाटपाचे निर्देश सहकार खात्याचेच होते, त्यामुळे कर्जमाफीमध्ये पतसंस्थांनी वाटलेल्या कृषी कर्जाचा समावेश करावा, ही मागणी लावून धरली जात आहे. यासंदर्भात बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक म्हणाले, सहकार खात्यानेच आम्हा कृषी कर्ज वाटण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या निर्देशांना अधीन राहूनच शेती कर्जाबाबत पतसंस्थांनी पुढाकार घेतला होता, त्यामुळे कर्जमाफीमध्ये अशा कर्जाचाही समोवश करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.नोटाबंदीमध्येही पतसंस्थांवर होते निर्बंधनोटाबंदीच्या काळातही पतसंस्थांना अधिकारासाठी झगडावे लागले व आता कर्जमाफीच्या लाभासाठी संघर्षाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. पतसंस्थांना वैयक्तिक ग्राहक म्हणून गृहीत धरल्याने राष्ट्रीयीकृत बँकांमधून नव्या नोटा मिळण्यात अडचण निर्माण झाली. या संस्थांचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. जुन्या नोटांचा व्यवहार होत नाही अन् नव्या नोटा मिळत नाहीत, अशा स्थितीत ग्राहक सांभाळण्याची मोठी कसरत पतसंस्थांना करावी लागली होती. पतसंस्थांनी मुंबईमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन करूनही आरबीआय व शासनाने दखल न घेतल्यामुळे सहकार क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली होती. आता कुठे सावरत असताना कर्जमाफीमध्ये या संस्थांनी वाटलेल्या कृषी कर्जाचा समावेश नसल्याने पुन्हा एकदा पतसंस्थांसमोर अडचण उभी ठाकली आहे.