शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिल्पसृष्टीला मुहूर्तच सापडेना!

By admin | Updated: April 14, 2015 01:08 IST

बाबासाहेबांच्या कार्याची जगाला ओळख व्हावी यासाठी त्यांच्या मूळ आंबडवे गावी ५ कोटी रुपये खर्चून शिल्पसृष्टी उभी करण्याचा निर्णय २००९मध्ये आघाडी सरकारने घेतला होता.

आंबडवे दुर्लक्षित : मूळ गावाला विकासाची प्रतीक्षाशिवाजी गोरे -दापोली बाबासाहेबांच्या कार्याची जगाला ओळख व्हावी यासाठी त्यांच्या मूळ आंबडवे गावी ५ कोटी रुपये खर्चून शिल्पसृष्टी उभी करण्याचा निर्णय २००९मध्ये आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, पाच वर्षे होऊनही शिल्पसृष्टीचे नियोजन करण्यासाठी सरकारला मुहूर्तच मिळालेला नाही.कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी २४ जून २००९ रोजी सिंधुदुर्ग येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक झाली होती. त्यात डॉ. आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे (ता. मंडणगड) येथे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित शिल्पसृष्टी उभारण्याचा निर्णय झाला. त्यानंतर तत्कालीन ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी आंबडवे येथे भेट दिली. स्मारक व शिल्पसृष्टीसाठी आवश्यक असलेल्या जागेची पाहणी केली असता सपकाळ (आंबेडकर) कुटुंबीयांनी जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. बाबासाहेबांच्या स्मारकाशेजारील ३६ गुंठे जागा शिल्पसृष्टीसाठी नियोजित करण्यात आली. १४ मार्च २०१२ रोजी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत समिती स्थापन झाली. सुदर्शन सपकाळ, नरेंद्र सपकाळ, नथुराम सपकाळ, अल्पेश सपकाळ (आंबेडकर) कुटुंबीय बैठकीला उपस्थित होते. त्यात कामाला सुरुवात करण्याबाबत चर्चाही झाली. मात्र त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे नथुराम सपकाळ यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या मूळ गावी मोठे ग्रंथालय आवश्यक आहे. तसेच शिल्पसृष्टीमुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला बाबासाहेबांचा जीवनपट कळेल. येथे सद्य:स्थितीत स्मारकाशिवाय काहीही नाही. आंबडवे येथे त्यांची भावकी आंबेडकर म्हणजे आताचे सपकाळ कुटुंबीय राहतात. बाबासाहेबांबद्दल त्यांना प्रचंड आदर आहे. बाबासाहेबांच्या उपक्रमासाठी लागणारी जमीन दान देऊन त्यांनी पहिले पाऊल टाकले आहे. मात्र सरकारला शिल्पसृष्टीसाठी अजून मुहूर्त मिळालेला नाही.२५ आॅगस्ट २००९ रोजी शिल्पसृष्टी उभारण्याचे परिपत्रक निघाले होते. मात्र त्यापुढे काही झाले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रश्नी लक्ष घालावे.- प्रीतम रुके,आरपीआय, जिल्हा सरचिटणीसआंबडव गावाला भेट देणाऱ्या अनुयायांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही. येथील शिल्पसृष्टी पूर्ण व्हावी, यासाठी पुढाकार घेऊ.- आ. संजय कदम, दापोलीबाबासाहेबांच्या मूळ गावी मोठे ग्रंथालय आवश्यक आहे. तसेच शिल्पसृष्टीमुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला बाबासाहेबांचा जीवनपट कळेल. येथे सद्य:स्थितीत स्मारकाशिवाय काहीही नाही.संतांच्या नावे पैसा जमवला असल्यास त्याचा विनियोग सत्पात्री व्हावा, आपल्या सभोवताली दैन्य, दारिद्य्र, अज्ञान, रोगराई पसरली आहे़ त्यामुळे अशा पैशाचा सदुपयोग हे दु:ख, अज्ञान दूर करण्याकरिता केला जावा, असे मत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी साठ वर्षींपूर्वी व्यक्त केले होते़