शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पसृष्टीला मुहूर्तच सापडेना!

By admin | Updated: April 14, 2015 01:08 IST

बाबासाहेबांच्या कार्याची जगाला ओळख व्हावी यासाठी त्यांच्या मूळ आंबडवे गावी ५ कोटी रुपये खर्चून शिल्पसृष्टी उभी करण्याचा निर्णय २००९मध्ये आघाडी सरकारने घेतला होता.

आंबडवे दुर्लक्षित : मूळ गावाला विकासाची प्रतीक्षाशिवाजी गोरे -दापोली बाबासाहेबांच्या कार्याची जगाला ओळख व्हावी यासाठी त्यांच्या मूळ आंबडवे गावी ५ कोटी रुपये खर्चून शिल्पसृष्टी उभी करण्याचा निर्णय २००९मध्ये आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, पाच वर्षे होऊनही शिल्पसृष्टीचे नियोजन करण्यासाठी सरकारला मुहूर्तच मिळालेला नाही.कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी २४ जून २००९ रोजी सिंधुदुर्ग येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक झाली होती. त्यात डॉ. आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे (ता. मंडणगड) येथे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित शिल्पसृष्टी उभारण्याचा निर्णय झाला. त्यानंतर तत्कालीन ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी आंबडवे येथे भेट दिली. स्मारक व शिल्पसृष्टीसाठी आवश्यक असलेल्या जागेची पाहणी केली असता सपकाळ (आंबेडकर) कुटुंबीयांनी जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. बाबासाहेबांच्या स्मारकाशेजारील ३६ गुंठे जागा शिल्पसृष्टीसाठी नियोजित करण्यात आली. १४ मार्च २०१२ रोजी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत समिती स्थापन झाली. सुदर्शन सपकाळ, नरेंद्र सपकाळ, नथुराम सपकाळ, अल्पेश सपकाळ (आंबेडकर) कुटुंबीय बैठकीला उपस्थित होते. त्यात कामाला सुरुवात करण्याबाबत चर्चाही झाली. मात्र त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे नथुराम सपकाळ यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या मूळ गावी मोठे ग्रंथालय आवश्यक आहे. तसेच शिल्पसृष्टीमुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला बाबासाहेबांचा जीवनपट कळेल. येथे सद्य:स्थितीत स्मारकाशिवाय काहीही नाही. आंबडवे येथे त्यांची भावकी आंबेडकर म्हणजे आताचे सपकाळ कुटुंबीय राहतात. बाबासाहेबांबद्दल त्यांना प्रचंड आदर आहे. बाबासाहेबांच्या उपक्रमासाठी लागणारी जमीन दान देऊन त्यांनी पहिले पाऊल टाकले आहे. मात्र सरकारला शिल्पसृष्टीसाठी अजून मुहूर्त मिळालेला नाही.२५ आॅगस्ट २००९ रोजी शिल्पसृष्टी उभारण्याचे परिपत्रक निघाले होते. मात्र त्यापुढे काही झाले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रश्नी लक्ष घालावे.- प्रीतम रुके,आरपीआय, जिल्हा सरचिटणीसआंबडव गावाला भेट देणाऱ्या अनुयायांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही. येथील शिल्पसृष्टी पूर्ण व्हावी, यासाठी पुढाकार घेऊ.- आ. संजय कदम, दापोलीबाबासाहेबांच्या मूळ गावी मोठे ग्रंथालय आवश्यक आहे. तसेच शिल्पसृष्टीमुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला बाबासाहेबांचा जीवनपट कळेल. येथे सद्य:स्थितीत स्मारकाशिवाय काहीही नाही.संतांच्या नावे पैसा जमवला असल्यास त्याचा विनियोग सत्पात्री व्हावा, आपल्या सभोवताली दैन्य, दारिद्य्र, अज्ञान, रोगराई पसरली आहे़ त्यामुळे अशा पैशाचा सदुपयोग हे दु:ख, अज्ञान दूर करण्याकरिता केला जावा, असे मत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी साठ वर्षींपूर्वी व्यक्त केले होते़