नागपूर : राज्यातील आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न करावे व जनप्रतिनिधींनी जनतेच्या स्थानिक समस्या निवारणावर भर द्यावा, असा आदेश सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी दिला आहे. संघाचे प्रांत प्रचारक, संघ परिवारातील संघटना व राज्यातील भाजपाच्या पदाधिका:यांच्या उपस्थितीत शनिवारपासून नागपुरात 2 दिवसीय समन्वय बैठकीला सुरुवात झाली.
रेशीमबाग येथील स्मृतीमंदीर परिसरात सुरू असलेल्या या समन्वय बैठकीत विभागनिहाय कुठल्या समस्या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा म्हणून उचलता येतील यावरदेखील चर्चा झाली. त्यात विदर्भातील नक्षलवाद, मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रातील पाणीटंचाई, महिलांवर होणारे अत्याचार, ठिकठिकाणी दलित व वंचितांवरील अन्याय या समस्यांचा उल्लेख झाला. संघ स्वयंसेवकांनी थेट भाजपाचे नाव न घेता सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा असेदेखील सांगण्यात आले. लोकसभा निवडणूकांदरम्यान संघ स्वयंसेवकांनी काही राज्यांत घरोघरी जाऊन संपर्क केला होता. तोच प्रयोग विधानसभा निवडणुकीत केला जाणार आहे. संघ परिवारात जास्तीत जास्त प्रशिक्षित व कुशल कार्यकर्ते घडावे यासाठी प्रयत्न करण्यात यावा, असा सूर बैठकीत दिसून आला. (प्रतिनिधी)
नेत्यांचा ‘दक्ष’ पवित्र
च्‘लोकमत’ प्रतिनिधीने बैठकस्थळी जाऊन यासंदर्भात माहिती घेतली असता गोवा, गुजरात सोबतच कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडय़ातील प्रांत प्रचारकांची उपस्थिती दिसून आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्ष पंकजा पालवे-मुंडे हेदेखील प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीसंदर्भात संघाच्या पदाधिका:यांशी प्रतिक्रियेसाठी संपर्क करण्यात आला. परंतु कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. भाजपाच्या पदाधिका:यांनीदेखील ही ठराविक काळाने घेण्यात आलेली बैठक होती, असे सांगून ‘मौन’ बाळगणोच पसंत केले.